शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

पुरातत्व विभागाचा पक्षपातीपणा; आग्र्याच्या किल्ल्यावर शिवजयंतीला परवानगी नाही

By बापू सोळुंके | Updated: February 2, 2023 20:50 IST

कोणतेही कारण न देता पुरातत्व विभागाने शिवजयंती उत्सवाला परवानगी नाकारली.

औरंगाबाद : केंद्रीय पुरातत्व विभागाचा पक्षपातीपणा करीत आग्र्याच्या लाल किल्ल्यावर १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमास परवानगी नाकारल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाच्या भावना आहेत. पुरातत्व विभागाच्या या निर्णयाविरोधात आर.आर. पाटील फाऊंडेशन आणि अजिंक्य देवगिरी फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

याविषयी विनोद पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष होते. त्यांचे राज्य हिंदुस्थानातील अनेक राज्यांमध्ये होते. छत्रपतींनी देशाला नौदल, शेतसारा पद्धत, सैन्यदलाची कार्यपद्धती आणि आदर्श शासक कसा असावा, याचा पायंडा पाडून दिला. अशा या थोर राष्ट्रपुरुषांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी जगभर मोठ्या उत्साहात साजरी होते. आग्र्याच्या लाल किल्ल्यात औरंगजेबाने तह करण्याच्या नावाखाली बोलावून शिवरायांना व बाळ संभाजीराजेंना नजरकैदेत ठेवले होते. छत्रपतींनी अत्यंत चतुराईने तेथून स्वत:ची आणि बाळराजे संभाजींची सुटका करून घेतली होती.

यामुळे या किल्ल्याशी शिवप्रेमींचे भावनिक नाते आहे. तेथे यंदाची शिवजयंती उत्सव घेण्यासाठी आर.आर. पाटील फाऊंडेशन आणि अजिंक्य देवगिरी फाऊंडेशनने पुरातत्व विभागाकडे नोव्हेंबर २०२२ मध्ये रीतसर परवानगी मागितली. मात्र कोणतेही कारण न देता या विभागाने शिवजयंती उत्सवाला परवानगी नाकारली. या किल्ल्याशी ऐतिहासिक संबंध नसलेले अनेक कार्यक्रम तेथे यापूर्वी झाले आहेत. असे असताना केवळ पक्षपाती विचारानेच शिवजयंती उत्सवाला परवानगी नाकारण्यात आल्याचे दिसून येते. या निर्णयाविरोधात ॲड. संदीप देशमुख, ॲड. राकेश शर्मा आणि ॲड. निशांत शर्मा यांच्यामार्फत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर उद्या सुनावणी आहे. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजAurangabadऔरंगाबादSupreme Courtसर्वोच्च न्यायालय