शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

मनपा कारभाऱ्यांची वाकडी चाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 00:56 IST

शहर विकास आराखड्यानुसार ६० पेक्षा अधिक डी.पी. रस्त्यासाठी महापालिकेने मागील दोन दशकांपासून भूसंपादनच केलेले नाही. टीडीआर आणि एफएसआय देऊन रस्ते रुंद करण्याचे प्रभावी अस्त्र हाती असताना अंमलबजावणीसाठी पैैसा नाही, असे तद्दन खोटे कारण देत प्रशासन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहर विकास आराखड्यानुसार ६० पेक्षा अधिक डी.पी. रस्त्यासाठी महापालिकेने मागील दोन दशकांपासून भूसंपादनच केलेले नाही. टीडीआर आणि एफएसआय देऊन रस्ते रुंद करण्याचे प्रभावी अस्त्र हाती असताना अंमलबजावणीसाठी पैैसा नाही, असे तद्दन खोटे कारण देत प्रशासन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यावर कडी करीत पदाधिका-यांनी भूसंपादनासाठी तब्बल २२०० कोटी रुपये लागतील, असा अंदाज बांधून, राज्य शासनाने हा निधी द्यावा, अशी मागणी करण्याची तयारी सुरू केलीआहे; परंतु ६० पैकी अनेक रस्त्यांच्या भूसंपादनासाठी महापालिकेला एक रुपयाही खर्च करण्याची गरज पडणार नाही, अशी सध्याची स्थिती आहे.नगररचना विभाग दोन शहर विकास आराखड्यांवर काम करते. एक जुन्या शहरातील विकास आराखडा, दुसरा मनपात समाविष्ट १८ खेड्यांच्या संदर्भातील आराखडा होय. सर्वोच्च न्यायालयात सध्या जुन्या शहराच्या विकास आराखड्याचा वाद सुरू आहे. २००० मध्ये मनपा हद्दीत समाविष्ट १८ खेड्यांसाठी मंजूर विकास आराखड्याची आजपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही.या रस्त्यांची संख्या ६० पेक्षा अधिक आहे; परंतु महापालिका प्रशासनाने आतापर्यंत डी.पी. रोडसाठी भूसंपादनच केले नाही. जेथे गरज होती, तेथेच भूसंपादन केले. पडेगाव, मिटमिटा आदी भागांतील डी.पी. रस्त्यांवर अनेक भूमाफियांनी प्लॉटिंग करून जमीन विकून टाकली; परंतु महापालिका प्रशासनाने त्याची साधी दखलही घेतली नाही.भविष्यात विकास आराखड्यानुसार डी.पी. रोड शोधायला महापालिकेचे अधिकारी निघाल्यास तेथे हजारो घरे दिसतील. एवढ्या घरांवर बुलडोझर कसा फिरवणार, म्हणून महापालिकेतील राजकीय मंडळींमधील माणूस जागा होईल. जुन्या शहरातील अनेक डी.पी. रस्ते याच पद्धतीने गायब झाले आहेत. जालना रोडवरील सिंचन भवनसमोरून १०० फूट डी.पी. रोड आहे. कैलासनगर भागात रोडवरील घरे पाहून महापालिकेने यापूर्वीच माघार घेतली आहे.भूसंपादनासाठी महापालिकेने डी.पी.आर, एफएसआयचा वापर जास्तीत जास्त करावा, असे शासनाचे निर्देश आहेत. यानंतरही महापालिका प्रशासन अंमलबजावणी करायला तयार नाही. आता भूसंपादनासाठी २२०० कोटी रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात येणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाcivic issueनागरी समस्या