शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसपुढे ‘बीआरएस’चे आव्हान

By स. सो. खंडाळकर | Updated: April 21, 2023 19:45 IST

शंकरराव धोंगडे यांच्यासारखा जाणकार नेता राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ‘बीआरएस’मध्ये गेला तेव्हाच भुवया उंचावल्या गेल्या होत्या

छत्रपती संभाजीनगर : तेलंगणापुरता सीमित असलेला भारत राष्ट्र समिती हा पक्ष आता महाराष्ट्रात विशेषत: मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसलाच आव्हान ठरू पाहत आहे. त्यातच येत्या २४ मे रोजी आमखास मैदानावर चंद्रशेखर राव यांची होणारी जाहीर सभा आता औत्सुक्याचा विषय ठरली आहे. या सभेत कोणत्या पक्षाचे कोण कोण ‘बीआरएस’मध्ये जाणार याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

तेलंगणा नांदेडलगत असल्यामुळे तिकडे ‘बीआरएस’ हातपाय पसरवत असेल, असे आधी सगळ्यांना वाटले. शंकरराव धोंगडे यांच्यासारखा जाणकार नेता राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ‘बीआरएस’मध्ये गेला तेव्हाच भुवया उंचावल्या गेल्या होत्या; पण प्रवेश केलेल्यांची नावे डोळ्यासमोर आणली तर ती राष्ट्रवादी काँग्रेसचीच अधिक असल्याचे दिसून येते. वैजापूरचे अभय पाटील चिकटगावकर, कन्नडचे हर्षवर्धन जाधव, छत्रपती संभाजीनगरचे कदीर मौलाना, शिक्षक मतदारसंघाचे बंडखोर उमेदवार हभप प्रदीप सोळुंके ही सारी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसची आणि तीही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली. आधीच छत्रपती संभाजीनगरात राष्ट्रवादी कमजोर आहे. आ. सतीश चव्हाण व विक्रम काळे हे दोन मराठवाडाभर मतदारसंघ असलेले आमदार सोडले तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची शक्ती तोळामासाचीच आहे. 

जिल्ह्यात निवडून आलेला एकही आमदार नाही. मागच्या वेळी महापालिकेत बोटावर मोजता येतील, इतकेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक होते. जिल्हा परिषदेतही फारशी चांगली स्थिती नव्हती. आता तर ‘बीआरएस’च्या आगमनाने राष्ट्रवादी काँग्रेससमोर चिंतेचेच वातावरण दिसते. पूर्वीपासूनच पक्षात सीनियर-ज्युनियर असे गट आहेत. जिल्हाभर पक्ष संघटना बांधण्यासाठी भरीव प्रयत्नही होताना दिसत नाहीत. त्यात पुन्हा नाराज मंडळी ‘बीआरएस’च्या वाटेवर असल्याने पक्षाच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष दिले पाहिजे व वेळीच पक्षात फेरबदल करून गळती थांबविली पाहिजे, अशी चर्चा सुरू आहे. त्यादृष्टीने पक्षातील सीनियर मंडळींचा गट सक्रिय झाला असल्याचे समजते. दरम्यान, २४ एप्रिलच्या चंद्रशेखर राव यांच्या जाहीर सभेत अनेकांचा प्रवेश होत असल्याचे समजते.

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावNCPराष्ट्रवादी काँग्रेसAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा