शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

भाजपवाल्यांनी नाक रगडून माफी मागावी, अन्यथा जनता टकमक टोकावर नेईल: अंबादास दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 16:56 IST

दिल्ली दरबारी भाजप नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या बदनामीचा विडा उचलला

औरंगाबाद: अफझल खानाने शिवाजी महाराजांच्या विरोधात ज्या प्रकारे विजापूरच्या दरबारात विडा उचलला होता, त्याच प्रमाणे भाजप नेत्यांनी दिल्ली दरबारी शिवाजी महाराजांच्या बदनामीचा विडा उचलला असल्याचे दिसते, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली. तसेच राज्यातील जनतेसमोर भाजपच्या सर्वांनी नाक रगडून माफी मागावी अन्यथा जनता यांना टकमक टोकावर नेईल, असा इशारा देखील आ. दानवे यांनी दिला. 

आ. दानवे पुढे म्हणाले, केवळ राज्यपाल यांनी एकट्यानीच वक्तव्य केले नाही. भाजपाच्या वेगवेगळ्या नेत्यांनी वक्तव्य केले आहे. एक त्रिवेदी प्रवक्ता आहेत त्यांनी केले, इथे लाड हे बोले, एक केंद्रीय मंत्री आहेत ते बोलले. या सगळ्या लोकांनी दिल्ली दरबारात छत्रपती शिवरायांच्या बदनामीचा विडा उचलल्याचे दिसत आहे. असे तर छत्रपती शिवाजी महाराजांना काही करता येत नाही. यामुळे भाजपाने हा विडा उचलला आहे. अफझल खानाने विजापूर दरबारात शिवाजी महाराजांच्या विरोधात विडा उचलला होता या घटनेशी आ. दानवे यांनी सातत्याने शिवाजी महाराजांची होत असलेल्या बदनामीच्या घटनांची तुलना करत भाजपवर हल्लाबोल केला. या प्रवृत्तीच्या विरोधात मोर्चा आहे. यांना धडा शिकवण्यासाठी हा मोर्चा असेल. येथून गेलेले उद्योगधंदे, महिलांचा अवमान असे विषय घेऊन आमचा मोर्चा निघणार आहे, असेही दानवे यांनी स्पष्ट केले. 

नाक घासून माफी मागावी, अन्यथा टकमक टोकछत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी ठरवून होत आहे. महाराजांच्या विरोधातील वक्तव्य विषारी असून ठरवून केलेली आहेत. सहज झालेले नाही, हे ठरवून झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला हे राज्यातील लहान मुलांना देखील माहिती आहे. हे कुठे झाल्याचे सांगत आहेत? या सर्वांनी महाराष्ट्राच्या जनेतसमोर मातीत नाक रगडून माफी मागायला हवी. तेव्हा जनता त्यांना माफ करेल. रायगडावर, शिवतीर्थावर किंवा शिवनेरी जाऊन नाक रगडावे अन्यथा जनता यांना टकमक टोकावर नेईन असा इशारा देखील आ. दानवे यांनी दिला. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAmbadas Danweyअंबादास दानवेShiv Senaशिवसेना