शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

भाजपने फोडला सेना नेत्यांना घाम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 23:17 IST

औैरंगाबाद : शिवसेना-भाजप युती असली तरी भाजपने मंगळवारी पाणी प्रश्नावरून सेना नेत्यांना चांगलाच घाम फोडला. सिडको एन-३, एन-४ भागात पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याच्या मुद्यावर सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका माधुरी अदवंत यांनी मंगळवारी सकाळीच मनपासमोर उपोषण सुरू केले. महापौैरांनी उपोषण मागे घेण्याची खूप विनंती केली.

ठळक मुद्देनगरसेविकेचे उपोषण : खासदारांच्या विरोधात घोषणाबाजी

औैरंगाबाद : शिवसेना-भाजप युती असली तरी भाजपने मंगळवारी पाणी प्रश्नावरून सेना नेत्यांना चांगलाच घाम फोडला. सिडको एन-३, एन-४ भागात पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याच्या मुद्यावर सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका माधुरी अदवंत यांनी मंगळवारी सकाळीच मनपासमोर उपोषण सुरू केले. महापौैरांनी उपोषण मागे घेण्याची खूप विनंती केली. मात्र, त्या आपल्या निर्णयावर ठाम होत्या. सायंकाळी मनपा आयुक्तांनी ३० मार्चपर्यंत पाणी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यावर उपोषण मागे घेण्यात आले.निवडणुका जवळ येऊ लागताच युतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येत आहे. महापालिकेत आजपर्यंत भाजपने नेहमी सेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. मनपात शिवसेना-भाजपची पूर्वीपासून युती आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आज भाजपने पाणीप्रश्नाचा मुद्दा उकरून काढला. वॉर्डातील महिला व पुरुषांसह अदवंत यांनी सकाळी १० वाजेपासून उपोषण सुरू केले. शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, प्रमोद राठोड आदी यावेळी हजर होते. माहिती मिळताच महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंडपात जाऊन अदवंत आणि नागरिकांची समजूत काढण्याचा बराच प्रयत्न केला. आंदोलकांचे अजिबात समाधान झाले नाही. दुपारी १ वाजता मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक अदवंत यांच्या भेटीसाठी पोहोचले. यावेळी नागरिकांनी सिडकोवासीयांना पाणी मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी खासदारांच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. काही नागरिकांनी तर आयुक्तांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. सिडको एन ३, एन ४ भागात पुंडलिकनगरच्या जलकुंभावरून पाणी द्यावे, अशी मागणी करून भाजपने पुन्हा सेनेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम मंजूर झाले होते. ते काम वर्षभरापासून का होत नाही, असा सवाल काही नागरिकांनी आयुक्तांना विचारला. त्यावर कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या काही नगरसेवकांनी (सेना) विरोध केल्यामुळे काम थांबल्याची माहिती दिली. या उत्तराने संतापलेल्या प्रमोद राठोड यांनी मग त्यांच्यावर गुन्हा का दाखल करीत नाहीत, अशी विचारणा केली. शेवटी आयुक्तांनी पाण्याचे समान वितरण करण्यासाठी कोणते प्रयत्न केले जात आहेत, याची माहिती दिली. आयुक्तांनी ३० मार्चपर्यंत पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBJPभाजपाShiv Senaशिवसेना