शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

मोठी कारवाई! सुरक्षेचे नियम तोडणाऱ्या १९० उद्योजकांवर खटले

By बापू सोळुंके | Updated: January 3, 2024 14:50 IST

औद्योगिक सुरक्षा विभागाची कारवाई

छत्रपती संभाजीनगर : कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी घालून दिलेल्या सुरक्षा नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या मराठवाड्यातील १९० उद्योजकांविरोधात औद्योगिक सुरक्षा विभागाने विविध न्यायालयांत खटले भरले आहेत.

वाळूज एमआयडीसीतील सनशाईन इंटरप्रायजेस कंपनीला शनिवारी रात्री लागलेल्या भीषण आगीच्या घटनेत ६ कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर औद्योगिक सुरक्षा विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर औद्याेगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे उपसंचालक धीरज खिरोडकर यांना विचारले असता, ते म्हणाले की, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये कारखाने अधिनयम १९४८ नुसार २२८९ कारखान्यांची आमच्या विभागाकडे नोंद आहे. यात छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक १३३६, जालन्यात २२८, परभणीत ५८, हिंगोलीत ३४, बीड २३८, नांदेड १९२, धाराशिव १०० आणि लातूरमध्ये १०३ कारखान्यांचा समावेश आहे. ज्या कारखान्यांची औद्याेगिक सुरक्षा विभागाकडे रीतसर नोंद आहे, त्या कारखान्यांनी औद्योगिक सुरक्षेच्या नियमांचे पालन करणे कंपनीमालक आणि व्यवस्थापकास बंधनकारक आहे.

औद्योगिक सुरक्षा विभागाच्यावतीने वर्षभरात विविध कारखान्यांची तपासणी केली, तेव्हा १९० कारखान्यात सुरक्षा नियमांकडे कानाडोळा करण्यात आल्याचे दिसून आले. कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या या कारखानदारांविरोधात न्यायालयात खटले भरण्यात आल्याची माहिती उपसंचालक धीरज खिरोडकर यांनी दिली.

अनेक कारखाने करीत नाहीत फॅक्टरीची नाेंद२० पेक्षा अधिक कामगार एकाच पाळीत काम करीत असलेल्या कारखान्याची औद्योगिक सुरक्षा विभागाकडे नोंद करण्याची जबाबदारी कंपनी मालक आणि व्यवस्थापकाची आहे. मात्र असे असूनही अनेक कंपन्यांकडून ही माहिती लपविली जाते. अशा कंपन्यांची माहिती मिळाल्यानंतर औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापकांमध्ये औद्योगिक सुरक्षा नियमांबाबत जागरुकता निर्माण करून त्यांची या विभागाकडे नोंदणी करून घेतली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद