शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

औरंगाबादच्या जाधववाडीत 'ई-नाम'चा सावळा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 20:05 IST

केंद्र सरकारची  महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय कृषी बाजारची (ई-नाम)  अंमलबजावणीत जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सावळा गोंधळ सुरू आहे.

ठळक मुद्देअत्यल्प पेरा असलेली तूर, हरभरा, बाजरी, सोयाबीनलाच ई-लिलावात स्थान देण्यात आले आहे. ई-लिलावाची माहिती ई-नाम पोर्टलवर टाकण्याच्या बहाण्याने राज्य सरकारच्या डोळ्यात धूळफेक करीत आहे.  

- प्रशांत तेलवाडकर औरंगाबाद : केंद्र सरकारची  महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय कृषी बाजारची (ई-नाम)  अंमलबजावणीत जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सावळा गोंधळ सुरू आहे. या ई-लिलावातून जिल्ह्यातील मुख्य पिके मका, गहू, ज्वारी वगळण्यात आली आहेत.  त्याऐवजी जिल्ह्यात अत्यल्प पेरा असलेली तूर, हरभरा, बाजरी, सोयाबीनलाच ई-लिलावात स्थान देण्यात आले आहे. व्यापाऱ्यांच्या दबाबाखाली आलेली कृषी समिती दररोज ई-लिलावाची माहिती ई-नाम पोर्टलवर टाकण्याच्या बहाण्याने राज्य सरकारच्या डोळ्यात धूळफेक करीत आहे.  

सकाळी १० वाजता ई-लिलाव सुरू होणे अपेक्षित आहे. खरेदीदारांनी मोबाईलवर भाव टाकून ई-लिलावात सहभागी होणे आवश्यक आहे, पण येथे तसे काहीच होताना दिसत नाही. नवीन प्रणाली लागू होऊन दोन महिने झाले, पण अजूनही प्रत्येक सेल हॉलमध्ये इंटरनेट प्रणालीच पोहोचली नाही. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची होणारी लूट रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी आणलेल्या शेतीमाल खरेदीत स्पर्धा निर्माण व्हावी, शेतीमाल खरेदी केल्यावर लगेच संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यात सर्व रक्कम जमा व्हावी, या उद्देशाने  (ई-नाम) योजना केंद्र सरकारने लागू केली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील ३० बाजार समित्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. त्यातीलच एक औरंगाबादेतील कृषी उत्पन्न बाजार समिती होय. यासाठी खास टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आली आहे. धान्य, कडधान्याची तपासणी करणे, ग्रेडिंग करणे व ई-नाम पोर्टलवर त्यांची माहिती अपलोड करण्याचे काम केले जात आहे.  

बाजार समितीमध्ये येणारे प्रत्येक धान्य, कडधान्याचा ई-लिलाव अपेक्षित होता. पण व्यापाऱ्यांच्या आंदोलनापुढे चक्क शरणागती पत्करून बाजार समितीने ‘तूर, हरभरा, बाजरी व सोयाबीन’ यांचाच ई-लिलाव करण्याचा निर्णय घेतला. मुळात तूर वगळता जिल्ह्यात हरभरा, बाजरी व सोयाबीनचे क्षेत्र फार कमी आहे. उत्पादनही कमी आहे. याउलट औरंगाबाद व आसपासच्या तालुक्यात मक्याचे क्षेत्र मोठे आहे. मक्याला ई-नाममध्ये स्थान देण्यात आले नाही. यंदा गव्हाचे उत्पादन चांगले आहे. मात्र, गहू, ज्वारीला ई-नाममध्ये घेतले जात नाही. ई-नाममधून वगळण्यात आल्याने गहू व ज्वारीची ओरडून हर्राशी केली जात आहे. असे विचित्र चित्र येथे बघण्यास मिळत आहे.   

तूर, हरभरा, बाजरी, सोयाबीनची आवकच नसल्याने दोन ते चार नमुने घेऊन त्याचे ग्रेडिंग करून माहिती ई-नाम पोर्टलवर टाकली जात आहे. सरकारला जाधववाडीतील कृउबामध्ये ई-नाम सुरू झाल्याचे दाखविले जात आहे; पण अजूनही ‘ई-नाम’ची अंमलबजावणी कठोरपणे व नियोजनबद्ध केली जात नाही. यामुळे ई-नामचा बट्ट्याबोळ उडाला आहे. 

कुठे गेले ९ हजार शेतकरी, २०० खरेदीदार ई-नाम अंतर्गत सुमारे ९ हजार शेतकरी व २०० खरेदीदारांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती मार्च महिन्यात कृउबाचे सभापती राधाकिसन पठाडे यांनी दिली होती. पण प्रत्यक्षात बोटावर मोजण्याइतकेच खरेदीदार बाजार समितीत दिसून येतात. बाकीची कुठे गायब झाले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ई-लिलावासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये अजूनही संभ्रम आहे. बाजार समितीत आणलेल्या शेतीमालाची विक्री होईल की नाही, रोख मिळेल का धनादेश, अडत व्यापारी कधी संप पुकारतील याचा नेम नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे पाठ फिरविली असून, परपेठेतील बाजारात जाऊन ते शेतीमाल विकत आहेत. यामुळे  कृउबापासून शेतकरी दूर जात आहेत. याचा फटका येथील उलाढालीवर झाला आहे. शिवाय बाजार समितीच्या उत्पन्नावर झाला आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीmarket yardमार्केट यार्ड