शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

पूरस्थिती असली तरी पुन्हा भाजपची महाजनादेश यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 12:37 IST

महापुरातून मराठवाड्यातील दुष्काळी भागाकडे ही यात्रा प्रवास करणार आहे.

ठळक मुद्दे२१ ऑगस्ट रोजी आष्टी मतदारसंघातून यात्रेचा मराठवाड्यात प्रवेश होईल. महाजनादेश यात्रा मराठवाड्यातील ३२ मतदारसंघांतून जाणार आहे.

औरंगाबाद : राज्यातील पूरस्थिती अद्याप सुरळीत झालेली नसताना आणि राज्य सरकारकडून अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा २१ ऑगस्टपासून पुन्हा सुरु होणार आहे. महापुरातून मराठवाड्यातील दुष्काळी भागाकडे ही यात्रा प्रवास करणार आहे. 

महापूर स्थिती हाताळण्यावरून सरकारविरोधात जनक्षोभ निर्माण झाला. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ‘सेल्फी स्माईल’ करीत पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळले. अर्धे राज्य पुरात बुडालेले असताना मुख्यमंत्री महाजनादेशात गुंतलेले असल्याची टीका विरोधकांनी सुरू केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना यात्रा अर्धवट सोडून मुंबई गाठावी लागली. त्यांनी पूरपरिस्थितीतून कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही जिल्ह्यांना बाहेर काढण्यासाठी यंत्रणेला आदेश दिले. मात्र अद्यापही परिस्थिती गंभीर असताना आणि पुरानंतरच्या मदतीबाबत तसेच आरोग्याच्या प्रश्नाबाबत ठोस उपाययोजना झालेली नसताना महाजनादेश यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. त्यात काही बदल करण्यात आले आहेत. महाजनादेश यात्रा मराठवाड्यातील ३२ मतदारसंघांतून जाणार आहे. आता ही यात्रा २१ ते ३१ ऑगस्टपर्यंत आहे. विभागात १६ आमदार भाजपचे आहेत, तर शिवसेनेचे १५ आमदार आहेत. ३२ मतदारसंघ यात्रेच्या माध्यमातून ढवळून काढल्यानंतर जो जनादेश भाजपच्या पदरी पडेल त्यावर शिवसेनेसोबत युती करायची, की स्वतंत्र लढायचे, याबाबत पक्षांतर्गत चिंतन होण्याची शक्यता आहे. 

स्वबळाची चाचपणी २१ ऑगस्ट रोजी आष्टी मतदारसंघातून यात्रेचा मराठवाड्यात प्रवेश होईल. तेथून बीड, गेवराई तेथून पुढे अंबड व बदनापूर या भागातून औरंगाबाद पूर्व मतदारसंघात सभा होईल. फुलंब्री, सिल्लोड, भोकरदन, जालना, मंठा, सेलू, पाथरी, मानवत, परभणीत भाजपची हवा करण्यात येईल. नंतर औंढा नागनाथ, हिंगोली, कळमनुरी, अर्धापूर, नांदेड, लोहा, अहमदपूर, उदगीर, लातूर, निलंगा, औसा, उस्मानाबाद व तुळजापूरमार्गे सोलापूर जिल्ह्याकडे ही यात्रा रवाना होईल. १० दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या काही मतदारसंघांत सभा होणार आहेत. या सभांमधून स्वबळाची चाचपणी करण्यात येईल, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.

टॅग्स :BJPभाजपाMarathwadaमराठवाडाfloodपूर