शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याला दगा; पाणी दिले..दिले..म्हणता..पण साठवणार कुठे, ते सांगा?

By विकास राऊत | Updated: March 22, 2023 13:03 IST

४७ वर्षांत ६३.८३ टीएमसी पाणी का सापडले नाही? जलतज्ज्ञांची शासनावर टीका

छत्रपती संभाजीनगर : २०२१ सालच्या विजयादशमी व नंतर दिवाळीच्या मुहूर्तावर मराठवाड्यासाठी मध्य गोदावरी उपखोऱ्यातील १९.२९ आणि निम्न पैनगंगा धरणापर्यंत ४४.५४, अशा ६३.८३ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास गेल्या सरकारने मंजुरी दिली. घोषणेला १९ महिन्यांचा काळ लोटला असून, हा सगळा प्रकार मराठवाड्याचा विश्वासघात करणारा असल्याची टीका जलतज्ज्ञ करीत आहेत.

४७ वर्षांपासून हे पाणी मराठवाड्याला का मिळाले नाही? येथील राजकीय नेतृत्व, प्रशासकीय यंत्रणेला हे पाणी कसे सापडले नाही, असा प्रश्नही जलतज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. पाणी कसे उपलब्ध झाले आहे, ते साठवणार कुठे, नवे-जुने किती प्रकल्प यात आहेत, त्याला निधी किती, कधी तरतूद केली आहे, याची माहिती गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जाहीर केलेली नाही. मध्य गोदावरी खोऱ्यात पैठण व सिद्धेश्वर धरणाच्या खालील बाजूस फक्त १०३ टीएमसी पाणी वापरता येणार आहे. त्याहून अधिक पाणी तेलंगणाला सोडून द्यावे लागते. अशा परिस्थितीत १९ टीएमसी पाणी कुठून देणार, हे सांगणे गरजेचे आहे. लवादाकडून मिळालेले पाणी पूर्णपणे वापरले जात नाही. असे असताना २०२१ साली केलेली घोषणा असंयुक्तिक वाटत असल्याची टीका होत आहे. दरम्यान, मराठवाडा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी या घोषणेबाबत सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे.

असा केला होता दावा....मराठवाड्यातील गोदावरी खोऱ्यातील, मध्य गोदावरी उपखोऱ्यातील १९७५ चा पाणी वापर संरक्षित होता. त्यातील त्रुटी दुरुस्त केल्याने १९.२९ टीएमसी पाणी उपलब्ध झाले. बीड, हिंगोली, नांदेड येथील प्रकल्पांच्या अडचणी दूर होतील. जलविज्ञान कार्यालयाच्या मुख्य अभियंत्यांनी केलेल्या अभ्यासानुसार निम्न पैनगंगा धरणापर्यंत ११७.८७ ऐवजी १६७.४६ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. त्यानुसार अगोदरचे ११७.८७ टीएमसी आणि अधिकचे ४४.५४ टीएमसी असे मिळून १६७.४६ टीएमसी पाणी वापरण्यास मंजुरी देण्याचा निर्णय झाला. याचा फायदा हिंगोली, यवतमाळ व नांदेड जिल्ह्यांना होणार आहे, असा दावा करीत माजी जलसंपदा मंत्र्यांनी अतिरिक्त पाणी मिळण्याची घोषणा केली होती.

मराठवाड्याला कुणी गंडविले?४७ वर्षांचा वेळ का घालविला, हाच मूळ प्रश्न आहे. या सगळ्या प्रकरणात शंका येण्याचे कारण म्हणजे लवादाने पाणी वाटपातील चूक दुरुस्त केलेली नाही. लवादाला गृहीत धरून हा निर्णय झाला असेल, तर यावर कुणी आक्षेप घेतल्यानंतर अडचण निर्माण होईल. ही केवळ चूक आहे की, मराठवाड्याला कुणी गंडविले आहे?-प्रा. प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ

चुकीची घोषणा?ही घोषणाच वास्तविकत: न तपासता जाहीर केल्याचे दिसते आहे. लवादाला गृहीत धरून निर्णय झाला तरी पाणी कुठून आणणार, हे समजण्यास मार्ग नाही. जे प्रकल्प यवतमाळच्या जिवावर, आंध्र आणि विदर्भासाठी आहेत, ते पाणी मराठवाड्याला कसे आणणार? तेथील जुना प्रकल्प रद्द होणार नाही, त्याचे आंध्र प्रदेशने पैसे भरलेले आहेत.-डॉ. शंकर नागरे, जलतज्ज्ञ तथा माजी सदस्य मराठवाडा विकास मंडळ

महामंडळ सूत्रांचा दावारखडलेले प्रकल्प पूर्ण होतील. जायकवाडीतून ७२ टीएमसी पाणी मिळते. पाणी वापराचा आराखडा मोठा करण्यासाठी पाणी साठवण्याची भांडी (प्रकल्प) वाढविणे गरजेचे आहे. जायकवाडीखाली काही धरणे नव्याने बांधली तर पाणी वाढेल. अलीकडच्या दोन ते चार वर्षातील पावसाळ्यात बाभळी बंधाऱ्यातून अंदाजे ६०० टीएमसी पाणी वाहून गेले.-गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबाद