शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

राज्यात बीआरएसने खाते उघडले; ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत पहिला उमेदवार विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 18:26 IST

विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या तालुक्यातील ८ ग्रामपंचायतीच्या ९ सदस्यांच्या जागांसाठी ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती.

गंगापूर : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल शुक्रवारी (दि. १९) जाहीर करण्यात आला. यात अंबेलोहळ येथील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत बीआरएस (भारत राष्ट्र समिती) पक्षाचा एक उमेदवार विजयी झाल्याने पक्षाने राज्याच्या राजकारणात विजयी प्रवेश केला आहे.

विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या तालुक्यातील ८ ग्रामपंचायतीच्या ९ सदस्यांच्या जागांसाठी ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. यातील गवळीधानोरा, भोयागाव, मलकापूर येथील प्रत्येकी एका जागेसाठीची सदस्यपद निवड बिनविरोध झाली होती. तर वरझडी व नवाबपूर येथे एक देखील अर्ज न आल्याने येथील जागा रिक्त राहणार आहे. तर उर्वरित अंबेलोहळ, जिकठान, मांगेगाव या तीन ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी एक जागेसाठी गुरुवारी ७५ टक्के मतदान झाले होते. 

यात जिकठान येथून अहेमदखा पठाण हे तर मांगेगाव येथून रुपाली रोडगे व अंबेलोहळ येथून सरदार गफ्फार पठाण हे तीन उमेदवार विजयी झाले. आंबेलोहळ येथील गफ्फार पठाण हे बीआरएस पक्षाचे पदाधिकारी आहे. त्यांच्या रूपाने पक्षाने विजय मिळविला असून पठाण यांच्या विजयानंतर पक्षाच्या कार्यकर्ते व नेत्यांनी जल्लोष केला.

महिनाभरात बीआरएस ४५ हजार गावांत जाणारदरम्यान, आगामी काळात राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघातील ४५ हजार गावे आणि ५ हजार नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रात बीआरएसचे कार्यकर्ते २२ मे ते२२ जून असे महिनाभर घरोघरी फिरतील. प्रत्येक दिवशी किमान पाच गावात जातील. प्रत्येक गावात ते वेगवेगळ्या घटकातील ९ समित्या स्थापन करतील. पुढील महिनाभरात महाराष्ट्रातील प्रत्येक गावात बीआरएस पक्षाचे नाव आणि झेंडा पोहचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा, आपले म्हणणे लोकापर्यंत पोहचवा असे आवाहन बीआरएसचे सर्वेसर्वा आणि तेलंगणा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज नांदेड येथील मेळाव्यात केले.

टॅग्स :TelanganaतेलंगणाK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावAurangabadऔरंगाबाद