शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
5
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
6
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
7
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
8
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
9
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
10
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
11
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
12
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
13
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
14
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
15
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
16
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
17
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
18
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
19
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
20
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!

सावधान! मोबाइल करतोय दूरचे दिसणे कमी, अशी घ्या डोळ्यांची काळजी

By संतोष हिरेमठ | Updated: July 22, 2023 19:14 IST

मोबाइलच्या अतिवापरामुळे दूरच्या दृष्टीवर परिणाम होतो आहे

छत्रपती संभाजीनगर : हल्ली मोबाइल वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष कोरोना प्रादुर्भाव काळात आणि त्यानंतर लहान मुलांमध्येही मोबाइलचा स्क्रिन टाइम वाढला आहे. परिणामी, डोळ्यांचे आरोग्य बिघडत आहे. मोबाइलच्या अतिवापरामुळे दूरच्या दृष्टीवर परिणाम होतो. त्यातूनच दूरचा नंबर लागण्यास हातभार लागत असल्याचे नेत्ररोगतज्ज्ञ डाॅ. अभिजित गोरे यांनी सांगितले

मोबाइलमुळे नेत्रदोष निर्माण होतो का?मोबाइलचा स्क्रिन टाइम वाढल्यामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा निर्माण होतो. लहान मुलांचे वाढते वय असते. या वयात मोबाइलच्या अधिक वापरामुळे चष्मा लागतो, तर मोठ्या व्यक्तींमध्ये डोळे कोरडे पडणे, लाल होणे, कचकच होणे, थकवा जाणवणे आदी त्रास होतो.

कोणकोणत्या कारणांनी नेत्रदोष उद्भवतात?सतत मोबाइल, लॅपटाॅपच्या स्क्रिनकडे पाहणे, रात्रीचे जागरण, प्रदूषण, ताणतणाव, सकस आहाराअभावी जीवनसत्त्वाचा अभाव, आनुवंशिकता आदी कारणांमुळे नेत्रदोष उद्भवतात.

कोणत्या वयोगटात नेत्ररोग अधिक आहेत ?सामान्यत: १८ ते ४५ वर्षे या वयोगटात नेत्ररोगाची अधिक कारणे आहेत. तरुणांमध्ये रिल्स पाहण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यातून डोळे लाल होणे, डोळे कोरडे होणे असा त्रास होतो.

डोळ्यांची कशी काळजी घ्यावी?मोबाइलचा अतिवापर करू नये. अनावश्यक स्क्रिनचा वापर टाळावा. संगणकावर काम करणाऱ्यांनी दर अर्धा तासाला किमान एक मिनीट डोळे बंद करावे. सकस आहार घ्यावा. रात्रीचे जागरण टाळावे. लहान मुलांचे मैदानात खेळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मैदानी खेळ खेळल्यामुळे दूरची दृष्टी चांगली राहते. डोळ्यांना काही त्रास जाणवल्यास वेळीच डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.

टॅग्स :MobileमोबाइलAurangabadऔरंगाबादHealthआरोग्य