शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

मोठी बातमी! बेरोजगारांच्या आशेवर पाणी, विद्यापीठातील प्राध्यापक भरतीला राजभवनाचा 'ब्रेक'

By राम शिनगारे | Updated: October 19, 2023 18:03 IST

सत्ताधाऱ्यांच्या मंजुरीनंतर सत्ताधाऱ्यांनीच केला विरोध

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तब्बल १४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्राध्यापक भरतीला मुहूर्त लागला होता. ७३ प्राध्यापकांच्या जागांसाठी तब्बल ५ हजार ८१५ उमेदवारांनी अर्ज केले. मात्र, सत्ताधारी भाजपच्या संबंधित विद्यापीठ विकास मंचने विद्यमान कुलगुरूंच्या कार्यकाळात भरती न करता डिसेंबरनंतर नव्याने येणाऱ्या कुलगुरूंच्या कार्यकाळात भरती करण्याची मागणी केली. त्याविषयीच्या तक्रारी राजभवनाकडे केल्या. या तक्रारींची दखल घेऊन राजभवनाकडून प्राध्यापक भरतीला 'ब्रेक' लावण्याचे आदेश दिल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.

विद्यापीठातील विविध विभागांमध्ये २८९ प्राध्यापकांची पदे मंजूर आहेत. त्यातील तब्बल १५० पदे रिक्त असून, त्यापैकी ७३ पदांच्या भरतीसाठी राज्य शासनाने मंजुरी दिली होती. त्यानंतर प्रशासनाने प्राध्यापक भरतीसाठी २३ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर दरम्यान ऑनलाइन अर्ज मागविले. अर्जाच्या शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल ५ हजार ८१५ उमेदवारांनी अर्ज केले. ही अर्ज प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच सत्ताधारी विद्यापीठ विकास मंचकडून व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप यांच्यासह इतरांनी कुलगुरूंचा कार्यकाळ तीन महिने राहिला असल्याचे कारण देत त्यांच्या कार्यकाळात भरती होऊ नये, अशा तक्रारीचे निवेदन राजभवनाला दिले होते. त्याशिवाय इतरही काही संघटना, माजी पदाधिकाऱ्यांनी राजभवनाकडे तक्रारी केल्या. या तक्रारींची दखल घेऊन राजभवनाने १४ सप्टेंबर रोजीच भरती प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत थांबविण्याचे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले. या आदेशात भरती प्रक्रियेचा खुलासाही मागविण्यात आला. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ खुलासा राजभवनाकडे केला. मात्र, त्यावर महिनाभरापासून कोणताही पुढील आदेश राजभवनाकडून प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. त्यामुळेच प्रशासनाने आलेल्या अर्जांची छाननी केली नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. याविषयी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, तक्रारकर्ते व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप यांना विचारले असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला.

कोट्यवधीचा खर्च, पुढील वर्षी भरती नाहीचविद्यापीठात अर्ध्यापेक्षा अधिक प्राध्यापकांच्या जागा रिक्त असल्यामुळे शेकडो जणांना तासिका तत्त्वावर नेमले आहेत. त्यासाठी विद्यापीठाच्या फंडातून कोट्यवधी रुपयांचा खर्च होत आहे. तसेच विद्यमान कुलगुरूंचा कार्यकाळ डिसेंबरअखेरपर्यंत असल्यामुळे नवीन कुलगुरू फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये मिळण्याचा अंदाज आहे. हे नवीन कुलगुरू मिळतील तेव्हा लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागलेली असेल. तसेच लोकसभा संपल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभेच्या निवडणुका लागतील. त्यामुळे चालू वर्षात भरती न झाल्यास पुढील वर्षीही भरती होण्याची शक्यता नाही. त्यात विद्यापीठाच्या होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण