शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

मनपा कारभाऱ्यांची वाकडी चाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 00:56 IST

शहर विकास आराखड्यानुसार ६० पेक्षा अधिक डी.पी. रस्त्यासाठी महापालिकेने मागील दोन दशकांपासून भूसंपादनच केलेले नाही. टीडीआर आणि एफएसआय देऊन रस्ते रुंद करण्याचे प्रभावी अस्त्र हाती असताना अंमलबजावणीसाठी पैैसा नाही, असे तद्दन खोटे कारण देत प्रशासन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहर विकास आराखड्यानुसार ६० पेक्षा अधिक डी.पी. रस्त्यासाठी महापालिकेने मागील दोन दशकांपासून भूसंपादनच केलेले नाही. टीडीआर आणि एफएसआय देऊन रस्ते रुंद करण्याचे प्रभावी अस्त्र हाती असताना अंमलबजावणीसाठी पैैसा नाही, असे तद्दन खोटे कारण देत प्रशासन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यावर कडी करीत पदाधिका-यांनी भूसंपादनासाठी तब्बल २२०० कोटी रुपये लागतील, असा अंदाज बांधून, राज्य शासनाने हा निधी द्यावा, अशी मागणी करण्याची तयारी सुरू केलीआहे; परंतु ६० पैकी अनेक रस्त्यांच्या भूसंपादनासाठी महापालिकेला एक रुपयाही खर्च करण्याची गरज पडणार नाही, अशी सध्याची स्थिती आहे.नगररचना विभाग दोन शहर विकास आराखड्यांवर काम करते. एक जुन्या शहरातील विकास आराखडा, दुसरा मनपात समाविष्ट १८ खेड्यांच्या संदर्भातील आराखडा होय. सर्वोच्च न्यायालयात सध्या जुन्या शहराच्या विकास आराखड्याचा वाद सुरू आहे. २००० मध्ये मनपा हद्दीत समाविष्ट १८ खेड्यांसाठी मंजूर विकास आराखड्याची आजपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही.या रस्त्यांची संख्या ६० पेक्षा अधिक आहे; परंतु महापालिका प्रशासनाने आतापर्यंत डी.पी. रोडसाठी भूसंपादनच केले नाही. जेथे गरज होती, तेथेच भूसंपादन केले. पडेगाव, मिटमिटा आदी भागांतील डी.पी. रस्त्यांवर अनेक भूमाफियांनी प्लॉटिंग करून जमीन विकून टाकली; परंतु महापालिका प्रशासनाने त्याची साधी दखलही घेतली नाही.भविष्यात विकास आराखड्यानुसार डी.पी. रोड शोधायला महापालिकेचे अधिकारी निघाल्यास तेथे हजारो घरे दिसतील. एवढ्या घरांवर बुलडोझर कसा फिरवणार, म्हणून महापालिकेतील राजकीय मंडळींमधील माणूस जागा होईल. जुन्या शहरातील अनेक डी.पी. रस्ते याच पद्धतीने गायब झाले आहेत. जालना रोडवरील सिंचन भवनसमोरून १०० फूट डी.पी. रोड आहे. कैलासनगर भागात रोडवरील घरे पाहून महापालिकेने यापूर्वीच माघार घेतली आहे.भूसंपादनासाठी महापालिकेने डी.पी.आर, एफएसआयचा वापर जास्तीत जास्त करावा, असे शासनाचे निर्देश आहेत. यानंतरही महापालिका प्रशासन अंमलबजावणी करायला तयार नाही. आता भूसंपादनासाठी २२०० कोटी रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात येणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाcivic issueनागरी समस्या