शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवण्याचा डाव; शिवसेनेचा भाजपवर गंभीर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 17:51 IST

राज्यासह केंद्रातील भाजपा सरकारने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवण्याचा डाव आखला असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेतर्फे करण्यात आला.

ठळक मुद्देसरकारने चार वर्षात घोषीत केलेल्या ६५० योजनांची शिवसेना चिरफाड करणार

औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आॅनलाईन सातबारा देणे बंद केले आहे. तलाठी शेतकऱ्यांना आॅफलाईनही सातबारा देत नाहीत. याचा फटका शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी तयार कराव्या लागणाऱ्या फाईलला बसत आहे. राज्यासह केंद्रातील भाजपा सरकारने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवण्याचा डाव आखला असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेतर्फे करण्यात आला. चार वर्षात सरकारने ६५० योजनांची घोषणा केली. मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नसल्यामुळे त्याची चिरफाड करण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

शिवसेनेतर्फे शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिककर्ज, स्टॅडप इंडिया, मुद्रा लोण या बँकांशी निगडीत असलेल्या योजनातील सत्य माहिती समोर आणण्यासाठी जिल्ह्याची लिड बँक असलेल्या बँक आॅफ महाराष्ट्रच्या सिडकोतील विभागीय कार्यालयासमोर आज (दि.९) ‘सत्याशोधन आंदोलन’ करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फसव्या सरकारच्या घोषणांविरोधात निदर्शने केली. भाजप सरकारला शिव्यांची लाखोली वाहण्यात आली. तसेच कर्जमाफी, पिक कर्जाचे वाटप, मुद्रा लोन अशा विविध सरकारी योजनाची आकडेवारी मांडण्याची आग्रही मागणी केली. 

यावेळी घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. शेवटी बँकच्या विभागीय अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना सामोरे जात आकडेवारीसह वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही आकडेवारी सादर करत अधिकाऱ्यांना उघडे पाडले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, अनिल पोलकर, संतोष जेजुरकर, राजु राठोड, बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, गणेश चोपडे, राजू वैद्य, विश्वनाथ स्वामी, सचिन खैरे, रंजना कुलकर्णी, राजेंद्र दानवे आदींसह शेकडो पदाधिकारी उपस्थितीत होते.

कर्जमाफीच्या फसव्या योजनेचा निषेधराज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती. मात्र ही योजनाच फसवी असल्याचे दिसून आले आहे. योजनेला सुरुवात होऊन वर्ष झाले आहे. यात ३ लाख ३६ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. यातील १ लाख ४२ हजार शेतकऱ्यांना कोणताही लाभ मिळालेला नसल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. सरकारने चार वर्षात घोषीत केलेल्या ६५० योजनांची शिवसेना अशीच चिरफाड करणार असल्याचेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाagitationआंदोलनFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकार