शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
3
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
4
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
5
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
6
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
7
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
8
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
10
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
11
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
12
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
13
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
14
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
15
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
16
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
17
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
18
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
19
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
20
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका

मोठी समस्या! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १८८ गावांत नाहीत स्मशानभूमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 18:50 IST

जिल्ह्यातील एकूण १,३४१ गावांपैकी ७५६ ठिकाणी समस्या

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील एकूण १,३४१ गावांपैकी जवळपास अर्ध्या म्हणजे ७५६ गावांमध्ये स्मशानभूमी समस्यांच्या विळख्यात आहेत. तर १८८ गावांत स्मशानभूमीच नाहीत. तसेच २३१ गावांत स्मशानभूमीला जाण्यास पक्का रस्ताच नसल्याने चिखलातून, काट्यातून जावे लागते. काही ठिकाणी स्मशानभूमीची नोंद सातबाऱ्यामध्ये नसल्याने काही जणांनी त्यावरही अतिक्रमण केले आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी याकडे लक्ष देत स्मशानभूमी समस्या निवारण अभियान हाती घेतले आहे. ग्रामसेवक आणि तलाठ्यांनी गावोगावी जाऊन स्मशानभूमीचा आढावा घेत वादग्रस्त जागा, रस्ते, नोंदींची माहिती संकलित केली.

१५ ते २५ मे दरम्यान राबविलेल्या अभियानातून जिल्ह्यात असलेल्या एकूण १,३४१ गावांपैकी ७५६ ठिकाणी समस्या दिसून आल्या. १७० ठिकाणी सातबाऱ्यात नोंदच आढळली नाही. १८८ गावांत स्मशानभूमी नसल्याने नवीन स्मशानभूमी बांधण्याची मागणी पुढे आली. १७ ठिकाणी स्मशानभूमीच्या जागेवरही अतिक्रमण आढळून आले. २३१ ठिकाणी जाण्यास रस्ता नव्हता. तर ६४६ ठिकाणी विविध प्रकारच्या सुविधा आढळून आल्या नाहीत. स्मशानभूमी बांधण्याचा आराखडा जुलै अखेर होईल.

प्रशासनाचा पुढाकारस्मशानभूमीच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. डीपीसीतूनही निधी मंजूर झाला आहे. पावसाळ्यात प्रत्येक स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यास सांगितले आहे.- दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी

टॅग्स :Socialसामाजिकchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर