शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मोठी बातमी! सलमानला जिवे मारण्याच्या कटात होता छत्रपती संभाजीनगरच्या तरुणाचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 14:39 IST

१४ एप्रिल रोजी सलमानच्या घरावर पहाटे गोळीबार करण्यात आला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सुमारे सहा संशयितांना हरयाणा, पंजाब, राजस्थानमधून अटक केली.

छत्रपती संभाजीनगर : अभिनेता सलमान खान याच्या घरावर काही दिवसांपूर्वी गोळीबारासोबतच त्याच्या पनवेल फार्महाउसवर हल्ला करून जिवे ठार मारण्याचा कट होता. या कटात शहरातील जालाननगरचा रहिवासी वस्पी मोहम्मद ऊर्फ वसीम चिकना (३६) याचाही सहभाग होता. त्याच्यावर हल्ल्यासाठी शस्त्रांची तस्करी करण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे आता मुंबई पाेलिसांच्या तपासात निष्पन्न होत आहे.

१४ एप्रिल रोजी सलमानच्या घरावर पहाटे गोळीबार करण्यात आला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सुमारे सहा संशयितांना हरयाणा, पंजाब, राजस्थानमधून अटक केली. यात प्रामुख्याने सोनू सुभाष चंदर, अनुज थापन यांनी हल्लेखोरांना ४० काडतुसे पुरवली होती. हे दोघेही बिष्णोई गँगचे सदस्य आहेत. त्यांनी सागर पाल यास ४ मॅगझिन व ४० काडतुसे पुरवली होती. त्यापैकी ५ गोळ्या सलमानच्या घरावर झाडण्यात आल्या होत्या. अटकेतील या आरोपींच्या चौकशीत त्याच्या फार्म हाउसवरदेखील हल्ल्याचा कट रचल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये पनवेल पोलिसांनी वसीम चिकनासह धनंजय सिंग तापेसिंग, अजय कश्यप, गौरव भाटिया, एलियास नखवी, झिशान खान जावेद खान यांना अटक केली.

शस्त्र बाळगल्याप्रकरणी यापूर्वी अटकमूळ जालानगरचा रहिवासी असलेला वसीम सातत्याने परराज्यात वास्तव्यास होता. त्याचा बिष्णोई गँगच्या सदस्यांसोबत सातत्याने संपर्क असल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. सलमानच्या फार्म हाउसची रेकी करून शस्त्रांची तस्करी करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. त्याने त्यासाठी आसपास भाड्याने खोलीसाठीदेखील शोध घेतला होता. त्याचा भाऊ हॉटेलमध्ये काम करतो. अनेक वर्षांपासून तो मुंबईत वास्तव्यास होता. तेव्हा त्याला शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटकदेखील झाली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादSalman Khanसलमान खान