शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; मसूद अजहरनं बहिणीवर सोपवली जबाबदारी
2
'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र
3
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
4
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
5
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
6
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
7
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
8
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
9
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
10
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
11
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...
12
Neeraj Chopra Lieutenant Colonel : राजनाथ सिंह अन् सेनाप्रमुखांकडून 'गोल्डन बॉय'चा सन्मान (VIDEO)
13
अंतर्गत मतभेदांदरम्यान टाटा ट्रस्ट्सनं वेणू श्रीनिवासन यांची आजीवन विश्वस्त म्हणून केली नियुक्ती; आता मेहली मिस्त्री यांच्यावर नजर
14
मोठी बातमी! सोन्या-चांदीचा बुडबुडा फुटला....! एकच झटक्यात सोनं 3725 तर चांदी 10549 रुपयांनी स्वस्त! जाणून घ्या कारण
15
भारी! WhatsApp, Instagram चॅटिंग होणार सुरक्षित; स्कॅम रोखण्यासाठी मेटाने आणलं नवीन टूल
16
कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण
17
फ्लॅटमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत होतं जोडपं, दिवाळीच्या दिवशी दुर्गंधी आल्यानं उघडला तर...; दृश्य पाहून सगळेच हादरले
18
हिऱ्याच्या खरेदीपूर्वी ‘हे’ चार नियम माहीत करून घ्या! कट, क्लॅरिटी, कलर, कॅरेटचा फॉर्म्युला काय सांगतो?
19
भारताच्या 'या' स्कीममुळे शेजारी चीनला लागली मिरची; तक्रार घेऊन पोहोचला WTO च्या दरबारी
20
बदल्याची आग! "माझ्यासोबत तुझी बहीण पळून..."; टोमण्यांना कंटाळला, घेतला तरुणाचा जीव

कंटाळा विद्यार्थ्यांना, दोष मात्र यंत्रणेला; ४० दिवसांत फक्त १४३७ विद्यार्थ्यांचेच शिष्यवृत्ती अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2022 19:35 IST

समाजकल्याण विभागाने १४ डिसेंबरपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिष्यवृत्ती भरण्यासाठी ‘महाडीबीटी’ पोर्टल सुरू केले. हे अर्ज सादर करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंतची अखेरची मुदत जाहीर केली आहे.

औरंगाबाद : भारत सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेप्रती मागासवर्गीय विद्यार्थी आणि संबंधित महाविद्यालयांची कमालीची उदासिनता दिसून येत आहे. समाज कल्याण विभागाने ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंतची मुदत दिलेली असताना ४० दिवसांत जिल्ह्यातील केवळ १४३७ महाविद्यालयीन मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज परिपूर्ण भरले आहेत. तथापि, गेल्या वर्षी ६५ हजार ६२५ विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला होता. समाजकल्याण विभागाने १४ डिसेंबरपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिष्यवृत्ती भरण्यासाठी ‘महाडीबीटी’ पोर्टल सुरू केले. हे अर्ज सादर करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंतची अखेरची मुदत जाहीर केली आहे. मात्र, एससी, ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता ५ जानेवारीपासून महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. त्यामुळे शिक्षणासाठी ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी गावी परतले.

असे असले तरी शिष्यवृत्तीचा ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना कोठूनही भरता येतो. मात्र, जवळपास ४० हजार विद्यार्थ्यांनी आजपर्यंत ऑनलाईन अर्ज भरलेच नाहीत. अनुसूचित जातीच्या १४६१९ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले. मात्र, यापैकी १०७७ विद्यार्थ्यांचे परिपूर्ण अर्ज महाविद्यालयांनी मंजूर केले. १३ हजार ५४२ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयस्तरावर प्रलंबित आहेत. इतर मागासवर्गीय प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील १४०६१ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. यापैकी अवघ्या ३६० विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांनी मंजूर केले. १३७०१ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयस्तरावर प्रलंबित आहेत. विद्यार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज भरलेले नसतील, तर महाविद्यालयांनी अर्जातील त्रुटीबाबत विद्यार्थ्यांना तसे अवगत करायला हवे होते; परंतु अनेक महाविद्यालयांनी त्याबाबत उदासिनता दाखविलेली आहे. यासंदर्भात समाजकल्याण विभागाने नाराजी व्यक्त केली असून शिष्यवृत्ती योजनेपासून एकही मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहिल्यास त्याला सर्वस्व महाविद्यालये जबाबदार असतील, असा इशारा समाजकल्याण सहायक आयुक्त दत्तात्रय वाघ यांनी दिला आहे.

मागील वर्षी किती विद्यार्थ्यांनी घेतला लाभसन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील एकूण ६५ हजार ६२५ मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घेतला. यापैकी अनुसूचित जातीचे २९ हजार ९६२ विद्यार्थी असून त्यांच्या खात्यात १५ कोटी २० लाख ६० हजार ९५८ रुपये शिष्यवृत्ती जमा करण्यात आली, तर विजाभज, इतर मागासवर्गीय व विशेष मागासवर्गीय प्रवर्गाच्या ३५ हजार ६६३ विद्यार्थ्यांच्या खात्यावर १० कोटी ६८ लाख ३२ हजार ३६८ रुपयांची शिष्यवृत्ती जमा करण्यात आली.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण