शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

शहर पाणीपुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिले ६८२ कोटींचे अंदाजपत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 19:32 IST

औरंगाबाद महापालिकेने २०११ मध्ये तयार केलेल्या समांतर जलवाहिनी योजनेचे काम बंद पाडले आहे.

ठळक मुद्देमराठवाडा विकास मंडळाची बुधवारी राज्यपालांकडे बैठक लातूरसाठी ५८२ कोटींची जलवाहिनी 

औरंगाबाद : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (एमजीपी) औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजनेसाठी ६८२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. ते अंदाजपत्रक सोमवारी मराठवाडा विकास मंडळ अध्यक्ष आणि सदस्यांकडे सुपूर्द करण्यात आले. सोबतच लातूर शहर पाणीपुरवठ्यासाठी ५८२ कोटी रुपयांतून जलवाहिनीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. हे दोन्ही अंदाजपत्रक घेऊन बुधवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे मराठवाडा विकास मंडळाची बैठक होईल, अशी माहिती अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी दिली. 

औरंगाबाद महापालिकेने २०११ मध्ये तयार केलेल्या समांतर जलवाहिनी योजनेचे काम बंद पाडले आहे. त्यामुळे जीवन प्राधिकरणाकडून अंदाजपत्रक तयार करून त्याआधारे योजना बनविण्यात यावी, असे मत मराठवाडा विकास मंडळाचे झाले. त्यानंतर प्राधिकरणाकडे अंदाजपत्रकासाठी विकास मंडळाने प्रस्ताव पाठविला. त्यानुसार ६८२ कोटी रुपयांतून जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे अंदाजपत्रक एमजीपीने तयार केले आहे. दररोज पाणी देण्यासाठी तसेच पुढील २० वर्षांच्या नियोजनासाठी ती योजना असेल. एमजीपीने अंदाजपत्रक तयार केले आहे. 

योजनेचा डीपीआर करण्यासाठी वेगळ्या निधीची तरतूद करावी लागेल. लातूरसाठी उजनीतून पाणी देण्याची योजना राबविली, तर त्यासाठी ५८२ कोटी रुपये लागतील. मुख्यमंत्री आणि राज्यपालांची बुधवारी भेट घेऊन अर्थसंकल्पात दोन्ही योजनांसाठी तरतूद करण्याची मागणी असेल, असे डॉ. कराड यांनी स्पष्ट केले.

समांतरचे पॅकअपसमांतर जलवाहिनीचे पॅकअप झाले आहे. २०११ पासून योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाने दिलेला निधी बँकेत पडून आहे. व्याजासह ती रक्कम ३५० कोटींच्या आसपास गेली आहे. राज्य शासनाने शहर पाणीपुरवठ्यासाठी एमजीपीच्या अंदाजपत्रकाचा विचार केला, तर मराठवाडा विकास मंडळाला नोडल एजन्सी नेमून एमजीपीमार्फत औरंगाबाद आणि लातूरसाठी पाणीपुरवठा योजना राबविण्याचा निर्णय होऊ शकतो. मनपाला दिलेले अनुदान राज्य शासन सदरील योजनेमध्ये वळवू शकते. यासाठी केंद्र शासनासोबत राज्य शासनाने पत्रव्यवहार करून संमती घेतल्यास औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न मिटणे शक्य होणार आहे. 

टॅग्स :WaterपाणीParallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबादMarathwadaमराठवाडाAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका