शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मोठी कारवाई! सुरक्षेचे नियम तोडणाऱ्या १९० उद्योजकांवर खटले

By बापू सोळुंके | Updated: January 3, 2024 14:50 IST

औद्योगिक सुरक्षा विभागाची कारवाई

छत्रपती संभाजीनगर : कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी घालून दिलेल्या सुरक्षा नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या मराठवाड्यातील १९० उद्योजकांविरोधात औद्योगिक सुरक्षा विभागाने विविध न्यायालयांत खटले भरले आहेत.

वाळूज एमआयडीसीतील सनशाईन इंटरप्रायजेस कंपनीला शनिवारी रात्री लागलेल्या भीषण आगीच्या घटनेत ६ कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर औद्योगिक सुरक्षा विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर औद्याेगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे उपसंचालक धीरज खिरोडकर यांना विचारले असता, ते म्हणाले की, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये कारखाने अधिनयम १९४८ नुसार २२८९ कारखान्यांची आमच्या विभागाकडे नोंद आहे. यात छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक १३३६, जालन्यात २२८, परभणीत ५८, हिंगोलीत ३४, बीड २३८, नांदेड १९२, धाराशिव १०० आणि लातूरमध्ये १०३ कारखान्यांचा समावेश आहे. ज्या कारखान्यांची औद्याेगिक सुरक्षा विभागाकडे रीतसर नोंद आहे, त्या कारखान्यांनी औद्योगिक सुरक्षेच्या नियमांचे पालन करणे कंपनीमालक आणि व्यवस्थापकास बंधनकारक आहे.

औद्योगिक सुरक्षा विभागाच्यावतीने वर्षभरात विविध कारखान्यांची तपासणी केली, तेव्हा १९० कारखान्यात सुरक्षा नियमांकडे कानाडोळा करण्यात आल्याचे दिसून आले. कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या या कारखानदारांविरोधात न्यायालयात खटले भरण्यात आल्याची माहिती उपसंचालक धीरज खिरोडकर यांनी दिली.

अनेक कारखाने करीत नाहीत फॅक्टरीची नाेंद२० पेक्षा अधिक कामगार एकाच पाळीत काम करीत असलेल्या कारखान्याची औद्योगिक सुरक्षा विभागाकडे नोंद करण्याची जबाबदारी कंपनी मालक आणि व्यवस्थापकाची आहे. मात्र असे असूनही अनेक कंपन्यांकडून ही माहिती लपविली जाते. अशा कंपन्यांची माहिती मिळाल्यानंतर औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापकांमध्ये औद्योगिक सुरक्षा नियमांबाबत जागरुकता निर्माण करून त्यांची या विभागाकडे नोंदणी करून घेतली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद