शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

जुमलेबाजीला कंटाळलेल्या जनतेच्या मनातील असंतोषच करणार भाजपचे पतन : अशोक चव्हाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 15:21 IST

‘नवनव्या जुमलेबाजीला कंटाळलेल्या जनतेच्या मनात भडकलेला असंतोषच आगामी निवडणुकीत भाजप-सेनेला हरवण्यास कारणीभूत ठरेल,’

औरंगाबाद : ‘नवनव्या जुमलेबाजीला कंटाळलेल्या जनतेच्या मनात भडकलेला असंतोषच आगामी निवडणुकीत भाजप-सेनेला हरवण्यास कारणीभूत ठरेल,’ असे आज येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. याचवेळी त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारने पाच हजार कोटींची आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली. गंभीर दुष्काळ व मध्यम दुष्काळ असा शब्दांचा खेळ बंद करून दुष्काळग्रस्तांना भरीव अशी काय मदत करणार, हे सरकार का जाहीर करीत नाही ? असा संतप्त सवाल चव्हाण यांनी विचारला.

गुरुवारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जनसंघर्ष यात्रेच्या जाहीर सभेपूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीतच अशोक चव्हाण यांनी युती सरकारच्या चार वर्षांच्या कारभाराची चिरफाड करायला सुरुवात केली. खरगे हे मध्येच उठून गेल्यामुळेही त्यांचा व पत्रकारांचा संवाद होऊ शकला नाही. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांचे विमान औरंगाबादला पोहोचले नव्हते. त्यामुळे ते पत्रपरिषदेस उपस्थित नव्हते. महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना परवाच्या दिवशी जायकवाडी पाणी प्रश्नावरून असंतोषास सामोरे जावे लागले होते. आजच्या पत्रपरिषदेत हा प्रश्न आला; पण उत्तर द्यायला विखे पाटील नव्हते. 

परिवर्तन होणारचआम्ही जनसंघर्ष यात्रा सुरू केली आहे. आतापर्यंत अठरा जिल्ह्यांमध्ये ही यात्रा फिरली. हे सरकार जात नाही तोपर्यंत आमचा संघर्ष चालूच राहणार आहे. राज्यात परिवर्तन होईल, असा विश्वास खा. चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

शेवटची घंटा वाजवली‘युती सरकारची चार वर्षे’ असे लिहून त्याखाली एक घंटा ठेवलेली होती. ही घंटा वाजवण्याचा मान अ.भा. काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांना देण्यात आला. पत्रपरिषदेतच हा कार्यक्रम झाला. एक अर्जंट फोन कॉलवर बोलण्यासाठी खरगे पत्रपषिदेतून उठून गेले होते. बराच वेळ ते आले नाहीत; पण त्यांच्याच हस्ते युती सरकारची शेवटची घंटा वाजवायची होती. त्यामुळे त्यांची प्रतीक्षा सुरू होती. ते येईपर्यंत काँग्रेसच्या सोशल मीडियाने तयार केलेले ‘मेरे अच्छे दिन कब आयेेंगे’ हे गीत ऐकवण्यात आले. खरगे यांना बोलावून आणण्यासाठी प्रदेश प्रवक्ते राजू वाघमारे व अन्य काही जणांना पाठवण्यात आले. शेवटी मल्लिकार्जुन खरगे आले आणि त्यांनी युती सरकारच्या शेवटच्या घंटेची दोरी हातात धरून ती वाजवली.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेस