शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

जन्मदात्याने कालविले भाकरीच्या पिठात विष, तीन मुलांचा मृत्यू; पत्नी अत्यवस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 05:51 IST

सोयगाव (जि. औरंगाबाद) : शेतक-याने स्वत:च्या घरातील भाकरीच्या पिठात विष कालवल्याने त्याच्या तीन मुलांचा मृत्यू झाला असून त्याच्या पत्नीची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

सोयगाव (जि. औरंगाबाद) : शेतक-याने स्वत:च्या घरातील भाकरीच्या पिठात विष कालवल्याने त्याच्या तीन मुलांचा मृत्यू झाला असून त्याच्या पत्नीची मृत्यूशी झुंज सुरू आहे. न्हावी तांडा येथे सोमवारी रात्री हा प्रकार घडला. घरातील ताणतणाव किंवा आर्थिक चणचणीतून शेतकºयाने कुटुंब संपविण्याचा प्रयत्न केला असावा, अशी चर्चा गावात आहे.पिठात विष कालवल्यानंतर फरार झालेल्या राजू रतन राठोड यास बुधवारी दुपारी सोयगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. तो काहीही बोलत नसल्याने व याप्रकरणी कुणीही तक्रार न दिल्याने सोयगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. राजू हा पत्नी कावेरीबाई (३२), मुलगी ज्योती (१३), गोगली (८) व मुलगा राहुल (१०) यांच्यासह राहत होता. पत्नी शेतातून येण्याच्या आधी सोमवारी सायंकाळी त्याने घर गाठले. डब्यातील ज्वारीच्या पिठात विष कालवले. कावेरीबाई यांनी नेहमीप्रमाणे स्वयंपाक केला. संपूर्ण कुटुंबाने व शेजारील दिनेश राठोडनेही त्यांच्याकडेच जेवण केले. मात्र राजू हा नंतर जेवतो म्हणून घरातून गेला तो परत आलाच नाही. मध्यरात्री पाचही जणांना उलट्या होऊ लागल्याने त्यांना नातेवाईकांनी तातडीने पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा, जि. जळगाव) येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.प्रकृती चिंताजनक झाल्याने सर्वांना जळगावचे सामान्य रुग्णालय व खासगी रुग्णालयात दाखल केले. ज्योती व गोगली यांचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला, तर बुधवारी रात्री राहुल याचाही मृत्यू झाला. कावेरीबाई व दिनेश मृत्यूशी झुंज देत आहेत.>कारण अस्पष्टजळगाव येथील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करुन हे प्रकरण सोयगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. त्यानुसार बुधवारी धिंगापूर धरणाजवळ लपून बसलेल्या राजू यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने पिठात विष का कालवले, याचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत कुणीही फिर्याद दिली नसल्याने आम्ही अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे, असे सोयगावचे सहायक पोलीस निरीक्षक सुजित बडे यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याDeathमृत्यू