शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

विस्थापितांचे भक्तिनगर चिखलमुक्त झाले पण पाणीदार कधी होणार? 

By साहेबराव हिवराळे | Updated: February 15, 2024 14:38 IST

एक दिवस एक वसाहत; डॉक्टर, वकील, आयटी सेक्टर ते सरकारी अधिकारी-कर्मचारी वास्तव्यास, पण तक्रार करण्यास पुढे येणार कोण?

छत्रपती संभाजीनगर : शहरात एक तपापूर्वी रस्ते रुंदीकरणाची मोहीम राबविली गेली आणि त्यातून अनेक कुटुंबे विस्थापित झाली. या विस्थापितांनी मग पिसादेवी रोडवर भक्तिनगर वसवले. काळ्या शेतजमिनीत वसलेल्या भक्तिनगरवासीयांना तब्बल तपभर चिखल तुडवावा लागला. आता काही रस्ते सिमेंट काँक्रिटचे झाले असून जलवाहिनीही टाकण्यात आली. पण त्यातून पाण्याऐवजी फस्स हवा तेवढी येते. यातून नळाला पाणी कधी येणार याची प्रतीक्षा रहिवाशांना आहे. वीज पुरवठाही कमी दाबाने असल्याने घरातील वीज उपकरणे शोभेची बनली आहेत. 

भक्तिनगरात डॉक्टर, वकील, आयटी सेक्टर ते सरकारी अधिकारी- कर्मचारी वास्तव्यास आहेत. तरीही तक्रार करण्यास कुणीही पुढे धजावत नाही. त्यामुळे प्रश्न सुटणेही अवघड झाले आहे. यशवंतनगरातील तीन गल्ल्यांतील रस्ते अजूनही मातीचेच आहेत. त्यामुळे रहिवाशांना पावसाळ्यात चिखलातून येजा करावी लागणार आहेच. शेतजमिनीतील ही वसाहत असल्याने सर्वांनी बोअरवेलच घेतले. हे पाणी वापरासाठी आणि जारच्या पाण्यावर तहान भागवावी लागते आहे.

वसाहतीत कचरागाडी येते परंतु सफाई कर्मचारी फिरकत नाहीत. घंटागाड्यांतील कचरा वाहतूक करणाऱ्यांनी कचरा गोळा करून तो सुरळीत वसाहतीबाहेर नेऊन टाकावा जेणेकरून परिसरात अस्वच्छता पसरणार नाही, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.

सरपटणारे प्राणी आढळतात....सध्या रस्ते गुळगुळीत झाल्यामुळे घरापर्यंत लहान मुलांंना आणि ज्येष्ठांना ये-जा करणे सोयीचे ठरते आहे. परंतु लगत परिसरात शेती आणि मोंढा असल्याने सरपटणारे प्राणी अनेकदा अंगणात दिसतात. अशा वेळी सर्पमित्रांना बोलवावे लागते. परंतु सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वॉर्डात आठवड्यातून एकदा तरी स्वच्छता करावी व औषध फवारणी करावी. -सुशीला गायकवाड

जलवाहिनी दिसते, पाणी नाही... यशवंतनगरात तीन रस्ते सिमेंट काँक्रिट विनाच सोडले आहेत. आम्ही स्वखर्चाने ड्रेनेज लाइन टाकली. आता नुकतीच जलवाहिनी टाकली आहे परंतु त्यास पाणीदेखील सोडण्यास आलेले नाही. पावसाळ्यात तर नागरिकांना दरवर्षीप्रमाणे चिखल तुडवावा लागणार आहे. शाळकरी मुलांना मुख्य रस्त्यावर आणून सोडावे न्यावे लागते. किती दिवस हा त्रास सहन करावा लागणार आहे.- अन्वर शहा

गुंठेवारीचा मोठा प्रश्नगुंठेवारीचा प्रश्न सुटलेला नसल्याने नागरिकांना बँका कर्ज देत नाहीत. कर वसुली केली जाते; पण मनपात असूनही खेड्यागत अवस्था आहे. नागरिकांच्या मूलभूत समस्यांना सोडविण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.-जिजाबाई जमधडे

शहरात जाण्याची गरज नाही...प्रत्येक बारीकसारीक वस्तूंसाठी पूर्वी शहरात जावे लागत होते; आता पिसादेवी रस्त्यावर हॉस्पिटल, हॉटेल, मंगल कार्यालये, दुकाने आहेत. त्यामुळे शहरात जाण्याची गरज नाही. भक्तिनगरात जलवाहिनी टाकावी, अशी मागणी आहे.-कैलास काकडे

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका