शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

मराठी भाषेची जननी मराठवाडाच; अजिंठ्याच्या डोंगररांगा, गोदावरी खोऱ्यातील जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 17:20 IST

यादवांच्या काळात पहिल्यांदा तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात दुसऱ्यांदा मराठी ही राजभाषा झाली

औरंगाबाद :मराठी भाषेचा जन्म हा अजिंठ्याच्या डोंगररांगा व गोदावरी खोऱ्यातील भूभाग अर्थात मराठवाड्यात झाला. आजच्या प्रमाण मराठी भाषेतील रूपे ही मराठवाड्याच्या मराठी भाषेतील आद्यरूपे आहेत, असे प्रतिपादन मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी केले. तर औरंगाबाद जिल्ह्यातील साहित्य परंपरेतील संत बहिणाबाई, निळोबाराय, शाहीर विश्राम पाटील यांच्यावर संशोधनाची गरजही त्यांनी व्यक्त केली.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभाग व भाषा संचालनालयातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित जागर मराठीचा या कार्यक्रमात बोलत होते. औरंगाबाद जिल्ह्याची साहित्य व सांस्कृतिक परंपरा या विषयावर उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते. मंचावर विभागप्रमुख प्रा. दासू वैद्य, भाषा संचालनालय विभागीय कार्यालयाचे बाबासाहेब जगताप, कवी हबीब भंडारे व समन्वयक डॉ. कैलास अंभुरे उपस्थित होते.

ठाले पाटील म्हणाले, शालिवाहन काळापासून पैठण हे सर्व सांस्कृतिक घडामोडींचे केंद्र होते. बौद्ध धर्माच्या चार केंद्रांपैकी अजिंठा हे एक केंद्र होते. यादवांच्या काळात पहिल्यांदा तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात दुसऱ्यांदा मराठी ही राजभाषा झाली; परंतु हेमाद्री पंडिताने ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ या ग्रंथाद्वारे कर्मकांडाचे स्तोम वाढवले. मराठवाड्यातील ब्राह्मण उदार होते म्हणून ते चळवळीत आले. परिणामी मराठवाड्यात ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळ निर्माण झाली नाही.

गावात अन् नावात काय असते, ही भावना चुकीचीप्रास्ताविकात विभागप्रमुख प्रा. दासू वैद्य यांनी स्वतःचे नाव, गाव यांनाही एक सांस्कृतिक परंपरा असते. ती स्व जाणीव ओळखण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्काराबद्दल कवी हबीब भंडारे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन डॉ. विलास गायकवाड यांनी केले. डॉ. कैलास अंभुरे यांनी आभार मानले. डाॅ. सुधाकर शेंडगे, प्रिया धारुरकर, प्रा. रामेश्वर वाकणकर यांच्यासह विद्यार्थी, संशोधकांची उपस्थिती होती.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmarathiमराठी