शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

देशाकडे पंतप्रधानपदाला पर्याय नव्हता आणि नाही, पण...; राज ठाकरेंनी सांगितला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 12:00 IST

जातीचा माणूस पाहून मतदान होणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. भाजपा-सेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून राज्य खराब करताहेत.

औरंगाबादः पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय काय?, असा प्रश्न हल्ली विचारला जातो. पण, आपल्या देशाचा पंतप्रधान कोण होईल, यासाठी आत्तापर्यंत कधीच पर्याय दिले गेले नव्हते. मग ते पंडित नेहरू असोत, इंदिरा गांधी, लाल बहादूर शास्त्री किंवा राजीव गांधी. यावेळीही आपल्याकडे पंतप्रधानपदाला पर्याय नाही, पण २०१९ मध्ये भाजपा-शिवसेनेचं सरकार येणार नाही, असा ठाम विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज व्यक्त केला. 

जातीचा माणूस पाहून मतदान होणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. भाजपा-सेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून राज्य खराब करताहेत. हेच सुरू राहिलं, तर महाराष्ट्र खड्ड्यात जाईल, असा धोकाही त्यांनी वर्तवला. 

मराठवाडा दौऱ्याच्या पहिल्या दिवशी राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्या पत्रकार परिषदेतील काही मुद्दे असे... 

>> मोदींना पर्याय काय?... पर्याय कधीपासून शोधायला लागलात तुम्ही?... कोणत्या पंतप्रधानाच्या वेळी तुम्हाला पर्याय होता?

>>नरेंद्र मोदींसारखा एक पंतप्रधान हवा, असं मीच पहिल्यांदा म्हटलं होतं. पण पंतप्रधान झाल्यावर माणूस फिरला. ते बदलल्यावर माझी भूमिका बदलली.

>> आपल्या देशाला पंतप्रधान ठरवण्याचा पर्याय कुठेय?... पण २०१९ ला हे सरकार परत येणार नाही. त्याची रणनीती ठरवेन मी. 

>> मला मराठवाड्याची आठवण येत होती. पण बाकीचे नालायक ठरल्याशिवाय तुम्हाला आमची आठवण होत नाही.   

>> ज्यांच्या हातात सत्ता दिलीत, त्यांनी तुमची विल्हेवाट लावलीय. राज्याचा सत्यानाश केलाय. 

>> भाजपा ईव्हीएमचा फायदा घेऊन निवडणुका लढवतोय. नाहीतर, उमेदवारांना शून्य मतं कशी मिळू शकतात? नाशिकमध्येही तसाच निकाल आला.

>> नाशिकमध्ये कचराप्रश्नाचं नियोजन पाच वर्षांत करून दाखवलं. इथे २५ वर्षं जे सत्ता करताहेत त्या शिवसेनेला तुम्ही का विचारत नाही?

>> महापालिका खाऊन खाऊन रिकामी करण्यासाठी असते का?

>> माझ्या हातात सत्ता आल्याशिवाय काही करून दाखवू शकणार नाही. 

>> मनसेच्या राज्य कार्यकारिणीत मराठवाड्याला स्थान असेल.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीMNSमनसेAurangabadऔरंगाबाद