शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने फोडला सेना नेत्यांना घाम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 23:17 IST

औैरंगाबाद : शिवसेना-भाजप युती असली तरी भाजपने मंगळवारी पाणी प्रश्नावरून सेना नेत्यांना चांगलाच घाम फोडला. सिडको एन-३, एन-४ भागात पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याच्या मुद्यावर सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका माधुरी अदवंत यांनी मंगळवारी सकाळीच मनपासमोर उपोषण सुरू केले. महापौैरांनी उपोषण मागे घेण्याची खूप विनंती केली.

ठळक मुद्देनगरसेविकेचे उपोषण : खासदारांच्या विरोधात घोषणाबाजी

औैरंगाबाद : शिवसेना-भाजप युती असली तरी भाजपने मंगळवारी पाणी प्रश्नावरून सेना नेत्यांना चांगलाच घाम फोडला. सिडको एन-३, एन-४ भागात पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याच्या मुद्यावर सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका माधुरी अदवंत यांनी मंगळवारी सकाळीच मनपासमोर उपोषण सुरू केले. महापौैरांनी उपोषण मागे घेण्याची खूप विनंती केली. मात्र, त्या आपल्या निर्णयावर ठाम होत्या. सायंकाळी मनपा आयुक्तांनी ३० मार्चपर्यंत पाणी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यावर उपोषण मागे घेण्यात आले.निवडणुका जवळ येऊ लागताच युतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येत आहे. महापालिकेत आजपर्यंत भाजपने नेहमी सेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. मनपात शिवसेना-भाजपची पूर्वीपासून युती आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आज भाजपने पाणीप्रश्नाचा मुद्दा उकरून काढला. वॉर्डातील महिला व पुरुषांसह अदवंत यांनी सकाळी १० वाजेपासून उपोषण सुरू केले. शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, प्रमोद राठोड आदी यावेळी हजर होते. माहिती मिळताच महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंडपात जाऊन अदवंत आणि नागरिकांची समजूत काढण्याचा बराच प्रयत्न केला. आंदोलकांचे अजिबात समाधान झाले नाही. दुपारी १ वाजता मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक अदवंत यांच्या भेटीसाठी पोहोचले. यावेळी नागरिकांनी सिडकोवासीयांना पाणी मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी खासदारांच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. काही नागरिकांनी तर आयुक्तांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. सिडको एन ३, एन ४ भागात पुंडलिकनगरच्या जलकुंभावरून पाणी द्यावे, अशी मागणी करून भाजपने पुन्हा सेनेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम मंजूर झाले होते. ते काम वर्षभरापासून का होत नाही, असा सवाल काही नागरिकांनी आयुक्तांना विचारला. त्यावर कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या काही नगरसेवकांनी (सेना) विरोध केल्यामुळे काम थांबल्याची माहिती दिली. या उत्तराने संतापलेल्या प्रमोद राठोड यांनी मग त्यांच्यावर गुन्हा का दाखल करीत नाहीत, अशी विचारणा केली. शेवटी आयुक्तांनी पाण्याचे समान वितरण करण्यासाठी कोणते प्रयत्न केले जात आहेत, याची माहिती दिली. आयुक्तांनी ३० मार्चपर्यंत पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBJPभाजपाShiv Senaशिवसेना