शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सावधान...! शक्यतो भरउन्हात घराबाहेर पडू नका, उष्णतेची लाट महिनाभर

By विजय सरवदे | Updated: May 2, 2024 18:59 IST

नागरिकांनी दुपारी १२ ते ३ या वेळेत उन्हापासून स्वत:चा बचाव करणे हाच पर्याय आहे.

छत्रपती संभाजीनगर : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता जाणवू लागली असून त्याकडे दुर्लक्ष केल्यास उष्माघातामुळे प्रकृती गंभीर होऊ शकते. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडणे किंवा उन्हात कामे करणाऱ्या नागरिकांनी दुपारी १२ ते ३ या वेळेत उन्हापासून स्वत:चा बचाव करणे हाच पर्याय आहे. दरम्यान, राज्याच्या आरोग्य विभागाने इशारा दिला आहे की, अजून महिनाभर तरी उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज असून प्रामुख्याने ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांनी सतर्क राहावे.

तथापि, जि.प. आरोग्य विभागाने सर्व ५१ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरू केले असून या महिनाभराच्या कालावधीत उष्माघाताचा एकही रुग्ण आढळून आला नाही. परंतु सौम्य लक्षणे असलेल्या ५०० रुग्णांवर बाह्यरुग्ण सेवा विभागात उपचार करण्यात आले आहेत. या सर्वांची प्रकृती उत्तम आहे. कोणालाही दाखल करून घेण्याची गरज भासली नाही. या रुग्णांमध्ये डोकेदुखी, मळमळ होणे, लघवीला जळजळ होणे, अशक्तपणा जाणवणे आदी लक्षणे जाणवत होती.

मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालय सोडू नये, उष्माघाताची लक्षणे असलेला रुग्ण आल्यास तत्काळ दाखल करून त्याच्यावर उपचार करावेत, अशा लेखी सूचना दिल्या आहेत. उष्माघात कक्षामध्ये चोवीस तास कुलर सुरू ठेवून तो कक्ष थंड ठेवण्याचे सूचित करण्यात आले आहे. यासंबंधी आवश्यक औषधींचा पुरेसा साठा सर्व आरोग्य केंद्रांना पुरवठा करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात जवळपास १ लाख क्षारसंजीवनीचा (ओआरएस) साठा आहे.

काय करावे- सतत पुरेसे पाणी पित राहावे, तहान लागली नसली तरीही थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावे.- ओरल रिहायड्रेशन सोल्युशन (क्षारसंजीवनी) किंवा लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस यासारखे घरगुती पेय प्यावे.- उन्हात बाहेर जाताना स्कार्फ, छत्री, टोपीचा वापर करावा.- शक्यतो दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेरील कामे टाळावीत.- उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास त्वरित दवाखान्यात जावे

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHeat Strokeउष्माघात