शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

मराठी भाषेची जननी मराठवाडाच; अजिंठ्याच्या डोंगररांगा, गोदावरी खोऱ्यातील जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 17:20 IST

यादवांच्या काळात पहिल्यांदा तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात दुसऱ्यांदा मराठी ही राजभाषा झाली

औरंगाबाद :मराठी भाषेचा जन्म हा अजिंठ्याच्या डोंगररांगा व गोदावरी खोऱ्यातील भूभाग अर्थात मराठवाड्यात झाला. आजच्या प्रमाण मराठी भाषेतील रूपे ही मराठवाड्याच्या मराठी भाषेतील आद्यरूपे आहेत, असे प्रतिपादन मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी केले. तर औरंगाबाद जिल्ह्यातील साहित्य परंपरेतील संत बहिणाबाई, निळोबाराय, शाहीर विश्राम पाटील यांच्यावर संशोधनाची गरजही त्यांनी व्यक्त केली.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभाग व भाषा संचालनालयातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित जागर मराठीचा या कार्यक्रमात बोलत होते. औरंगाबाद जिल्ह्याची साहित्य व सांस्कृतिक परंपरा या विषयावर उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते. मंचावर विभागप्रमुख प्रा. दासू वैद्य, भाषा संचालनालय विभागीय कार्यालयाचे बाबासाहेब जगताप, कवी हबीब भंडारे व समन्वयक डॉ. कैलास अंभुरे उपस्थित होते.

ठाले पाटील म्हणाले, शालिवाहन काळापासून पैठण हे सर्व सांस्कृतिक घडामोडींचे केंद्र होते. बौद्ध धर्माच्या चार केंद्रांपैकी अजिंठा हे एक केंद्र होते. यादवांच्या काळात पहिल्यांदा तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात दुसऱ्यांदा मराठी ही राजभाषा झाली; परंतु हेमाद्री पंडिताने ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ या ग्रंथाद्वारे कर्मकांडाचे स्तोम वाढवले. मराठवाड्यातील ब्राह्मण उदार होते म्हणून ते चळवळीत आले. परिणामी मराठवाड्यात ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळ निर्माण झाली नाही.

गावात अन् नावात काय असते, ही भावना चुकीचीप्रास्ताविकात विभागप्रमुख प्रा. दासू वैद्य यांनी स्वतःचे नाव, गाव यांनाही एक सांस्कृतिक परंपरा असते. ती स्व जाणीव ओळखण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्काराबद्दल कवी हबीब भंडारे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन डॉ. विलास गायकवाड यांनी केले. डॉ. कैलास अंभुरे यांनी आभार मानले. डाॅ. सुधाकर शेंडगे, प्रिया धारुरकर, प्रा. रामेश्वर वाकणकर यांच्यासह विद्यार्थी, संशोधकांची उपस्थिती होती.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmarathiमराठी