शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

मोठ्या परताव्याच्या आमिषाने १२ जणांची ४७ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 23:57 IST

दरमहा सात टक्के दराने परतावा देण्याचे आमिष दाखवून १२ जणांची ४७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विजयनगर येथील कॅपिटल ग्रोथ कंपनीच्या दोन संचालकांविरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा नोंदविण्यात आला.

औरंगाबाद : दरमहा सात टक्के दराने परतावा देण्याचे आमिष दाखवून १२ जणांची ४७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विजयनगर येथील कॅपिटल ग्रोथ कंपनीच्या दोन संचालकांविरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा नोंदविण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करीत असून, आरोपीचा शोध पोलिसांनी सुरू केला.रत्नेश प्रभाकरराव हस्तक (वय ५७, रा. एन-९, एम-२, ज्ञानेश्वरनगर, हडको) आणि अजय अशोक जोशी (रा. ब्रीजवाडी), अशी आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, उल्कानगरी येथील रहिवासी प्रवीण प्रभाकरराव हस्तक हे आॅटोमोबॉईल गॅरेज चालवितात. २०१५ मध्ये त्यांच्या ओळखीच्या एका जणाने त्यांना सांगितले होते, तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर विजयनगर येथील ग्रोथ कॅपिटल या कंपनीत कर, ते चांगला परतावा देतात. त्यामुळे तक्रारदारांनी कंपनीच्या कार्यालयात जाऊन गुंतवणूक योजनेविषयी माहिती जाणून घेतली. त्यावेळी आरोपींनी त्यांना गुंतविलेल्या रकमेवर दरमहा सात टक्के दराने अठरा महिने व्याज देतो. त्यानंतर तुम्हाला तुमची रक्कम परत करतो, असे सांगितले. विशेष म्हणजे हे व्याज दरमहा तुमच्या बँक खात्यात जमा केले जाईल, असे नमूद के ले. रक्कम परत करण्यासाठी पुढील तारखेचा धनादेशही आगाऊ प्रदान करतो, असे सांगितल्याने तक्रारदारांनी आरोपीच्या कंपनीत ३ लाख रुपये भरले. त्यांच्याप्रमाणेच दिलीप भीमराव निकम, धन्वंतरी निकम, शांताराम पाटील, चंद्र्रनील परब, गणेश वाघमारे, भीमराव शेणफडू पाटील, चंद्रकांत विक्रम पाटील, योगिनी भामरे, पराग रत्नपारखी, मिलिंद मुळे, विजय धोटे यांच्यासह इतरांकडून वेगवेगळ्या, असे एकूण ४४ लाख रुपये त्यांनी घेतले. प्रवीण यांच्याप्रमाणे अन्य एकाही तक्रारदाराच्या बँक खात्यात आरोपींनी एक रुपयाही जमा केला नाही. यामुळे तक्रारदारांनी आरोपींना भेटून व्याजाच्या रकमेची वेळोवेळी मागणी केली असता प्रत्येक वेळी ते वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारून नेत. दरम्यान, मुदत संपल्यानंतरही आरोपींनी व्याज न दिल्याने तक्रारदारांनी त्यांना मुद्दल रकमेची मागणी केली. तेव्हा त्यांनी मुद्दल देण्यासही नकार दिला.धनादेश झाले अनादरितआरोपींनी तक्रारारदांना मुद्दल रकमेचे धनादेश दिले होते. हे धनादेश तक्रारदारांनी बँकेत जमा केले असता ते न वटता परत आले. धनादेश अनादरित झाल्यामुळे आरोपींनी आपली मुद्दामहून आणि कट रचून फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार नोंदविली. निरीक्षक श्रीकांत नवले तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस