शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

भाजप, एमआयएमचे संबंध कळेना ! माझ्यापेक्षा बागडेंनी एमआयएमच्या आमदाराला बोलण्याची दिली जास्त संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 20:01 IST

अब्दुल सत्तार यांनी फुलंब्रीतील कार्यक्रमात बागडेंच्या उपस्थितीत मारला टोला 

ठळक मुद्देराजकीय पोळी भाजून घ्यायची, ही भाजप आणि एमआयएमची पद्धत आहे. याचा प्रत्यय मला हरिभाऊ बागडे विधानसभा अध्यक्ष असताना येत होता. 

फुलंब्री : राज्यात युतीच्या सत्तेत  हरिभाऊ बागडे विधानसभेचे अध्यक्ष असताना त्यांनी सभागृहात मला बोलण्याची फार कमी संधी दिली. याउलट ते माझ्यापेक्षा एमआयएमच्या आमदाराला बोलण्याची जास्त संधी देत होते. त्यामुळे भाजप आणि एमआयएमचे काय संबंध होते ते मला अजूनही कळाले नाही, असा टोला महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी फुलंब्री तालुक्यातील खामगाव फाटा येथे रविवारी झालेल्या कार्यक्रमात बागडे य यांना लगावला.  

खामगाव फाटा येथे शासकीय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी अब्दुल सत्तार होते. यावेळी व्यासपीठावर हरिभाऊ बागडेही उपस्थित होते. अब्दुल सत्तार आपल्या खास शैलीत म्हणाले की, भाजप आणि एमआयएमचे संबंध काय आहेत, हे अजूनही बहुतांश लोकांना कळलेले नाहीत. त्यात मीसुद्धा आहे. निवडणुकीच्या काळात एकमेकांवर जहरी टीका करायची आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची, ही भाजप आणि एमआयएमची पद्धत आहे. याचा प्रत्यय मला हरिभाऊ बागडे विधानसभा अध्यक्ष असताना येत           होता. बागडे यांच्यासंबंधीची तक्रार करताना अब्दुल सत्तार यांनी एमआयएमच्या आमदारास त्यांच्याकडून सातत्याने प्राधान्य मिळत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला पणनचे संचालक शिवाजी दसपुते, राष्ट्रवादीचे जिल्हाप्रमुख कैलास पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, बांधकाम सभापती किशोर बलांडे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन देशमुख, तालुकाप्रमुख राजेंद्र ठोंबरे, तहसीलदार शीतल राजपूत, सहायक निबंधक विष्णू रोडगे, सभापती चंद्रकांत जाधव, उपसभापती राहुल डकले, शिवाजी पाथ्रीकर, प्रभाकर आदी उपस्थित होते. 

केंद्राकडून सूडाचे राजकारणखैरे म्हणाले की, महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाचा सामना करीत असताना केंद्र सरकारला अनेक संघटना व उद्योजकांनी आर्थिक मदत केली. मात्र, केंद्राने राजकीय सूडापाेटी महाराष्ट्राला एका रुपयाचीही आर्थिक मदत केली नसल्याचा आरोप केला.  

कृषी विधेयकाबाबत अफवा केंद्र सरकारच्या कृषी विधेयकातून शेतकरी आपला शेतीमाल कोठेही आणि कोणालाही सहज विक्री करू शकतो. मात्र, विरोधक अफवा पसरवून  शेतकऱ्यांच्या भावना भडकविण्याचे काम करीत आहेत, असा आरोप आमदार हरिभाऊ बागडे यांनी केला. मागील वर्षी मका खरेदीसाठी केंद्राने मंजुरी दिली; पण राज्याला खरेदीसाठी लागणारा बारदानाही उपलब्ध करता आला नसल्याची टीका त्यांनी केली. 

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारHaribhau Bagadeहरिभाऊ बागडेAurangabadऔरंगाबादImtiaz Jalilइम्तियाज जलीलBJPभाजपा