शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..."
2
Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
3
आरक्षण मर्यादा ओलांडल्याने सुप्रिम कोर्ट संतप्त, राज्यातील निवडणुकांचं काय होणार? आता २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी
4
दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...
5
निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
6
SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा?
7
“काँग्रेस-वंचित पक्षाची आघाडी व्हावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची भावना”; नेते म्हणाले...
8
'अजित पवार आणि सुनेत्राआत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक...", राणा जगजितसिंह यांचं सुप्रिया सुळेंना पत्र; नेमकं प्रकरण काय?
9
"पंतप्रधान मोदींमुळे माझ्या आईचा जीव वाचला..."; शेख हसीना यांचा मुलगा सजीब यांचे विधान
10
११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
11
राज ठाकरेंमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात दुरावा?, वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘त्यांना सोबत घेण्यापूर्वी…’  
12
Delhi Blast: ‘बूट सुसाइड बॉम्बर’च्या तंत्रामुळे गुप्तचर-तपास यंत्रणा झाली सतर्क!
13
‘श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष’ दररोज म्हणता का? कालातीत लाभ होतात, स्वामी कायम कृपा करतात!
14
Shubman Gill Medical Update : गिल टीम इंडियासोबत गुवाहटीला जाणार का? BCCI नं माहिती दिली, पण अर्धवट
15
"...मग हा ग्रुप आला कुठून, या अपयशाला जबाबदार कोण?" ; ओवेसींनी अमित शाहांना करून जुनी दाव्याची आठवण
16
५४ तास विपरीत महालक्ष्मी राजयोग: ५ राशींना ४ पट लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अकल्पनीय फायदा!
17
जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना वगळले! अंबादास दानवे म्हणाले, '९९% भागीदारी असताना चौकशी अहवालात नाव कसं नाही?'
18
वेदनादायी! ऑस्ट्रेलियात BMW ची भारतीय महिलेला धडक, जागीच मृत्यू; होती ८ महिन्यांची गर्भवती
19
NWA: नवी मुंबई महापालिका ठरली देशात अव्वल! जलशक्ती मंत्रालयाचा 'राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४' पटकावला
20
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! दर्शनपास असेल तरच साईबाबांचे होणार दर्शन 

By प्रभुदास पाटोळे | Updated: December 15, 2023 12:35 IST

खंडपीठाचे आदेश : सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी निर्णय

छत्रपती संभाजीनगर : शिर्डी येथील साईबाबा मंदिरात ‘दर्शन पास’ असेल तरच भाविकांना प्रवेश द्यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.आर.व्ही.घुगे आणि न्या.वाय.जी.खोब्रागडे यांनी दिला आहे. त्यामुळे आता कोणालाही पासशिवाय प्रवेश मिळणार नाही.

पासेसची खात्री करूनच मंदिरामध्ये प्रवेश द्यावा. ज्या भाविकांना दर्शन घ्यायचे आहे त्यांची ऑनलाइन नोंद ठेवून फक्त त्यांनाच दर्शन पास दिला जाईल, याची काळजी घ्यावी. भक्तांच्या आधारकार्डची पडताळणी करून त्याचा क्रमांक विशेष आणि व्ही.आय.पी. दर्शन पासवर नोंदवावा, असे आदेशात म्हटले आहे. प्रधान जिल्हा न्यायाधीश, अहमदनगर तथा अध्यक्ष यांनी सादर केलेल्या अहवालाची दखल घेत शिर्डी येथील साईबाबा मंदिरात ‘दर्शन पास’ देण्याबाबत अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कडक धोरण अवलंबिण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिली आहे. संस्थानचे अध्यक्ष तथा अहमदनगरचे जिल्हा न्यायाधीश यांनी सादर केलेल्या गोपनीय अहवालामधील गंभीर निरीक्षणे लक्षात घेता मंदिराच्या सुरक्षेसंदर्भात बदल न करता सर्व सुरक्षाव्यवस्था प्रधान जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्षांच्या आदेशानुसारच चालेल अथवा बदलेल असे निर्देश दिले. मंदिराच्या सुरक्षेसंदर्भात निर्णय घेताना अध्यक्षांच्या परवानगीशिवाय कुठलाही बदल करता येणार नाही, असे नमूद केले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास तो ‘न्यायालयाचा अवमान’ समजला जाईल, असे आदेशात म्हटले आहे.

कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी शिर्डी येथील साईबाबा मंदिर व परिसराची सुरक्षा व्यवस्था केंद्रीय पोलिस राखीव बल किंवा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल यांच्यामार्फत करण्यात यावी, यासाठी ॲड. सतीश तळेकर यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. पोलिस प्रशासन व साईबाबा संस्थानच्या विश्वस्तांनी मंदिर सुरक्षा केंद्रीय पोलिस राखीव बल किंवा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल यांच्यामार्फत देण्यात यावी, यासाठी वेळोवेळी विविध स्तरांवर पाठपुरावा केला आहे; परंतु कोणतीही कार्यवाही झालेली नाही. शिर्डी येथे गुन्हेगारीचे प्रमाण रोज वाढत आहे. त्यामुळे भाविकांची सुरक्षाव्यवस्था मजबूत करण्याची गरज आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

औरंगाबाद खंडपीठाने आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी देवस्थान येथील सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात गोपनीय अहवाल सादर करण्याची विनंती आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या प्रबंधकांना केली होती. त्यानुसार त्यांनी गोपनीय अहवालाद्वारे तिरुपती देवस्थानातील सुरक्षेसंदर्भात माहिती सादर केली. त्यावर अभ्यास करून उच्च न्यायालय पुढील निर्णय घेणार आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने प्रज्ञा तळेकर व अजिंक्य काळे काम पाहत आहेत. तर शासनाच्या वतीने ॲड. अमरजित गिरासे, संस्थानच्या वतीने ॲड. संजय मुंढे काम पाहत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ