शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

मोठी समस्या! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १८८ गावांत नाहीत स्मशानभूमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 18:50 IST

जिल्ह्यातील एकूण १,३४१ गावांपैकी ७५६ ठिकाणी समस्या

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील एकूण १,३४१ गावांपैकी जवळपास अर्ध्या म्हणजे ७५६ गावांमध्ये स्मशानभूमी समस्यांच्या विळख्यात आहेत. तर १८८ गावांत स्मशानभूमीच नाहीत. तसेच २३१ गावांत स्मशानभूमीला जाण्यास पक्का रस्ताच नसल्याने चिखलातून, काट्यातून जावे लागते. काही ठिकाणी स्मशानभूमीची नोंद सातबाऱ्यामध्ये नसल्याने काही जणांनी त्यावरही अतिक्रमण केले आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी याकडे लक्ष देत स्मशानभूमी समस्या निवारण अभियान हाती घेतले आहे. ग्रामसेवक आणि तलाठ्यांनी गावोगावी जाऊन स्मशानभूमीचा आढावा घेत वादग्रस्त जागा, रस्ते, नोंदींची माहिती संकलित केली.

१५ ते २५ मे दरम्यान राबविलेल्या अभियानातून जिल्ह्यात असलेल्या एकूण १,३४१ गावांपैकी ७५६ ठिकाणी समस्या दिसून आल्या. १७० ठिकाणी सातबाऱ्यात नोंदच आढळली नाही. १८८ गावांत स्मशानभूमी नसल्याने नवीन स्मशानभूमी बांधण्याची मागणी पुढे आली. १७ ठिकाणी स्मशानभूमीच्या जागेवरही अतिक्रमण आढळून आले. २३१ ठिकाणी जाण्यास रस्ता नव्हता. तर ६४६ ठिकाणी विविध प्रकारच्या सुविधा आढळून आल्या नाहीत. स्मशानभूमी बांधण्याचा आराखडा जुलै अखेर होईल.

प्रशासनाचा पुढाकारस्मशानभूमीच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. डीपीसीतूनही निधी मंजूर झाला आहे. पावसाळ्यात प्रत्येक स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यास सांगितले आहे.- दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी

टॅग्स :Socialसामाजिकchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर