शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

कौटुंबिक गाडा सांभाळून पायाला ‘भिंगरी’; १०० रुपयांच्या अगरबत्त्यामधून दरवळला गृहउद्योग

By साहेबराव हिवराळे | Updated: October 19, 2023 19:24 IST

घराचा आर्थिक डोलारा सांभाळण्याची धडपड करतानाच विविध दुकानांत नोकरी केली, पण कष्ट करूनही हाती पुरेसा पैसा येत नव्हता.

छत्रपती संभाजीनगर : इच्छाशक्ती असेल तर श्रमातून सोने करण्यासाठी यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. केवळ श्रम आणि १०० रुपयांच्या भांडवलावर पहाटेपासून फूलविक्री ते कुरडया, पापड, लोणचे, खारवडी विक्रीतून किमान दोन हजार ग्राहकांचे नेटवर्क शिवकन्या पाटील या महिलेने छत्रपती संभाजीनगरात उभे केले आहे.

शिवकन्या पाटील यांनी फक्त दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले असून सध्या इयत्ता १२ वीत प्रवेश घेतलेला आहे. गावाकडे बालपणी अनेकदा दुसऱ्यांच्या शेतात कापूस वेचणीपासून अनेक कामे त्यांना करावी लागली. घरची शेती असून नसल्यासारखीच; त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे.२००४ मध्ये त्यांचे लग्न झाले. खेड्यात राहणाऱ्या शिवकन्या छत्रपती संभाजीनगरात आल्या. पती खासगी कंपनीत कामाला; पण नोकरी कायमस्वरूपी नव्हती. परिस्थितीमुळे उदरनिर्वाहासाठी काम सुरू करायचे तर हाती पैसा नव्हता.

घराचा आर्थिक डोलारा सांभाळण्याची धडपड करतानाच विविध दुकानांत नोकरी केली, पण कष्ट करूनही हाती पुरेसा पैसा येत नव्हता. इतरांसाठी मेहनत करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय का नको, असे म्हणत अवघ्या शंभर रुपये भांडवलावर शिवकन्या पाटील यांनी उदबत्ती विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यातून मिळालेल्या अनुभवातून वैष्णवी महिला गृहोद्योगाची सुरुवात केली. प्रभावी मार्केटिंग व दर्जेदार उत्पादनाच्या जोरावर गृहोद्योगात वेगळी ओळख निर्माण केली. त्यांची ही वाटचाल गृहिणींसाठी प्रेरणादायी आहे. यामुळे आत्मविश्वासही वाढल्याचे त्यांनी सांगितले. भावांनी या कामासाठी त्यांना सहकार्य केले.

मागणीनुसार विविध पदार्थ..सुरुवातीला पापड, मैत्रिणीकडून आणलेल्या खारवड्या, इतर पदार्थ विक्रीस सुरुवात केली, त्यास ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. उदबत्तीचा व्यवसाय कायम ठेवून त्यांनी विविध पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली. वडील, भाऊ व त्यांची पत्नी यांची कामात साथ मिळत गेली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNavratriनवरात्रीWomenमहिला