शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

जुमलेबाजीला कंटाळलेल्या जनतेच्या मनातील असंतोषच करणार भाजपचे पतन : अशोक चव्हाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 15:21 IST

‘नवनव्या जुमलेबाजीला कंटाळलेल्या जनतेच्या मनात भडकलेला असंतोषच आगामी निवडणुकीत भाजप-सेनेला हरवण्यास कारणीभूत ठरेल,’

औरंगाबाद : ‘नवनव्या जुमलेबाजीला कंटाळलेल्या जनतेच्या मनात भडकलेला असंतोषच आगामी निवडणुकीत भाजप-सेनेला हरवण्यास कारणीभूत ठरेल,’ असे आज येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. याचवेळी त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारने पाच हजार कोटींची आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली. गंभीर दुष्काळ व मध्यम दुष्काळ असा शब्दांचा खेळ बंद करून दुष्काळग्रस्तांना भरीव अशी काय मदत करणार, हे सरकार का जाहीर करीत नाही ? असा संतप्त सवाल चव्हाण यांनी विचारला.

गुरुवारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जनसंघर्ष यात्रेच्या जाहीर सभेपूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीतच अशोक चव्हाण यांनी युती सरकारच्या चार वर्षांच्या कारभाराची चिरफाड करायला सुरुवात केली. खरगे हे मध्येच उठून गेल्यामुळेही त्यांचा व पत्रकारांचा संवाद होऊ शकला नाही. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांचे विमान औरंगाबादला पोहोचले नव्हते. त्यामुळे ते पत्रपरिषदेस उपस्थित नव्हते. महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना परवाच्या दिवशी जायकवाडी पाणी प्रश्नावरून असंतोषास सामोरे जावे लागले होते. आजच्या पत्रपरिषदेत हा प्रश्न आला; पण उत्तर द्यायला विखे पाटील नव्हते. 

परिवर्तन होणारचआम्ही जनसंघर्ष यात्रा सुरू केली आहे. आतापर्यंत अठरा जिल्ह्यांमध्ये ही यात्रा फिरली. हे सरकार जात नाही तोपर्यंत आमचा संघर्ष चालूच राहणार आहे. राज्यात परिवर्तन होईल, असा विश्वास खा. चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

शेवटची घंटा वाजवली‘युती सरकारची चार वर्षे’ असे लिहून त्याखाली एक घंटा ठेवलेली होती. ही घंटा वाजवण्याचा मान अ.भा. काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांना देण्यात आला. पत्रपरिषदेतच हा कार्यक्रम झाला. एक अर्जंट फोन कॉलवर बोलण्यासाठी खरगे पत्रपषिदेतून उठून गेले होते. बराच वेळ ते आले नाहीत; पण त्यांच्याच हस्ते युती सरकारची शेवटची घंटा वाजवायची होती. त्यामुळे त्यांची प्रतीक्षा सुरू होती. ते येईपर्यंत काँग्रेसच्या सोशल मीडियाने तयार केलेले ‘मेरे अच्छे दिन कब आयेेंगे’ हे गीत ऐकवण्यात आले. खरगे यांना बोलावून आणण्यासाठी प्रदेश प्रवक्ते राजू वाघमारे व अन्य काही जणांना पाठवण्यात आले. शेवटी मल्लिकार्जुन खरगे आले आणि त्यांनी युती सरकारच्या शेवटच्या घंटेची दोरी हातात धरून ती वाजवली.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेस