शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

बडतर्फ कर्मचाऱ्याविरुद्धचा तक्रार अर्ज महिनाभरापासून ठाण्यात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 6:45 PM

पोलिसांची कारवाई करण्यासाठी टाळाटाळ 

ठळक मुद्देराष्ट्रीय आरोग्य अभियानातील घोटाळेबाज कर्मचाऱ्यांना अभयडॉ. अमोल गिते यांना निधीचा घोळ निदर्शनास आला.

औरंगाबाद : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) निधी घोटाळ्यातील बडतर्फ कर्मचाऱ्याविरुद्ध जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दाखल केलेल्या तक्रारींची दखल घेण्यासाठी क्रांतीचौक पोलिसांना तब्बल महिनाभरापासून सवड मिळालेली नाही.

जिल्हा परिषद आरोग्य विभागात ‘एनएचएम’मध्ये तत्कालीन कंत्राटी लेखापाल अजय पेरकर याने बँकेतील योजनांचा निधी टप्प्याटप्प्याने स्वत:च्या खात्यावर वळविला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी या विभागाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर निधीचा घोळ त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी लगेच ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांना सांगितली. पवनीत कौर यांनी ‘एनएचएम’ अंतर्गत निधीच्या अपहाराचा प्रकार मुंबई येथील आरोग्य विभागाच्या आयुक्तांना सांगितला. आरोग्य विभागाच्या आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक औरंगाबादला पाठवून या प्रकरणाची सखोल चौकशी केली. तब्बल १८ लाख १६ हजार रुपयांचा अपहार झाल्याचा अहवाल चौकशी पथकाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केला. 

दरम्यान, २८ जानेवारी रोजी झालेल्या जि. प. स्थायी समितीच्या बैठकीत दोषी कर्मचाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप प्रशासनावर केला. तेव्हा यासंदर्भात आरोग्य विभागाच्या आयुक्तांच्या मार्गदर्शनानंतर दोषींविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने सभागृहात दिले होते. आरोग्य आयुक्तांच्या मार्गदर्शनानंतर जि. प. प्रशासनाने जिल्हा लेखा व्यवस्थापक कविता बनसोड व लेखापाल अजय पेरकर या दोन्ही बडतर्फ कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या. त्यांच्याकडून खुलासेही प्राप्त झाले. तत्पूर्वी, कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या जिल्हा लेखा व्यवस्थापक कविता बनसोड यांना वेतन व भत्त्यापोटी २ लाख ३० हजार रुपये देणे होते; परंतु त्यांच्या बँक खात्यावर २३ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. नंतर ती रक्कमही बनसोड यांनी ‘एनएचएम’च्या खात्यावर परत जमा केली. या प्रकरणात कविता बनसोड व लेखापाल अजय पेरकर यांना जबाबदार धरून जिल्हा परिषदेने त्यांना सेवेतून बडतर्फ केले. अलीकडे १८ लाखांच्या या अपहारामध्ये कविता बनसोड यांचा सहभाग नसल्यामुळे विधि सल्लागाराच्या मार्गदर्शनानुसार जि. प. आरोग्य विभागाने अजय पेरकरविरुद्ध क्रांतीचौक पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. परंतु महिनाभराचा कालावधी लोटला, तरी अजूनही पोलिसांनी दोषीविरुद्ध कारवाई केलेली नाही.आता आरोग्य विभाग झाला सतर्कजालना रोडवरील एका बँकेत राष्ट्रीय आरोग्य अभियानचे खाते आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निधीची जमा किंवा काढण्यात येणाऱ्या रकमेचे अधिकार आहेत.मात्र, बँकेत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचा मोबाईल नंबर नोंद नसल्यामुळे रकमा जमा केल्या अथवा काढण्यात आल्याचा ‘एसएमएस’ येत नव्हता. आता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी बँकेत आपला मोबाईल नंबर नोंद केला आहे. त्यामुळे बँकेतील व्यवहाराचे नियमित ‘एसएमएस’ येत असल्याचे डॉ. गिते यांनी सांगितले. पूर्वी ‘एसएमएस’ येत नसल्यामुळे सलग तीन वेळा निधीचा अपहार झाला. आता यापुढे अशा अपहारास पायबंद बसेल, असे डॉ. गिते म्हणाले.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदCorruptionभ्रष्टाचारkranti chowkक्रांती चौकPoliceपोलिस