शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
2
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
3
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
4
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
5
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
6
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
7
Online Shopping Tips : ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
8
बॅंक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
9
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
10
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
11
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
12
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
13
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
14
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
15
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
16
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
17
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
18
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
19
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
20
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल

...हा तर उद्योगांसाठी काळा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 00:03 IST

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (दि.९) पुकारलेल्या बंददरम्यान आंदोलकांनी कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केलेल्या तोडफोडीमुळे वाळूज औद्योगिकनगरी चांगलीच हादरली आहे. या घटनेमुळे भविष्यातील नवीन गुंतवणुकीला ब्रेक लागणार असल्याची चिंता उद्योजकांनी मराठवाडा आॅटो क्लस्टर येथे शुक्रवारी आयोजित बैठकीत व्यक्त केली. हा हल्ला म्हणजे उद्योगांसाठी काळा दिवस असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी उमटल्या. हल्ला होत असताना पोलीस निष्क्रिय राहिल्याचाही ठपका ठेवण्यात आला.

ठळक मुद्देवाळूज औद्योगिक वसाहतीत तोडफोड प्रकरण : उद्योजकांकडून चिंता; उद्योगांसाठी काळा दिवस असल्याची संतप्त प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (दि.९) पुकारलेल्या बंददरम्यान आंदोलकांनी कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केलेल्या तोडफोडीमुळे वाळूज औद्योगिकनगरी चांगलीच हादरली आहे. या घटनेमुळे भविष्यातील नवीन गुंतवणुकीला ब्रेक लागणार असल्याची चिंता उद्योजकांनी मराठवाडा आॅटो क्लस्टर येथे शुक्रवारी आयोजित बैठकीत व्यक्त केली. हा हल्ला म्हणजे उद्योगांसाठी काळा दिवस असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी उमटल्या. हल्ला होत असताना पोलीस निष्क्रिय राहिल्याचाही ठपका ठेवण्यात आला.

बंददरम्यान सुमारे १०० पेक्षाही अधिक कंपन्यांमध्ये झालेल्या तोडफोडीमुळे वाळूज महानगरातील औद्योगिक परिसर हादरला आहे. आर्थिक नुकसान आणि उद्योजकांमध्ये निर्माण झालेले भीतीचे वातावरण यासंदर्भात मराठवाडा उद्योजक संघटनेच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या सुरुवातीला सीएमआयएचे राम भोगले यांनी घडलेला प्रकार अतिशय गंभीर असल्याचे सांगून हातात लाठ्या-काठ्या घेऊन दारू पिलेल्या तरुणांच्या जमावाने तोडफोड केल्याचे सांगितले. या हल्ल्यात कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वांनी सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन त्यांनी केले.मसिआचे अध्यक्ष किशोर राठी म्हणाले की, कारखान्यांसाठी हा काळा दिवस आहे. औरंगाबादला पुढे नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शहराचे नाव खराब होईल, अशी कृती कुणी करू नये. आपणही गप्प बसून चालणार नाही.बैठकीत उद्योजकांनी तोडफोडीच्या घटनेचा निषेध करून अनेक सूचना मांडल्या.सुनील किर्दक : या परिसरातील पोलीस ठाणी ही कारखान्यांसाठी आहेत. मात्र पोलीस कारखान्यांसाठी केवळ पाच टक्केच काम करतात. पोलिसांनी कारखान्यांसाठीच १०० टक्के काम करण्याची मागणी केली पाहिजे. कारखान्याच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची असल्याने त्यांनी कारखान्याशी कायम संपर्कात राहिले पाहिजे, असे राठी म्हणाले.सुनील देशपांडे : प्रत्येकाने कारखान्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले पाहिजेत.रोहित दाशरथी : तोडफोड झालेल्या कारखान्याची दुरुस्ती कोण करणार. त्यांची नुकसानभरपाई कशी मिळणार.अनिल साळवे : कारखान्यांवर हल्ल्याच्या घटना घडत असतील तर स्मार्ट सिटी कशी होणार. पोलिसांनी हल्ले होत असताना निव्वळ बघ्याची भूमिका घेतली.सौरभ भोगले : आता राजकीय पुढाऱ्यांना विचारणा केली पाहिजे की महाराष्ट्राला कुठे घेऊन जायचे आहे.गिरीधर कुमार : आंदोलकांनी तोडफोड करून कंपन्या लुटल्या आहेत.अनिल कोरडे : परदेशी व्यक्तींना काही बरे-वाईट झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार.मोहिनी केळकर : वाळूज औद्योगिक परिसरात भक्कम प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा हवी.श्रीकांत मुंदडा : या घटनेच्या निषेधार्थ महिनाभर कारखाने बंद ठेवावेत.बंदमधून उद्योग वगळण्याची मागणीबैठकीत बहुतांशी उद्योजकांनी औरंगाबादला पुढे न्यायचे असेल तर बंद आंदोलन काळात कारखाने वगळण्यात यावे. जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, अशा सूचना मांडल्या. यासंदर्भात सर्व उद्योजक संघटनांची लवकरच बैठक आयोजित करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. बैठकीला उमेश दाशरथी, किशोर राठी, रवींद्र वैद्य, एन. श्रीराम, मकरंद देशपांडे आदींसह तीनशेपेक्षा अधिक उद्योजकांची उपस्थिती होती.जागतिक पातळीवर चुकीचा संदेशवाळूज औद्योगिकनगरीच्या इतिहासात पहिल्यांदाच कारखान्यांवर हल्ले करून मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे. या भागात अनेक बड्या देशी-विदेशी कंपन्या आहेत. तोडफोडीमुळे जागतिक पातळीवर गेलेला चुकीचा संदेश भविष्यात येणाºया नवीन उद्योगांवर मर्यादा घालणारा आहे. अशा घटना घडत असतील तर वाळूज आद्योगिक क्षेत्रात नवीन कंपन्या गुंतवणूक करण्यास पुढे येणार नाहीत, याबाबत बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.

टॅग्स :agitationआंदोलनAurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसीMaratha Reservationमराठा आरक्षण