शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

सावधान! मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट

By विकास राऊत | Updated: July 12, 2023 20:38 IST

पावसाळा सुरू झाल्यापासून आजवरच्या सरासरी तुलनेत कमी पाऊस झाल्यामुळे पेरण्यांवर परिणाम झाला आहे.

छत्रपती औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना बुधवार १२ जुलैपासून हवामान खात्याने यलो अलर्टचा इशारा दिला आहे.

पाच जिल्ह्यातील औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात १४ जुलैपर्यंत तर परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात १२ जुलै या एकाच दिवसासाठी येलो अलर्ट आहे. तर विदर्भात १६ जुलैपर्यंत यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान मराठवाड्यात बुधवारी सकाळपर्यंत ८.२ मि.मी. पावसाची नोंद झाली.

पावसाळा सुरू झाल्यापासून आजवरच्या सरासरी तुलनेत कमी पाऊस झाल्यामुळे पेरण्यांवर परिणाम झाला आहे. १ जून ते १२ जुलैपर्यंत ६६ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाल्याने या पट्ट्यातील पेरण्यांचे प्रमाण वाढले आहे, एवढीच समाधानकारक बाब सध्या आहे. विभागाची वार्षिक सरासरी ६७९.५ मि.मी. आहे. २० टक्के पाऊस आजवर झाला आहे. विभागातील ११ मोठ्या धरणांमध्ये ४५.४४ टक्के जलसाठा असून फक्त १ टक्का पाणी गेल्या आठवड्याच्या तुलनेत धरणात वाढले आहे.

येलो अलर्ट म्हणजे काय....हवामान खात्याच्या सूचनेनुसार येलो अलर्ट म्हणजे संबंधित शहरांमध्ये नैसर्गिक संकटाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या जनजीवनावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याच्या सूचना हवामान खात्याकडून दिल्या जातात.

मराठवाड्यात ४५० मंडळे...मराठवाड्यातील ८ हजार ५०० गावांतील पर्जन्यमान मोजण्यासाठी ४५० मंडळनिहाय विश्लेषण केले जाते. २० गावांसाठी एक मंडळाचे क्षेत्र असून आजवर ६६ मंडळात अतिवृष्टी झाल्याने १३२० गावांत बऱ्यापैकी पाऊस पडल्याचे दिसते. ३ मंडळात १०० मि.मी.पेक्षा जास्तीचा पाऊस झाला आहे. ७ हजार ६८० गावांमध्ये कमी-अधिक पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा