शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भाजपवाल्यांनी नाक रगडून माफी मागावी, अन्यथा जनता टकमक टोकावर नेईल: अंबादास दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 16:56 IST

दिल्ली दरबारी भाजप नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या बदनामीचा विडा उचलला

औरंगाबाद: अफझल खानाने शिवाजी महाराजांच्या विरोधात ज्या प्रकारे विजापूरच्या दरबारात विडा उचलला होता, त्याच प्रमाणे भाजप नेत्यांनी दिल्ली दरबारी शिवाजी महाराजांच्या बदनामीचा विडा उचलला असल्याचे दिसते, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली. तसेच राज्यातील जनतेसमोर भाजपच्या सर्वांनी नाक रगडून माफी मागावी अन्यथा जनता यांना टकमक टोकावर नेईल, असा इशारा देखील आ. दानवे यांनी दिला. 

आ. दानवे पुढे म्हणाले, केवळ राज्यपाल यांनी एकट्यानीच वक्तव्य केले नाही. भाजपाच्या वेगवेगळ्या नेत्यांनी वक्तव्य केले आहे. एक त्रिवेदी प्रवक्ता आहेत त्यांनी केले, इथे लाड हे बोले, एक केंद्रीय मंत्री आहेत ते बोलले. या सगळ्या लोकांनी दिल्ली दरबारात छत्रपती शिवरायांच्या बदनामीचा विडा उचलल्याचे दिसत आहे. असे तर छत्रपती शिवाजी महाराजांना काही करता येत नाही. यामुळे भाजपाने हा विडा उचलला आहे. अफझल खानाने विजापूर दरबारात शिवाजी महाराजांच्या विरोधात विडा उचलला होता या घटनेशी आ. दानवे यांनी सातत्याने शिवाजी महाराजांची होत असलेल्या बदनामीच्या घटनांची तुलना करत भाजपवर हल्लाबोल केला. या प्रवृत्तीच्या विरोधात मोर्चा आहे. यांना धडा शिकवण्यासाठी हा मोर्चा असेल. येथून गेलेले उद्योगधंदे, महिलांचा अवमान असे विषय घेऊन आमचा मोर्चा निघणार आहे, असेही दानवे यांनी स्पष्ट केले. 

नाक घासून माफी मागावी, अन्यथा टकमक टोकछत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी ठरवून होत आहे. महाराजांच्या विरोधातील वक्तव्य विषारी असून ठरवून केलेली आहेत. सहज झालेले नाही, हे ठरवून झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला हे राज्यातील लहान मुलांना देखील माहिती आहे. हे कुठे झाल्याचे सांगत आहेत? या सर्वांनी महाराष्ट्राच्या जनेतसमोर मातीत नाक रगडून माफी मागायला हवी. तेव्हा जनता त्यांना माफ करेल. रायगडावर, शिवतीर्थावर किंवा शिवनेरी जाऊन नाक रगडावे अन्यथा जनता यांना टकमक टोकावर नेईन असा इशारा देखील आ. दानवे यांनी दिला. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAmbadas Danweyअंबादास दानवेShiv Senaशिवसेना