शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

भाजपवाल्यांनी नाक रगडून माफी मागावी, अन्यथा जनता टकमक टोकावर नेईल: अंबादास दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 16:56 IST

दिल्ली दरबारी भाजप नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या बदनामीचा विडा उचलला

औरंगाबाद: अफझल खानाने शिवाजी महाराजांच्या विरोधात ज्या प्रकारे विजापूरच्या दरबारात विडा उचलला होता, त्याच प्रमाणे भाजप नेत्यांनी दिल्ली दरबारी शिवाजी महाराजांच्या बदनामीचा विडा उचलला असल्याचे दिसते, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली. तसेच राज्यातील जनतेसमोर भाजपच्या सर्वांनी नाक रगडून माफी मागावी अन्यथा जनता यांना टकमक टोकावर नेईल, असा इशारा देखील आ. दानवे यांनी दिला. 

आ. दानवे पुढे म्हणाले, केवळ राज्यपाल यांनी एकट्यानीच वक्तव्य केले नाही. भाजपाच्या वेगवेगळ्या नेत्यांनी वक्तव्य केले आहे. एक त्रिवेदी प्रवक्ता आहेत त्यांनी केले, इथे लाड हे बोले, एक केंद्रीय मंत्री आहेत ते बोलले. या सगळ्या लोकांनी दिल्ली दरबारात छत्रपती शिवरायांच्या बदनामीचा विडा उचलल्याचे दिसत आहे. असे तर छत्रपती शिवाजी महाराजांना काही करता येत नाही. यामुळे भाजपाने हा विडा उचलला आहे. अफझल खानाने विजापूर दरबारात शिवाजी महाराजांच्या विरोधात विडा उचलला होता या घटनेशी आ. दानवे यांनी सातत्याने शिवाजी महाराजांची होत असलेल्या बदनामीच्या घटनांची तुलना करत भाजपवर हल्लाबोल केला. या प्रवृत्तीच्या विरोधात मोर्चा आहे. यांना धडा शिकवण्यासाठी हा मोर्चा असेल. येथून गेलेले उद्योगधंदे, महिलांचा अवमान असे विषय घेऊन आमचा मोर्चा निघणार आहे, असेही दानवे यांनी स्पष्ट केले. 

नाक घासून माफी मागावी, अन्यथा टकमक टोकछत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी ठरवून होत आहे. महाराजांच्या विरोधातील वक्तव्य विषारी असून ठरवून केलेली आहेत. सहज झालेले नाही, हे ठरवून झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला हे राज्यातील लहान मुलांना देखील माहिती आहे. हे कुठे झाल्याचे सांगत आहेत? या सर्वांनी महाराष्ट्राच्या जनेतसमोर मातीत नाक रगडून माफी मागायला हवी. तेव्हा जनता त्यांना माफ करेल. रायगडावर, शिवतीर्थावर किंवा शिवनेरी जाऊन नाक रगडावे अन्यथा जनता यांना टकमक टोकावर नेईन असा इशारा देखील आ. दानवे यांनी दिला. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAmbadas Danweyअंबादास दानवेShiv Senaशिवसेना