शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

औरंगाबादच्या जाधववाडीत 'ई-नाम'चा सावळा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 20:05 IST

केंद्र सरकारची  महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय कृषी बाजारची (ई-नाम)  अंमलबजावणीत जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सावळा गोंधळ सुरू आहे.

ठळक मुद्देअत्यल्प पेरा असलेली तूर, हरभरा, बाजरी, सोयाबीनलाच ई-लिलावात स्थान देण्यात आले आहे. ई-लिलावाची माहिती ई-नाम पोर्टलवर टाकण्याच्या बहाण्याने राज्य सरकारच्या डोळ्यात धूळफेक करीत आहे.  

- प्रशांत तेलवाडकर औरंगाबाद : केंद्र सरकारची  महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय कृषी बाजारची (ई-नाम)  अंमलबजावणीत जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सावळा गोंधळ सुरू आहे. या ई-लिलावातून जिल्ह्यातील मुख्य पिके मका, गहू, ज्वारी वगळण्यात आली आहेत.  त्याऐवजी जिल्ह्यात अत्यल्प पेरा असलेली तूर, हरभरा, बाजरी, सोयाबीनलाच ई-लिलावात स्थान देण्यात आले आहे. व्यापाऱ्यांच्या दबाबाखाली आलेली कृषी समिती दररोज ई-लिलावाची माहिती ई-नाम पोर्टलवर टाकण्याच्या बहाण्याने राज्य सरकारच्या डोळ्यात धूळफेक करीत आहे.  

सकाळी १० वाजता ई-लिलाव सुरू होणे अपेक्षित आहे. खरेदीदारांनी मोबाईलवर भाव टाकून ई-लिलावात सहभागी होणे आवश्यक आहे, पण येथे तसे काहीच होताना दिसत नाही. नवीन प्रणाली लागू होऊन दोन महिने झाले, पण अजूनही प्रत्येक सेल हॉलमध्ये इंटरनेट प्रणालीच पोहोचली नाही. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची होणारी लूट रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी आणलेल्या शेतीमाल खरेदीत स्पर्धा निर्माण व्हावी, शेतीमाल खरेदी केल्यावर लगेच संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यात सर्व रक्कम जमा व्हावी, या उद्देशाने  (ई-नाम) योजना केंद्र सरकारने लागू केली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील ३० बाजार समित्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. त्यातीलच एक औरंगाबादेतील कृषी उत्पन्न बाजार समिती होय. यासाठी खास टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आली आहे. धान्य, कडधान्याची तपासणी करणे, ग्रेडिंग करणे व ई-नाम पोर्टलवर त्यांची माहिती अपलोड करण्याचे काम केले जात आहे.  

बाजार समितीमध्ये येणारे प्रत्येक धान्य, कडधान्याचा ई-लिलाव अपेक्षित होता. पण व्यापाऱ्यांच्या आंदोलनापुढे चक्क शरणागती पत्करून बाजार समितीने ‘तूर, हरभरा, बाजरी व सोयाबीन’ यांचाच ई-लिलाव करण्याचा निर्णय घेतला. मुळात तूर वगळता जिल्ह्यात हरभरा, बाजरी व सोयाबीनचे क्षेत्र फार कमी आहे. उत्पादनही कमी आहे. याउलट औरंगाबाद व आसपासच्या तालुक्यात मक्याचे क्षेत्र मोठे आहे. मक्याला ई-नाममध्ये स्थान देण्यात आले नाही. यंदा गव्हाचे उत्पादन चांगले आहे. मात्र, गहू, ज्वारीला ई-नाममध्ये घेतले जात नाही. ई-नाममधून वगळण्यात आल्याने गहू व ज्वारीची ओरडून हर्राशी केली जात आहे. असे विचित्र चित्र येथे बघण्यास मिळत आहे.   

तूर, हरभरा, बाजरी, सोयाबीनची आवकच नसल्याने दोन ते चार नमुने घेऊन त्याचे ग्रेडिंग करून माहिती ई-नाम पोर्टलवर टाकली जात आहे. सरकारला जाधववाडीतील कृउबामध्ये ई-नाम सुरू झाल्याचे दाखविले जात आहे; पण अजूनही ‘ई-नाम’ची अंमलबजावणी कठोरपणे व नियोजनबद्ध केली जात नाही. यामुळे ई-नामचा बट्ट्याबोळ उडाला आहे. 

कुठे गेले ९ हजार शेतकरी, २०० खरेदीदार ई-नाम अंतर्गत सुमारे ९ हजार शेतकरी व २०० खरेदीदारांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती मार्च महिन्यात कृउबाचे सभापती राधाकिसन पठाडे यांनी दिली होती. पण प्रत्यक्षात बोटावर मोजण्याइतकेच खरेदीदार बाजार समितीत दिसून येतात. बाकीची कुठे गायब झाले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ई-लिलावासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये अजूनही संभ्रम आहे. बाजार समितीत आणलेल्या शेतीमालाची विक्री होईल की नाही, रोख मिळेल का धनादेश, अडत व्यापारी कधी संप पुकारतील याचा नेम नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे पाठ फिरविली असून, परपेठेतील बाजारात जाऊन ते शेतीमाल विकत आहेत. यामुळे  कृउबापासून शेतकरी दूर जात आहेत. याचा फटका येथील उलाढालीवर झाला आहे. शिवाय बाजार समितीच्या उत्पन्नावर झाला आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीmarket yardमार्केट यार्ड