शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शिवसेनेच्या गडात भाजपचा धुराळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 22:57 IST

शिवसेनेचा गड असलेल्या औरंगाबाद शहरात भाजपने गुरुवारी पूर्णत: धुराळा उडवून टाकला. शहरातील सर्व कार्यक्रम साम, दाम, दंड, भेदाने हायजॅक केले होते. शहरातील प्रत्येक चौक पक्षाने ताब्यात घेत शेकडो वाहनांतून टीव्ही सेंटर येथील सभेला कार्यकर्त्यांची फौज नेण्यात आली. टीव्ही सेंटर येथील सभेतून भाजपने पूर्व, मध्य आणि फुलंब्री विधानसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले.

ठळक मुद्देस्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी मंथन: नशिबाऐवजी संघटनेच्या जोरावर लढणार

औरंगाबाद : शिवसेनेचा गड असलेल्या औरंगाबाद शहरात भाजपने गुरुवारी पूर्णत: धुराळा उडवून टाकला. शहरातील सर्व कार्यक्रम साम, दाम, दंड, भेदाने हायजॅक केले होते. शहरातील प्रत्येक चौक पक्षाने ताब्यात घेत शेकडो वाहनांतून टीव्ही सेंटर येथील सभेला कार्यकर्त्यांची फौज नेण्यात आली. टीव्ही सेंटर येथील सभेतून भाजपने पूर्व, मध्य आणि फुलंब्री विधानसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक कार्यक्रम जालना लोकसभा मतदारसंघात, तर उर्वरित सर्व कार्यक्रम औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात होते. मुंबईतून निघण्यास मुख्यमंत्र्यांना उशीर झाल्यामुळे सगळे कार्यक्रम लांबले. तरीही त्यांनी एका शाहीभोजनाचा कार्यक्रम टाळत सर्व कार्यक्रमांना हजेरी लावली.एमजीएम येथे झालेल्या भाजयुमोच्या विजय लक्ष्य २०१९ या राज्यस्तरीय कार्यशाळेत एनडीए, भाजपवर जनता पुन्हा जबाबदारी देईल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असला तरी स्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून अर्ज भरून घेण्यात आले. त्यामध्ये मतदारसंघासह स्वबळ आजमावण्याबाबत प्रश्न विचारणा करण्यात आल्याची चर्चा होती. सर्व प्रशासकीय विभागनिहाय भाजयुमोच्या सरचिटणीसांनी पदाधिकाºयांशी चर्चा केली. ही चर्चा करताना सरचिटणीसांचे विभाग बदलण्यात आले. त्यामुळे पदाधिकाºयांनी स्पष्टपणे आपले मत सरचिटणीसांना सांगितले.३५ जिल्ह्यांत केला दौराभाजपने ३५ जिल्ह्यांत दौरा केला आहे. त्यातील २३ कामे बुथनिहाय विचारण्यात आली आहेत. नशिबाऐवजी संघटनेवर निवडणूक लढविण्याबाबत भाजपने तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री चषक स्पर्धेत सहभागी झालेल्या ४३ लाख युवक खेळाडूंना भाजपच्या आखाड्यात ओढण्याची व्यूहरचना भाजप आखू लागले आहे. मिल्ट्रीप्रमाणे ही भरती पक्षात आली तरी संकुचित भावनेने कार्यकर्त्यांनी वागू नये, असा सल्ला कार्यशाळेत देण्यात आला.संपर्कमंत्र्यांची गैरहजेरीजिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून काम पाहणाºया ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली. शहरातील बहुतांश होर्डिंग्जवर त्यांचे छायाचित्र देखील काही पदाधिकाºयांनी लावले नाहीत. मुंडे या गैरहजर होत्या की, त्यांना टाळले. यावरून उलटसुलट चर्चा होती.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणBJPभाजपा