शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
2
बारामतीतील EVM स्ट्राँगरुमचे CCTV अचानक बंद झाल्याचा सुळेंचा आरोप; निवडणूक अधिकारी म्हणाले...
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले
4
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
5
शरद पवारांकडून सुपारी घेऊन संजय राऊतांनी उबाठा संपवली; मनसेचा जोरदार पलटवार
6
रोहित वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळू शकतो; युवीच्या वडिलांचा दावा, BCCI ला दिला खास सल्ला
7
भाजपा उमेदवार माधवी लता आणखी एका वादात; मतदान केंद्रावर महिलांच्या चेहऱ्यावरून काढला बुरखा;ओळखपत्र तपासले
8
Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं
9
'बजरंगी भाईजान'च्या मुन्नीने केलं आलमजेबला कॉपी; 'एक बार देख लिजिए'वर दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स
10
निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल
11
गुरु-केतु नवमपंचम योग: ३ राशींना दिलासा, ३ राशींनी अखंड सावध राहावे; नेमके काय करु नये?
12
सावनी रविंद्रनंतर सुयश टिळकलाही बजावता आला नाही मतदानाचा हक्क, म्हणाला - "ह्याची खंत वाटते..."
13
पोलीस कॉन्स्टेबल वराला प्रेयसीने भर मंडपातून पळवले, दुसऱ्या तरुणीशी विवाह होण्यापूर्वी रंगला ड्रामा
14
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
15
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
16
PAK vs IRE: पहिल्या पराभवानंतर पाकिस्तानने लाज राखली; आयर्लंडची कडवी झुंज!
17
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
18
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
19
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
20
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा

खैरेंच्या स्मरणशक्तीवर भाजपचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:32 AM

शिवसेनेने विश्वासात न घेता एकट्यानेच दंगलीच्या पार्श्वभूमीवर हिंदू रक्षणाचा नारा देत पुकारलेल्या मोर्चामुळे संतप्त झालेल्या भाजपने आज खा.चंद्रकांत खैरे यांना टीकेचे लक्ष्य करीत त्यांच्या स्मरणशक्तीवर हल्ला चढविला.

ठळक मुद्देशहरात शांतता महत्त्वाची : शिवसेनेचा मोर्चा तर, आमची मदतफेरी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शिवसेनेने विश्वासात न घेता एकट्यानेच दंगलीच्या पार्श्वभूमीवर हिंदू रक्षणाचा नारा देत पुकारलेल्या मोर्चामुळे संतप्त झालेल्या भाजपने आज खा.चंद्रकांत खैरे यांना टीकेचे लक्ष्य करीत त्यांच्या स्मरणशक्तीवर हल्ला चढविला.खा. खैरे यांना मुख्यमंत्र्यांवर आरोप करणे शोभत नाही. शनिवारी रात्री दंगलसदृश स्थितीत तीन वेळा माझ्या फ ोनवरून ते मुख्यमंत्र्यांशी बोलले आणि भाजपचे कुणीही घटनास्थळी नव्हते, असा आरोप ते करीत आहेत. मुख्यमंत्र्यांशी बोलल्यानंतर पालकमंत्री डॉ.दीपक सावंत, गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांना त्यांनी तातडीने शनिवारी शहरात पाठविले. या सगळ्या घडामोडी माहिती असताना खा.खैरे स्मरणशक्ती गेल्यासारखे मुख्यमंत्री व भाजपवर बेताल आरोप करीत असल्याचा हल्ला आ.अतुल सावे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत चढविला. शहर विकासावर बोलावे, दंगलसदृश स्थितीत कोण होते, नव्हते यावर कशाला बोलता, असा टोलाही त्यांनी खैरेंना लगावला.खैरेंनी भाजपला हिंदुत्व शिकवू नये, त्यांना निवडून न येण्याची भीती वाटू लागली आहे. हिंदूंच्या रक्षणाचा ठेका त्यांनी एकट्यानेच घेतलेला नाही. दंगलीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता प्रस्थापित करण्याऐवजी ते राजकारण करीत असल्याचा आरोपही भाजपने केला.शिवसेना मोर्चा काढून राजकारण करीत आहे, त्यामुळे शहर आणखी दहा वर्षे मागे जाणार आहे. परंतु आम्ही दंगलीत ज्यांचे नुकसान झाले, त्यांना पुन्हा रोजगार, निवारा देण्यासाठी मदतफेरी काढणार असल्याचे प्रवक्ते शिरीष बोराळकर, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, डॉ.भागवत कराड यांनी सांगितले. यावेळी अनिल मकरिये, एकनाथ जाधव, कचरू घोडके, चंद्रकांत हिवराळे आदींची उपस्थिती होती.पालकमंत्री आणि खैरे यांच्यात विसंवाद४पालकमंत्री डॉ.सावंत शांतता राखण्याचे आवाहन करतात. तसेच दंगलखोरांवर कारवाई करण्याच्या बाजूने बोलतात. तिकडे खैरे मुख्यमंत्र्यांना लक्ष्य बनवितात. पालकमंत्र्यांची भूमिका खैरेंना मान्य नाही, असे वाटते आहे.४वातावरण शांत करण्याऐवजी ते भडकाविण्याचा प्रयत्न करीत आहेत. दंगलीमुळे शहराच्या विकासावर दूरगामी परिणाम होतो.४दंगलीत दोन्ही बाजूंनी समाजकंटक कार्यरत होते. जे निर्दाेष असतील त्यांच्या बाजूने भाजप ठामपणे उभे राहील, असे बोराळकर म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणAurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाBJPभाजपा