शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
4
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
7
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
8
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
9
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
10
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
11
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
12
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
13
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
14
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
15
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
16
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
17
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
18
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
19
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
20
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"

बीड बायपास सर्व्हिस रोडचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:09 IST

: बायपास परिसरात निसर्गरम्य वातावरणात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या, केवळ सर्व्हिस रोड नसल्याने रस्ता ओलांडताना काळजाचा थरकाप होताना दिसतो. जालना रोडवरील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी बायपासची निर्मिती झाली. रस्त्याच्या दुतर्फा नागरी वसाहतींनी परिसर गजबजून गेला, आता बायपास फक्त नावालाच राहिला असून, तो लोकवस्तीतील रस्ता ठरला आहे. याच रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता सर्व्हिस रोड तयार होणे अत्यंत गरजेचे आहे.

ठळक मुद्देनागरिकांचा सवाल : वादग्रस्त मालमत्ता वगळता मोकळ्या जागेचा विचार का नाही

औरंगाबाद : बायपास परिसरात निसर्गरम्य वातावरणात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या, केवळ सर्व्हिस रोड नसल्याने रस्ता ओलांडताना काळजाचा थरकाप होताना दिसतो. जालना रोडवरील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी बायपासची निर्मिती झाली. रस्त्याच्या दुतर्फा नागरी वसाहतींनी परिसर गजबजून गेला, आता बायपास फक्त नावालाच राहिला असून, तो लोकवस्तीतील रस्ता ठरला आहे. याच रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता सर्व्हिस रोड तयार होणे अत्यंत गरजेचे आहे. महानुभाव आश्रम चौक ते देवळाई चौकापर्यंत सर्व्हिस रोडसाठी अडथळा ठरणाऱ्या मालमत्तेवर मार्किंग करण्यात आली आहे; परंतु मालमत्तेच्या संपादनाचा मुद्दा पुढे करून सर्व्हिस रोडच्या प्रश्नावर पांघरून घातले आहे.अपघाताने पोलीस समोर आलेबायपासवर जडवाहनांची वाहतूक व दुचाकी, चार चाकीची लगबग तसेच शाळकरी मुलांची नेआण करणाºयांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर आठवडाभराच्या अंतराने आॅगस्ट महिन्यात एकापाठोपाठ एक असे अनेक बळी गेले. वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पोलीस यंत्रणा पुढे आली. मात्र, बायपासच्या सर्व्हिस रोडचा प्रश्न सोडविण्यासाठी मनपा आणि राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाने वर हात केले आहे.सर्व्हिस रोडवर पुन्हा टपºयामनपाने टपºया हटवून सर्व्हिस रोड मोकळा करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु एमआयटीसमोर सर्व्हिस रोड असून, त्याच रोडवर पुढे संग्रामनगरपर्यंत मोकळाच रस्ता आहे. काही मालमत्ता सोडल्या तर नियमानुसार अनेकांनी सर्व्हिस रोडची जागा सोडूनच बांधकाम केले आहे, असे निदर्शनास येते. सर्व्हिस रोडचे काम रेंगाळल्याने पुन्हा टपºया बसविणे सुरू झाले आहे, अतिक्रमण पुन्हा वाढत असेल, तर मग त्या रस्त्याचे काम मनपा हाती का घेत नाही, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.भुयारी बोगदा आणि सर्व्हिस रोडदेवळाई चौकात रेल्वे फाटकात दर अर्ध्या तासाला थांबण्यापेक्षा काही तरी तोडगा काढून भुयारी मार्ग काढल्यास नागरिकांचा प्रवास सोयीचा होईल. अनेकदा देवळाई परिसरातील नागरिकांना संग्रामनगर पुलावरून वळसा घेऊन जालना रोड गाठावा लागतो. सर्व्हिस रोडचा प्रश्न रखडला आणि भुयारी मार्गाचा कुणी विचार करण्यास तयार नाही. शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी असल्याने रविवारशिवाय घरी राहत नाही. आंदोलन छेडण्यासाठी रस्त्यावर येता येत नाही, अशी शोकांतिका सातारा-देवळाईतील नागरिकांची झाली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका