शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हृदयद्रावक ! रस्ता नसल्याने खाटेवरून न्यावा लागला मुलाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 16:41 IST

येथे जाण्यासाठी अद्यापही रस्ता नसल्यामुळे रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी खाटेचा वापर करावा लागतो.

भराडी ( औरंगाबाद ) : उपळी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाघदावाडी येथील तुषार विठ्ठल महेर या मुलाचा सिल्लोड येथे चार दिवसांपूर्वी वळण रस्त्यावर अपघाती मृत्यू झाला होता. वाघदावाडीला जाण्यासाठी रस्ता नसल्याने चक्क मृतदेह खाटेवरून नेण्याची वेळ कुटुंबीयांवर आली.

उपळी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाघदावाडीची लोकसंख्या तिनशेपेक्षा जास्त आहे. ग्रामपंचायतमध्ये येथील एक सदस्य निवडून येतो. मात्र, या गावात पाण्याची सोय नाही. आपापल्या परीने नागरिक पाण्याची व्यवस्था करतात. येथे जाण्यासाठी अद्यापही रस्ता नसल्यामुळे रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी खाटेचा वापर करावा लागतो. पावसाळ्यात तर महिलांसह लहान मुले, वयोवृद्ध व्यक्तींना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. चार दिवसांपूर्वी वाघदावाडीच्या तुषार विठ्ठल महेर या मुलाचा सिल्लोड येथे रस्ता अपघातात मृत्यू झाला. त्याचा मृतदेह गावी नेण्यासाठी कुटुंबीयांना खाटेचा आधार घ्यावा लागला. यामुळे गावात रस्ता कधी होईल, अशी विचारणा गावकरी करीत आहेत.

रस्ता नसल्याने महेर कुटुंबातील तिघांचा मृत्यूअपघातात मयत तुषार विठ्ठल महेर या मुलाच्या कुटुंबातील तीन सदस्यांचा रस्ता नसल्याने मृत्यू झालेला आहे. यातील एकजण सर्पदंश झाल्यानंतर वेळेवर रुग्णालयात पोहोचू शकला नाही. तर कुटुंबातील दोघांनी विषारी औषध प्राशन केले होते, वेळेवर रुग्णालयात पोहोचविता न आल्याने त्यांचाही मृत्यू झाला होता.

रस्त्याचा निधी परत गेलानागरिकांच्या मागणीनुसार वाघदावाडी ते उपळी असा रस्ता करण्यासाठी प्रशासनाकडून निधी उपलब्ध झाला होता. मात्र, काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात हा रस्ता अडविल्याने तो होऊ शकला नाही.

रस्त्याचा वाद उपजिल्हाधिकाऱ्यांकडेउपळी ते वाघदावाडी रस्ता काही शेतकऱ्यांनी अडविल्यानंतर तहसील प्रशासनाने रस्ता करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना समजावून सांगितले. मात्र काही शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयात अपील दाखल केल्याने रस्त्याचे काम होऊ शकले नाही. आमची एकच मागणी आहे की आम्हाला जाण्या-येण्यासाठी रस्त्याची सोय करून द्यावी.-इंदलसिंग हारचंद महेर, रहिवासी, वाघदावाडी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिक