शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

या ‘पर्यावरणरक्षक’ राख्या बांधून निसर्गासोबतचे बंधन अतूट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 18:37 IST

शाडू मातीपासून बनवलेल्या राखीवर आहेत बिया

ठळक मुद्दे वृक्ष-वेलीच्या रूपात बनविल्या राख्या  राखीवर विविध झाडांच्या बिया लावलेल्या आहेत.

- अबोली कुलकर्णी 

औरंगाबाद : भाऊ-बहिणीच्या रेशमी नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. बहिणीला तिचे रक्षण करण्याचे यादिवशी भाऊ वचन देतो. रक्षाबंधनाचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलाय. दरवर्षीप्रमाणे बाजारात रंगीबेरंगी राख्यांची रेलचेल आहे. मात्र, गारखेडा परिसरातील रहिवासी असलेल्या साक्षी मिठावाला या महिलेने शाडू मातीपासून ‘पर्यावरणरक्षक राखी’ बनवली आहे. या राखीवर कडुलिंब, कढिपत्ता, चिंच, तुळस अशा विविध वनस्पतींच्या आणि मोठमोठ्या झाडांच्या बिया लावलेल्या आहेत. चला तर मग, यंदा रक्षाबंधनाच्या निमित्ताने वृक्ष-वेलींच्या रूपात वाढवूया बहीण-भावाचे प्रेम...!!

गारखेडा परिसरातील रहिवासी असलेल्या लेख मिठावाला आणि साक्षी मिठावाला या दाम्पत्याने ही ‘इको फ्रेंडली राखी’ बनवली आहे. ही राखी शाडू मातीपासून बनलेली आहे. त्यावर आकर्षक रंगांसह काही वनस्पतींच्या बियादेखील चिकटविलेल्या आहेत. ही राखी वजनाने अत्यंत हलकी असून, ती तुम्हाला भावाच्या हातावर सहजपणे बांधता येईल. रक्षाबंधनाचा सण पार पडल्यानंतर ती राखी फेकून न देता जमिनीत तुम्ही ती रोवू शकता. जेणेकरून त्या बियांपासून चार-पाच रोपे तयार होतील. या राख्यांवर कढिपत्ता, तुळस, मेथी, धणे, भोपळा, काकडी, कडुलिंबू, चिंच या झाडांच्या बिया लावलेल्या आहेत. या दाम्पत्याने आतापर्यंत अशा १५० राख्या बनवल्या आहेत. एक राखी बनवण्यासाठी जवळपास दहा ते वीस मिनिटे लागतात. 

संदेशात्मक राखी कीट...साक्षी लेख मिठावाला सांगतात, ‘भावा-बहिणीच्या नात्याचा ‘रक्षाबंधन’ हा सण साजरा करण्यासाठी या इको फ्रेंडली राख्या बनवल्या आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने या राख्या योग्य असणाऱ्या असून, या माध्यमातून तुम्ही बहिणीसाठी चार ते पाच रोपे लावू शकता. इको फ्रेंडली वस्तूंबाबत समाजात असलेली जागरूकता पाहता या राख्यांना शाळा, महाविद्यालये यांच्यामधूनही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. 

शिवाय या कीटमध्ये इको फ्रें डली पेन्सिलही आहे. या पेन्सिल आम्ही रद्दी पेपरपासून बनवतो, तसेच कीटमध्ये एक संदेशही अत्यंत सुंदर देण्यात आला आहे,‘या रक्षाबंधनाला भावासोबतच पर्यावरणाचेही रक्षण करा.’ या पेन्सिललाही भेंडी, काकडी, तीळ, वांगी अशा अनेक भाज्यांच्या बिया लावलेल्या आहेत. यादृष्टीने जेणेकरून यापासून लावलेल्या विविध रोपांमुळे आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करता येईल.    

टॅग्स :environmentपर्यावरणRaksha Bandhanरक्षाबंधनAurangabadऔरंगाबाद