शहरं
Join us  
Trending Stories
1
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
2
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
3
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
4
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
5
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
6
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
7
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
8
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
9
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
10
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
11
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
12
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
13
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
14
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
15
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
16
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
17
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
18
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
19
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
20
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदात्याने कालविले भाकरीच्या पिठात विष, तीन मुलांचा मृत्यू; पत्नी अत्यवस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 05:51 IST

सोयगाव (जि. औरंगाबाद) : शेतक-याने स्वत:च्या घरातील भाकरीच्या पिठात विष कालवल्याने त्याच्या तीन मुलांचा मृत्यू झाला असून त्याच्या पत्नीची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

सोयगाव (जि. औरंगाबाद) : शेतक-याने स्वत:च्या घरातील भाकरीच्या पिठात विष कालवल्याने त्याच्या तीन मुलांचा मृत्यू झाला असून त्याच्या पत्नीची मृत्यूशी झुंज सुरू आहे. न्हावी तांडा येथे सोमवारी रात्री हा प्रकार घडला. घरातील ताणतणाव किंवा आर्थिक चणचणीतून शेतकºयाने कुटुंब संपविण्याचा प्रयत्न केला असावा, अशी चर्चा गावात आहे.पिठात विष कालवल्यानंतर फरार झालेल्या राजू रतन राठोड यास बुधवारी दुपारी सोयगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. तो काहीही बोलत नसल्याने व याप्रकरणी कुणीही तक्रार न दिल्याने सोयगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. राजू हा पत्नी कावेरीबाई (३२), मुलगी ज्योती (१३), गोगली (८) व मुलगा राहुल (१०) यांच्यासह राहत होता. पत्नी शेतातून येण्याच्या आधी सोमवारी सायंकाळी त्याने घर गाठले. डब्यातील ज्वारीच्या पिठात विष कालवले. कावेरीबाई यांनी नेहमीप्रमाणे स्वयंपाक केला. संपूर्ण कुटुंबाने व शेजारील दिनेश राठोडनेही त्यांच्याकडेच जेवण केले. मात्र राजू हा नंतर जेवतो म्हणून घरातून गेला तो परत आलाच नाही. मध्यरात्री पाचही जणांना उलट्या होऊ लागल्याने त्यांना नातेवाईकांनी तातडीने पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा, जि. जळगाव) येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.प्रकृती चिंताजनक झाल्याने सर्वांना जळगावचे सामान्य रुग्णालय व खासगी रुग्णालयात दाखल केले. ज्योती व गोगली यांचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला, तर बुधवारी रात्री राहुल याचाही मृत्यू झाला. कावेरीबाई व दिनेश मृत्यूशी झुंज देत आहेत.>कारण अस्पष्टजळगाव येथील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करुन हे प्रकरण सोयगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. त्यानुसार बुधवारी धिंगापूर धरणाजवळ लपून बसलेल्या राजू यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने पिठात विष का कालवले, याचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत कुणीही फिर्याद दिली नसल्याने आम्ही अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे, असे सोयगावचे सहायक पोलीस निरीक्षक सुजित बडे यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याDeathमृत्यू