शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

हृदयद्रावक ! रस्ता नसल्याने खाटेवरून न्यावा लागला मुलाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 16:41 IST

येथे जाण्यासाठी अद्यापही रस्ता नसल्यामुळे रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी खाटेचा वापर करावा लागतो.

भराडी ( औरंगाबाद ) : उपळी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाघदावाडी येथील तुषार विठ्ठल महेर या मुलाचा सिल्लोड येथे चार दिवसांपूर्वी वळण रस्त्यावर अपघाती मृत्यू झाला होता. वाघदावाडीला जाण्यासाठी रस्ता नसल्याने चक्क मृतदेह खाटेवरून नेण्याची वेळ कुटुंबीयांवर आली.

उपळी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाघदावाडीची लोकसंख्या तिनशेपेक्षा जास्त आहे. ग्रामपंचायतमध्ये येथील एक सदस्य निवडून येतो. मात्र, या गावात पाण्याची सोय नाही. आपापल्या परीने नागरिक पाण्याची व्यवस्था करतात. येथे जाण्यासाठी अद्यापही रस्ता नसल्यामुळे रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी खाटेचा वापर करावा लागतो. पावसाळ्यात तर महिलांसह लहान मुले, वयोवृद्ध व्यक्तींना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. चार दिवसांपूर्वी वाघदावाडीच्या तुषार विठ्ठल महेर या मुलाचा सिल्लोड येथे रस्ता अपघातात मृत्यू झाला. त्याचा मृतदेह गावी नेण्यासाठी कुटुंबीयांना खाटेचा आधार घ्यावा लागला. यामुळे गावात रस्ता कधी होईल, अशी विचारणा गावकरी करीत आहेत.

रस्ता नसल्याने महेर कुटुंबातील तिघांचा मृत्यूअपघातात मयत तुषार विठ्ठल महेर या मुलाच्या कुटुंबातील तीन सदस्यांचा रस्ता नसल्याने मृत्यू झालेला आहे. यातील एकजण सर्पदंश झाल्यानंतर वेळेवर रुग्णालयात पोहोचू शकला नाही. तर कुटुंबातील दोघांनी विषारी औषध प्राशन केले होते, वेळेवर रुग्णालयात पोहोचविता न आल्याने त्यांचाही मृत्यू झाला होता.

रस्त्याचा निधी परत गेलानागरिकांच्या मागणीनुसार वाघदावाडी ते उपळी असा रस्ता करण्यासाठी प्रशासनाकडून निधी उपलब्ध झाला होता. मात्र, काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात हा रस्ता अडविल्याने तो होऊ शकला नाही.

रस्त्याचा वाद उपजिल्हाधिकाऱ्यांकडेउपळी ते वाघदावाडी रस्ता काही शेतकऱ्यांनी अडविल्यानंतर तहसील प्रशासनाने रस्ता करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना समजावून सांगितले. मात्र काही शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयात अपील दाखल केल्याने रस्त्याचे काम होऊ शकले नाही. आमची एकच मागणी आहे की आम्हाला जाण्या-येण्यासाठी रस्त्याची सोय करून द्यावी.-इंदलसिंग हारचंद महेर, रहिवासी, वाघदावाडी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिक