शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जुमलेबाजीला कंटाळलेल्या जनतेच्या मनातील असंतोषच करणार भाजपचे पतन : अशोक चव्हाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 15:21 IST

‘नवनव्या जुमलेबाजीला कंटाळलेल्या जनतेच्या मनात भडकलेला असंतोषच आगामी निवडणुकीत भाजप-सेनेला हरवण्यास कारणीभूत ठरेल,’

औरंगाबाद : ‘नवनव्या जुमलेबाजीला कंटाळलेल्या जनतेच्या मनात भडकलेला असंतोषच आगामी निवडणुकीत भाजप-सेनेला हरवण्यास कारणीभूत ठरेल,’ असे आज येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. याचवेळी त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारने पाच हजार कोटींची आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली. गंभीर दुष्काळ व मध्यम दुष्काळ असा शब्दांचा खेळ बंद करून दुष्काळग्रस्तांना भरीव अशी काय मदत करणार, हे सरकार का जाहीर करीत नाही ? असा संतप्त सवाल चव्हाण यांनी विचारला.

गुरुवारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जनसंघर्ष यात्रेच्या जाहीर सभेपूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीतच अशोक चव्हाण यांनी युती सरकारच्या चार वर्षांच्या कारभाराची चिरफाड करायला सुरुवात केली. खरगे हे मध्येच उठून गेल्यामुळेही त्यांचा व पत्रकारांचा संवाद होऊ शकला नाही. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांचे विमान औरंगाबादला पोहोचले नव्हते. त्यामुळे ते पत्रपरिषदेस उपस्थित नव्हते. महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना परवाच्या दिवशी जायकवाडी पाणी प्रश्नावरून असंतोषास सामोरे जावे लागले होते. आजच्या पत्रपरिषदेत हा प्रश्न आला; पण उत्तर द्यायला विखे पाटील नव्हते. 

परिवर्तन होणारचआम्ही जनसंघर्ष यात्रा सुरू केली आहे. आतापर्यंत अठरा जिल्ह्यांमध्ये ही यात्रा फिरली. हे सरकार जात नाही तोपर्यंत आमचा संघर्ष चालूच राहणार आहे. राज्यात परिवर्तन होईल, असा विश्वास खा. चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

शेवटची घंटा वाजवली‘युती सरकारची चार वर्षे’ असे लिहून त्याखाली एक घंटा ठेवलेली होती. ही घंटा वाजवण्याचा मान अ.भा. काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांना देण्यात आला. पत्रपरिषदेतच हा कार्यक्रम झाला. एक अर्जंट फोन कॉलवर बोलण्यासाठी खरगे पत्रपषिदेतून उठून गेले होते. बराच वेळ ते आले नाहीत; पण त्यांच्याच हस्ते युती सरकारची शेवटची घंटा वाजवायची होती. त्यामुळे त्यांची प्रतीक्षा सुरू होती. ते येईपर्यंत काँग्रेसच्या सोशल मीडियाने तयार केलेले ‘मेरे अच्छे दिन कब आयेेंगे’ हे गीत ऐकवण्यात आले. खरगे यांना बोलावून आणण्यासाठी प्रदेश प्रवक्ते राजू वाघमारे व अन्य काही जणांना पाठवण्यात आले. शेवटी मल्लिकार्जुन खरगे आले आणि त्यांनी युती सरकारच्या शेवटच्या घंटेची दोरी हातात धरून ती वाजवली.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेस