शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

या ‘पर्यावरणरक्षक’ राख्या बांधून निसर्गासोबतचे बंधन अतूट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 18:37 IST

शाडू मातीपासून बनवलेल्या राखीवर आहेत बिया

ठळक मुद्दे वृक्ष-वेलीच्या रूपात बनविल्या राख्या  राखीवर विविध झाडांच्या बिया लावलेल्या आहेत.

- अबोली कुलकर्णी 

औरंगाबाद : भाऊ-बहिणीच्या रेशमी नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. बहिणीला तिचे रक्षण करण्याचे यादिवशी भाऊ वचन देतो. रक्षाबंधनाचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलाय. दरवर्षीप्रमाणे बाजारात रंगीबेरंगी राख्यांची रेलचेल आहे. मात्र, गारखेडा परिसरातील रहिवासी असलेल्या साक्षी मिठावाला या महिलेने शाडू मातीपासून ‘पर्यावरणरक्षक राखी’ बनवली आहे. या राखीवर कडुलिंब, कढिपत्ता, चिंच, तुळस अशा विविध वनस्पतींच्या आणि मोठमोठ्या झाडांच्या बिया लावलेल्या आहेत. चला तर मग, यंदा रक्षाबंधनाच्या निमित्ताने वृक्ष-वेलींच्या रूपात वाढवूया बहीण-भावाचे प्रेम...!!

गारखेडा परिसरातील रहिवासी असलेल्या लेख मिठावाला आणि साक्षी मिठावाला या दाम्पत्याने ही ‘इको फ्रेंडली राखी’ बनवली आहे. ही राखी शाडू मातीपासून बनलेली आहे. त्यावर आकर्षक रंगांसह काही वनस्पतींच्या बियादेखील चिकटविलेल्या आहेत. ही राखी वजनाने अत्यंत हलकी असून, ती तुम्हाला भावाच्या हातावर सहजपणे बांधता येईल. रक्षाबंधनाचा सण पार पडल्यानंतर ती राखी फेकून न देता जमिनीत तुम्ही ती रोवू शकता. जेणेकरून त्या बियांपासून चार-पाच रोपे तयार होतील. या राख्यांवर कढिपत्ता, तुळस, मेथी, धणे, भोपळा, काकडी, कडुलिंबू, चिंच या झाडांच्या बिया लावलेल्या आहेत. या दाम्पत्याने आतापर्यंत अशा १५० राख्या बनवल्या आहेत. एक राखी बनवण्यासाठी जवळपास दहा ते वीस मिनिटे लागतात. 

संदेशात्मक राखी कीट...साक्षी लेख मिठावाला सांगतात, ‘भावा-बहिणीच्या नात्याचा ‘रक्षाबंधन’ हा सण साजरा करण्यासाठी या इको फ्रेंडली राख्या बनवल्या आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने या राख्या योग्य असणाऱ्या असून, या माध्यमातून तुम्ही बहिणीसाठी चार ते पाच रोपे लावू शकता. इको फ्रेंडली वस्तूंबाबत समाजात असलेली जागरूकता पाहता या राख्यांना शाळा, महाविद्यालये यांच्यामधूनही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. 

शिवाय या कीटमध्ये इको फ्रें डली पेन्सिलही आहे. या पेन्सिल आम्ही रद्दी पेपरपासून बनवतो, तसेच कीटमध्ये एक संदेशही अत्यंत सुंदर देण्यात आला आहे,‘या रक्षाबंधनाला भावासोबतच पर्यावरणाचेही रक्षण करा.’ या पेन्सिललाही भेंडी, काकडी, तीळ, वांगी अशा अनेक भाज्यांच्या बिया लावलेल्या आहेत. यादृष्टीने जेणेकरून यापासून लावलेल्या विविध रोपांमुळे आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करता येईल.    

टॅग्स :environmentपर्यावरणRaksha Bandhanरक्षाबंधनAurangabadऔरंगाबाद