शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

बदलापूर घटनेतील नराधमांना फाशी देण्याच्या मागणीसाठी भाजपची निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 20:09 IST

नाजूक घटनेवरही विरोधक राजकारण करीत असल्याचा मंत्री अतुल सावे यांचा आरोप

छत्रपती संभाजीनगर: बदलापूर येथील घटनेतील नराधमांविरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना फासावर लटकविण्यात यावे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. आरोपींना फाशी झालीच पाहिजे अशा घोषणा आंदोलक देत होते. 

बदलापूर येथील शाळकरी मुलींवरील अत्याचाराच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीने राज्यभर आंदोलन छेडल्याचे समजातच भाजपनेही आंदोलनाची हाक दिली होती. गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी क्रांतीचौक येथे भाजपने निदर्शने केली. बदलापूर येथील चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी झालीच पाहिजे, अशा घोषणा आंदोलक देत होते. या आंदोलनात भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, दीपक ढाकणे, लक्ष्मिकांत थेटे, जालिंदर शेंडगे, समीर राजूरकर, अमृता पालोदकर, वर्षा साळुंके, मनीषा भंसाळी, डॉ. उज्वला दहिफळे, मीना मिसाळ, शितल खरात,आशा खरात,सुवर्णा धानोरकर, जयश्री दाभाडे, लक्ष्मण शिंदे, मनोज पांगारकर, अशोक दामले, बबन नरवडे, महेश माळवदकर, ज्ञानेश्वर गायकवाड, अर्जून गवारे,संतोष बोधक भाजपच्या विविध विंगचे पदाधिकारी उपस्थित होते.

स्त्री -पुरूष समानतेची घेतली शपथयावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भारतमातेला स्मरून स्त्री पुरूष समानतेची शपथ घेतली. यापुढे कुटुंब आणि सामाजात स्त्री, पुरूष समानतेची जाणीव व जागृतीसाठी अखंड प्रयत्न करण्यात येईल, वयाने ज्येष्ठ, कनिष्ठ स्त्रियांचा सन्मान, प्रतिष्ठा आणि आदर ठेवण्याचे कर्तव्य राहिल. स्त्रीशिक्षणाला आणि त्यांचे कल्याण, त्यांच्या प्रति सुरक्षिततेसाठी प्राणपणाने कार्य करण्याची शपथ यावेळी घेण्यात आली. स्त्रियांचा आदर, सन्मान न जपणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढण्याचे ध्येय राहिल, स्त्रियांप्रती छत्रपती शिवरायांचा आदर्श अखंडपणे समोर ठेेवेन असे या शपथेत नमूद करण्यात आले.

स्त्री,पुरूष समानतेबाबत जनजागृती करणारचिमुरडीवरील अत्याचाराच्या नाजूक घटनेवर महाविकास आघाडी राजकारण करीत असल्याचा आरोप मंत्री अतुल सावे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलाना केला. ते म्हणाले की, चिमुरडीवरील अत्याचाराच्या घटनेतील नराधमांना फाशी व्हावी, ही समाजाची भूमिका आहे. आज आम्ही येथे स्त्री-पुरूष समानतेची शपथ घेतली. शिवाय आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्त्री,पुरूष समानतेबाबत समाजात जनजागृती करणार आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBJPभाजपा