शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

जिल्हा परिषदेत शिवसेनेला धोबीपछाड देण्यासाठी भाजपचा 'मास्टर प्लॅन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 12:09 IST

भाजपकडे स्वत:चे २३ सदस्य आहेत. सत्तास्थापनेसाठी ८ सदस्यांची गरज आहे.

ठळक मुद्दे३ जानेवारी रोजी होणार निवडणूकराज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर येणार वेग

औरंगाबाद : जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपला मागील तीन वर्षांपासून सत्तेबाहेर राहावे लागले आहे. याचा वचपा काढण्याची तयारी भाजपच्या वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांच्या ८ सदस्यांना आपल्या बाजूला वळविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यात काँग्रेसचा एक मोठा गट गळाला लावण्यासाठी बोलणी सुरू आहे. यात यश मिळते का, हे ३ जानेवारी रोजी होणाऱ्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतच समजणार आहे.

जि.प.च्या पावणेतीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपचे २३ सदस्य निवडून आले होते. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना १८, काँग्रेस १६, राष्ट्रवादी काँग्रेस ३, मनसे १ आणि रिपाइं (डी)१ सदस्य आहेत. भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेने काँग्रेसशी हातमिळवणी केली होती. त्यावेळी पहिली अडीच वर्षे अध्यक्षपद शिवसेनेला आणि उर्वरित अडीच वर्षे काँग्रेसला देण्याचा ठराव झाल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात आहे. त्यावेळी काँग्रेसचे आमदार असलेले अब्दुल सत्तार हे आता शिवसेनेत आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे ६ सदस्य असल्याचे समोर येत आहे. या सदस्यांमुळे शिवसेनेचे संख्याबळ वाढले आहे. याचवेळी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील समीकरणे बदलली आहेत. 

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आली आहे. त्यामुळे काँग्रेसने दिलेला शब्द पाळण्याचे आवाहन शिवसेनेला केले आहे. मात्र, शिवसेना अध्यक्षपदावरील दावा सोडण्याची शक्यता कमी आहे. दोन्ही पक्षांतील बेबनावाचा फायदा उचण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. भाजपच्या एका जबाबदार सदस्याने सांगितले की, भाजपकडे स्वत:चे २३ सदस्य आहेत. सत्तास्थापनेसाठी ८ सदस्यांची गरज आहे. मनसे, रिपाइं (डेमोक्रॅटिक) प्रत्येकी १ आणि राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांचे मन वळविण्यात यश आल्याचे सांगितले. तसेच उर्वरित चार सदस्यांसाठी काँग्रेसमधील तिसऱ्या इच्छुक गटातील चार सदस्य फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जि.प.मध्ये भाजपची सत्ता आणण्याची जिम्मेदारी ही माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, गंगापूरचे आ. प्रशांत बंब आणि प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्यावर सोपविली आहे. याशिवाय शिवसेनेच्या १७ सदस्यांपैकी असंतुष्ट दोन सदस्यांवरही भाजपची नजर असल्याचे समजते. भाजपच्या या प्रयत्नांना किती यश मिळते, हे ३ जानेवारी रोजीच स्पष्ट होणार आहे.

मतदानातून दाखवून देऊजि.प.च्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येईल. कोणी इतरही पक्ष प्रयत्न करीत असतील तर त्यांना तो अधिकार आहे. महाविकास आघाडीचा एकही सदस्य फुटणार नाही. शिवसेनेच्या सदस्यांना फोडण्याचा तर प्रयत्नही कोणी करू नये, प्रयत्न केल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर मिळेल. अध्यक्ष कोणाचा होणार, हे मतदानातून दाखवून देऊ, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी दिली. भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर म्हणाले, भाजप वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहे. काय होणार, हे आम्ही आताच सांगणार नाहीत. मात्र, नक्कीच काही तरी होणार आहे.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदBJPभाजपाShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक