शहरं
Join us  
Trending Stories
1
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
2
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
3
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
4
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
5
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
6
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
7
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
8
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
9
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
10
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
11
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
12
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
13
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
14
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
15
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
16
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
17
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
18
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
19
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
20
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

बीड बायपास सर्व्हिस रोडचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:09 IST

: बायपास परिसरात निसर्गरम्य वातावरणात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या, केवळ सर्व्हिस रोड नसल्याने रस्ता ओलांडताना काळजाचा थरकाप होताना दिसतो. जालना रोडवरील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी बायपासची निर्मिती झाली. रस्त्याच्या दुतर्फा नागरी वसाहतींनी परिसर गजबजून गेला, आता बायपास फक्त नावालाच राहिला असून, तो लोकवस्तीतील रस्ता ठरला आहे. याच रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता सर्व्हिस रोड तयार होणे अत्यंत गरजेचे आहे.

ठळक मुद्देनागरिकांचा सवाल : वादग्रस्त मालमत्ता वगळता मोकळ्या जागेचा विचार का नाही

औरंगाबाद : बायपास परिसरात निसर्गरम्य वातावरणात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या, केवळ सर्व्हिस रोड नसल्याने रस्ता ओलांडताना काळजाचा थरकाप होताना दिसतो. जालना रोडवरील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी बायपासची निर्मिती झाली. रस्त्याच्या दुतर्फा नागरी वसाहतींनी परिसर गजबजून गेला, आता बायपास फक्त नावालाच राहिला असून, तो लोकवस्तीतील रस्ता ठरला आहे. याच रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता सर्व्हिस रोड तयार होणे अत्यंत गरजेचे आहे. महानुभाव आश्रम चौक ते देवळाई चौकापर्यंत सर्व्हिस रोडसाठी अडथळा ठरणाऱ्या मालमत्तेवर मार्किंग करण्यात आली आहे; परंतु मालमत्तेच्या संपादनाचा मुद्दा पुढे करून सर्व्हिस रोडच्या प्रश्नावर पांघरून घातले आहे.अपघाताने पोलीस समोर आलेबायपासवर जडवाहनांची वाहतूक व दुचाकी, चार चाकीची लगबग तसेच शाळकरी मुलांची नेआण करणाºयांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर आठवडाभराच्या अंतराने आॅगस्ट महिन्यात एकापाठोपाठ एक असे अनेक बळी गेले. वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पोलीस यंत्रणा पुढे आली. मात्र, बायपासच्या सर्व्हिस रोडचा प्रश्न सोडविण्यासाठी मनपा आणि राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाने वर हात केले आहे.सर्व्हिस रोडवर पुन्हा टपºयामनपाने टपºया हटवून सर्व्हिस रोड मोकळा करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु एमआयटीसमोर सर्व्हिस रोड असून, त्याच रोडवर पुढे संग्रामनगरपर्यंत मोकळाच रस्ता आहे. काही मालमत्ता सोडल्या तर नियमानुसार अनेकांनी सर्व्हिस रोडची जागा सोडूनच बांधकाम केले आहे, असे निदर्शनास येते. सर्व्हिस रोडचे काम रेंगाळल्याने पुन्हा टपºया बसविणे सुरू झाले आहे, अतिक्रमण पुन्हा वाढत असेल, तर मग त्या रस्त्याचे काम मनपा हाती का घेत नाही, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.भुयारी बोगदा आणि सर्व्हिस रोडदेवळाई चौकात रेल्वे फाटकात दर अर्ध्या तासाला थांबण्यापेक्षा काही तरी तोडगा काढून भुयारी मार्ग काढल्यास नागरिकांचा प्रवास सोयीचा होईल. अनेकदा देवळाई परिसरातील नागरिकांना संग्रामनगर पुलावरून वळसा घेऊन जालना रोड गाठावा लागतो. सर्व्हिस रोडचा प्रश्न रखडला आणि भुयारी मार्गाचा कुणी विचार करण्यास तयार नाही. शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी असल्याने रविवारशिवाय घरी राहत नाही. आंदोलन छेडण्यासाठी रस्त्यावर येता येत नाही, अशी शोकांतिका सातारा-देवळाईतील नागरिकांची झाली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका