शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

कंटाळा विद्यार्थ्यांना, दोष मात्र यंत्रणेला; ४० दिवसांत फक्त १४३७ विद्यार्थ्यांचेच शिष्यवृत्ती अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2022 19:35 IST

समाजकल्याण विभागाने १४ डिसेंबरपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिष्यवृत्ती भरण्यासाठी ‘महाडीबीटी’ पोर्टल सुरू केले. हे अर्ज सादर करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंतची अखेरची मुदत जाहीर केली आहे.

औरंगाबाद : भारत सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेप्रती मागासवर्गीय विद्यार्थी आणि संबंधित महाविद्यालयांची कमालीची उदासिनता दिसून येत आहे. समाज कल्याण विभागाने ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंतची मुदत दिलेली असताना ४० दिवसांत जिल्ह्यातील केवळ १४३७ महाविद्यालयीन मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज परिपूर्ण भरले आहेत. तथापि, गेल्या वर्षी ६५ हजार ६२५ विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला होता. समाजकल्याण विभागाने १४ डिसेंबरपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिष्यवृत्ती भरण्यासाठी ‘महाडीबीटी’ पोर्टल सुरू केले. हे अर्ज सादर करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंतची अखेरची मुदत जाहीर केली आहे. मात्र, एससी, ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता ५ जानेवारीपासून महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. त्यामुळे शिक्षणासाठी ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी गावी परतले.

असे असले तरी शिष्यवृत्तीचा ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना कोठूनही भरता येतो. मात्र, जवळपास ४० हजार विद्यार्थ्यांनी आजपर्यंत ऑनलाईन अर्ज भरलेच नाहीत. अनुसूचित जातीच्या १४६१९ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले. मात्र, यापैकी १०७७ विद्यार्थ्यांचे परिपूर्ण अर्ज महाविद्यालयांनी मंजूर केले. १३ हजार ५४२ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयस्तरावर प्रलंबित आहेत. इतर मागासवर्गीय प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील १४०६१ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. यापैकी अवघ्या ३६० विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांनी मंजूर केले. १३७०१ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयस्तरावर प्रलंबित आहेत. विद्यार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज भरलेले नसतील, तर महाविद्यालयांनी अर्जातील त्रुटीबाबत विद्यार्थ्यांना तसे अवगत करायला हवे होते; परंतु अनेक महाविद्यालयांनी त्याबाबत उदासिनता दाखविलेली आहे. यासंदर्भात समाजकल्याण विभागाने नाराजी व्यक्त केली असून शिष्यवृत्ती योजनेपासून एकही मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहिल्यास त्याला सर्वस्व महाविद्यालये जबाबदार असतील, असा इशारा समाजकल्याण सहायक आयुक्त दत्तात्रय वाघ यांनी दिला आहे.

मागील वर्षी किती विद्यार्थ्यांनी घेतला लाभसन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील एकूण ६५ हजार ६२५ मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घेतला. यापैकी अनुसूचित जातीचे २९ हजार ९६२ विद्यार्थी असून त्यांच्या खात्यात १५ कोटी २० लाख ६० हजार ९५८ रुपये शिष्यवृत्ती जमा करण्यात आली, तर विजाभज, इतर मागासवर्गीय व विशेष मागासवर्गीय प्रवर्गाच्या ३५ हजार ६६३ विद्यार्थ्यांच्या खात्यावर १० कोटी ६८ लाख ३२ हजार ३६८ रुपयांची शिष्यवृत्ती जमा करण्यात आली.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण