शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

राज्यात बीआरएसने खाते उघडले; ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत पहिला उमेदवार विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 18:26 IST

विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या तालुक्यातील ८ ग्रामपंचायतीच्या ९ सदस्यांच्या जागांसाठी ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती.

गंगापूर : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल शुक्रवारी (दि. १९) जाहीर करण्यात आला. यात अंबेलोहळ येथील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत बीआरएस (भारत राष्ट्र समिती) पक्षाचा एक उमेदवार विजयी झाल्याने पक्षाने राज्याच्या राजकारणात विजयी प्रवेश केला आहे.

विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या तालुक्यातील ८ ग्रामपंचायतीच्या ९ सदस्यांच्या जागांसाठी ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. यातील गवळीधानोरा, भोयागाव, मलकापूर येथील प्रत्येकी एका जागेसाठीची सदस्यपद निवड बिनविरोध झाली होती. तर वरझडी व नवाबपूर येथे एक देखील अर्ज न आल्याने येथील जागा रिक्त राहणार आहे. तर उर्वरित अंबेलोहळ, जिकठान, मांगेगाव या तीन ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी एक जागेसाठी गुरुवारी ७५ टक्के मतदान झाले होते. 

यात जिकठान येथून अहेमदखा पठाण हे तर मांगेगाव येथून रुपाली रोडगे व अंबेलोहळ येथून सरदार गफ्फार पठाण हे तीन उमेदवार विजयी झाले. आंबेलोहळ येथील गफ्फार पठाण हे बीआरएस पक्षाचे पदाधिकारी आहे. त्यांच्या रूपाने पक्षाने विजय मिळविला असून पठाण यांच्या विजयानंतर पक्षाच्या कार्यकर्ते व नेत्यांनी जल्लोष केला.

महिनाभरात बीआरएस ४५ हजार गावांत जाणारदरम्यान, आगामी काळात राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघातील ४५ हजार गावे आणि ५ हजार नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रात बीआरएसचे कार्यकर्ते २२ मे ते२२ जून असे महिनाभर घरोघरी फिरतील. प्रत्येक दिवशी किमान पाच गावात जातील. प्रत्येक गावात ते वेगवेगळ्या घटकातील ९ समित्या स्थापन करतील. पुढील महिनाभरात महाराष्ट्रातील प्रत्येक गावात बीआरएस पक्षाचे नाव आणि झेंडा पोहचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा, आपले म्हणणे लोकापर्यंत पोहचवा असे आवाहन बीआरएसचे सर्वेसर्वा आणि तेलंगणा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज नांदेड येथील मेळाव्यात केले.

टॅग्स :TelanganaतेलंगणाK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावAurangabadऔरंगाबाद