शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रिपदासाठी भाजप, शिंदे सेनेत रस्सीखेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 19:18 IST

शिंदे गटाऐवजी भाजपला मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे पालकमंत्रिपद हवे असल्याचे बोलले जात आहे.

औरंगाबाद : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्याला सहकार, कृषी, रोहयो ही खाते मिळाली आहेत. जिल्ह्यास मंत्रिपदे मिळाली; पण आता भाजप आणि शिंदे सेनेत पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. पालकमंत्री भाजप की शिंदे गटाचा, याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे सांगून भाजपने सध्या तोंडावर बोट ठेवले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले. यात सहकार व इतर मागास-बहुजन कल्याण खाते आ. अतुल सावे यांना मिळाले. ते २०१९ साली सहा महिन्यांसाठी उद्योग राज्यमंत्री होते. आ. संदीपान भुमरे यांना गेल्या सरकारच्या काळात असलेले रोहयो व फलोत्पादन हे खाते मिळाले आहे, तर आ. अब्दुल सत्तार यांना कृषिखाते मिळाले आहे. यापैकी आ. भुमरे यांनी स्वातंत्र्यदिनी औरंगाबादमध्ये मुख्य ध्वजारोहण केले. सत्तार यांनी जालन्यात, तर सावे यांनी परभणीत ध्वजारोहण केले. या प्रकारामुळे ज्यांनी ध्वजारोहण केले, तेच त्या जिल्ह्याचे पालकमंत्री होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.

मात्र, मागील दोन दिवसांपासून राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. शिंदे गटाऐवजी भाजपला मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे पालकमंत्रिपद हवे असल्याचे बोलले जात आहे. सहकारमंत्री सावे किंवा रोहयोमंत्री भुमरे यांच्यापैकी एकाला संधी मिळावी; परंतु कृषिमंत्री सत्तार यांना दूर ठेवावे, यासाठीदेखील काहीजण मुख्यमंत्र्यांना भेटल्याची चर्चा आहे. आ. संजय शिरसाट यांनी बंडखोरी करण्यासाठी सर्व आमदारांची मोट बांधली आणि त्यांनाच ऐनवेळी मंत्रिपदाने हुलकावणी दिली. त्यामुळे ते नाराज आहेत. असे असले तरी त्यांनी गुरुवारी शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांना शिंदे गटात खेचले. त्रिवेदींना शिंदे गटात आणून त्यांनी मुख्यमंत्र्यांची स्वत:वर असलेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

मुख्यमंत्री निर्णय घेतीलकेंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना पालकमंत्री कोण होणार, सहकारमंत्री सावे की रोहयो मंत्री भुमरे, की या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होणार, यावर डॉ. कराड यांनी सांगितले, पालकमंत्री कोणाला करायचे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. ते ज्यांच्याकडे जबाबदारी देतील, तो पालकमंत्री होईल. सहकारमंत्री सावे यांना विचारले असता त्यांनीदेखील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, असे सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAbdul Sattarअब्दुल सत्तारAtul Saveअतुल सावेSandeepan Bhoomraसंदीपान भुमरे