शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

खबरदार ! सिग्नल तोडल्यास दंड भरल्यानंतरही तीन महिने मिळणार नाही परवाना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 18:36 IST

२० चालकांचे लायसन्स जप्त करून निलंबित करण्याचे प्रस्ताव आरटीओकडे पाठविण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

ठळक मुद्देदंड भरल्यानंतरही तीन महिने मिळणार नाही परवाना परवाना पंधरा दिवस ते तीन महिन्यांपर्यंत निलंबित होणार आहे.

औरंगाबाद : वाहतुकीचे नियम मोडणे वाहनचालकांना आता चांगलेच महागात पडणार आहे. सिग्नल तोडणे, दुचाकीवरून ट्रिपलसीट जाणे, मोबाईलवर बोलताना वाहन चालविणे, असे प्रकार करताना आढळून आल्यास वाहन चालविण्याचा परवाना पंधरा दिवस ते तीन महिन्यांपर्यंत निलंबित होणार आहे. नव्या नियमानुसार शहर वाहतूक पोलिसांनी दोन दिवसांपासून कारवाईला सुरुवात केली असून, २० चालकांचे लायसन्स जप्त करून निलंबित करण्याचे प्रस्ताव आरटीओकडे पाठविण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

शहरात वाहनांची संख्या १३ लाखांवर आहे. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था उत्तम राहावी याकरिता पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील प्रमुख रस्त्यांवर ४५ वाहतूक सिग्नल बसविण्यात आले. वाहतूक नियमन करण्यासाठी सुमारे साडेतीनशे वाहतूक पोलीस शहरात कार्यरत आहेत. वाहतूक पोलिसांसमोर काही जण बिनधास्त सिग्नल तोडून पळतात. सिग्नल तोडून पळणाऱ्या वाहनचालकांमुळे अपघाताचा धोका किती तरी पटीने वाढतो. यासोबत ट्रिपल सीट दुचाकीचालक, मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे, अशा वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून नियमित दंडात्मक कारवाई केली जाते. 

शिवाय नियम मोडून वाहन चालविताना सेफ सिटी प्रकल्पाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाले त्या वाहनचालकांवर घरपोच दंडाच्या नोटिसा पाठविल्या जात आहेत; मात्र दंडात्मक कारवाईचा वाहनचालकांवर परिणाम होत नसल्याचे निदर्शनास आल्याने नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी त्यांचा वाहन चालविण्याचा परवानाच निलंबित करण्याचा निर्णय शासनाने घेतला. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला.

या शासन निर्णयाची अंमलबजावणी वाहतूक पोलिसांनी सुरू केली. पहिल्या टप्प्यात वाहतूक सिग्नल तोडणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, ट्रिपल सीट दुचाकीचालक आणि राँग साईडने वाहन पळविणाऱ्यांचे लायसन्स जप्त करून निलंबित करण्यात येत आहे. 

दोन दिवसांत २० जणांवर कारवाईवाहतूक सिग्नल तोडणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, ट्रिपल सीट दुचाकीचालक आणि विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांचे लायसन्स पंधरा दिवस ते तीन महिन्यांपर्यंत निलंबित करण्याचा प्रस्ताव वाहतूक शाखेकडून आरटीओला पाठविला जात आहे. दोन दिवसांत २० जणांचे लायसन्स जप्त करण्यात आले असून, त्यांचे लायसन्स निलंबित करण्याची कार्यवाही सुरू आहे.- डॉ. दीपाली धाटे-घाडगे, पोलीस उपायुक्त औरंगाबाद शहर

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसAurangabadऔरंगाबाद