शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

या ‘पर्यावरणरक्षक’ राख्या बांधून निसर्गासोबतचे बंधन अतूट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 18:37 IST

शाडू मातीपासून बनवलेल्या राखीवर आहेत बिया

ठळक मुद्दे वृक्ष-वेलीच्या रूपात बनविल्या राख्या  राखीवर विविध झाडांच्या बिया लावलेल्या आहेत.

- अबोली कुलकर्णी 

औरंगाबाद : भाऊ-बहिणीच्या रेशमी नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. बहिणीला तिचे रक्षण करण्याचे यादिवशी भाऊ वचन देतो. रक्षाबंधनाचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलाय. दरवर्षीप्रमाणे बाजारात रंगीबेरंगी राख्यांची रेलचेल आहे. मात्र, गारखेडा परिसरातील रहिवासी असलेल्या साक्षी मिठावाला या महिलेने शाडू मातीपासून ‘पर्यावरणरक्षक राखी’ बनवली आहे. या राखीवर कडुलिंब, कढिपत्ता, चिंच, तुळस अशा विविध वनस्पतींच्या आणि मोठमोठ्या झाडांच्या बिया लावलेल्या आहेत. चला तर मग, यंदा रक्षाबंधनाच्या निमित्ताने वृक्ष-वेलींच्या रूपात वाढवूया बहीण-भावाचे प्रेम...!!

गारखेडा परिसरातील रहिवासी असलेल्या लेख मिठावाला आणि साक्षी मिठावाला या दाम्पत्याने ही ‘इको फ्रेंडली राखी’ बनवली आहे. ही राखी शाडू मातीपासून बनलेली आहे. त्यावर आकर्षक रंगांसह काही वनस्पतींच्या बियादेखील चिकटविलेल्या आहेत. ही राखी वजनाने अत्यंत हलकी असून, ती तुम्हाला भावाच्या हातावर सहजपणे बांधता येईल. रक्षाबंधनाचा सण पार पडल्यानंतर ती राखी फेकून न देता जमिनीत तुम्ही ती रोवू शकता. जेणेकरून त्या बियांपासून चार-पाच रोपे तयार होतील. या राख्यांवर कढिपत्ता, तुळस, मेथी, धणे, भोपळा, काकडी, कडुलिंबू, चिंच या झाडांच्या बिया लावलेल्या आहेत. या दाम्पत्याने आतापर्यंत अशा १५० राख्या बनवल्या आहेत. एक राखी बनवण्यासाठी जवळपास दहा ते वीस मिनिटे लागतात. 

संदेशात्मक राखी कीट...साक्षी लेख मिठावाला सांगतात, ‘भावा-बहिणीच्या नात्याचा ‘रक्षाबंधन’ हा सण साजरा करण्यासाठी या इको फ्रेंडली राख्या बनवल्या आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने या राख्या योग्य असणाऱ्या असून, या माध्यमातून तुम्ही बहिणीसाठी चार ते पाच रोपे लावू शकता. इको फ्रेंडली वस्तूंबाबत समाजात असलेली जागरूकता पाहता या राख्यांना शाळा, महाविद्यालये यांच्यामधूनही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. 

शिवाय या कीटमध्ये इको फ्रें डली पेन्सिलही आहे. या पेन्सिल आम्ही रद्दी पेपरपासून बनवतो, तसेच कीटमध्ये एक संदेशही अत्यंत सुंदर देण्यात आला आहे,‘या रक्षाबंधनाला भावासोबतच पर्यावरणाचेही रक्षण करा.’ या पेन्सिललाही भेंडी, काकडी, तीळ, वांगी अशा अनेक भाज्यांच्या बिया लावलेल्या आहेत. यादृष्टीने जेणेकरून यापासून लावलेल्या विविध रोपांमुळे आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करता येईल.    

टॅग्स :environmentपर्यावरणRaksha Bandhanरक्षाबंधनAurangabadऔरंगाबाद