शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

मराठवाड्याचा विश्वासघात; १९ टीएमसी पाणी देण्याची घोषणा म्हणजे फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2021 12:47 IST

पाणी कसे उपलब्ध झाले आहे, याची माहिती देण्यात आलेली नाही.

ठळक मुद्देजलतज्ज्ञांची शासनावर टीका

औरंगाबाद : विजयादशमीच्या मुहूर्तावर मराठवाड्यासाठी मध्य गोदावरी उपखोऱ्यातील १९.२९ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मंजुरी दिल्याची घोषणा ही मराठवाड्याच्या जनतेच्या डोळ्यात केलेली धूळफेक ( announcement to provide 19 TMC of water is a fraud)  असल्याची टीका जलतज्ज्ञांनी केली आहे. जलसंपदा मंत्र्यांनी जाहीर केलेला निर्णय चुकीचा असून, यामुळे विभागाच्या तोंडाला एकाप्रकारे पाने पुसली गेली आहेत, असा आरोपही जलतज्ज्ञांनी केला आहे.

मराठवाड्यातील गोदावरी खोऱ्यातील मध्य गोदावरी उपखोऱ्यातील १९७५ चा पाणी वापर संरक्षित होता. त्यातील त्रुटी दुरूस्त केल्याने १९.२९ टीएमसी पाणी उपलब्ध झाले आहे. या संचिकेवर सही केली आहे. मराठवाड्याला याचा फायदा होणार आहे. हे प्रकल्प पाण्यावाचून थांबले होते. ते पूर्ण करता येतील. बीड, हिंगोली, नांदेड येथील प्रकल्पांच्या अडचणी दूर होतील, अशी घोषणा जलसंपदा मंत्री जयंत पाटील १५ ऑक्टोबर रोजी केली होती.

मराठवाड्याची घोर फसवूणकम. गो. पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी तांत्रिक सल्लागार या. रा. जाधव यांनी सांगितले, हा निर्णय चुकीचा व दिशाभूल करणार आहे. पाणी कसे उपलब्ध झाले आहे, याची माहिती देण्यात आलेली नाही. मध्य गाेदावरी खोऱ्यात पैठण व सिद्धेश्वर धरणाच्या खालील बाजूस फक्त १०३ टीएमसी पाणी वापरता येणार आहे. त्याहून अधिक पाणी तेलंगणाला सोडून द्यावे लागते. अशा परिस्थितीत जलसंपदा मंत्र्यांनी १९ टीएमसी पाणी कुठून देणार, हे सांगणे गरजेचे आहे. लवादाकडून मिळालेले पाणी पूर्णपणे वापरले जात नाही. असे असताना मंत्र्यांनी केलेली घोषणा असंयुक्तिक वाटते आहे.

तर पुन्हा अडचण होईलजलतज्ज्ञ प्रा. प्रदीप पुरंदरे म्हणाले, ४६ वर्षांचा वेळ का घालविला हाच मूळ प्रश्न आहे. घोषणेबाबत शंका येण्याचे कारण म्हणजे लवादाने पाणी वाटपातील चूक दुरूस्त केलेली नाही. लवादाला गृहित धरून हा निर्णय झाला असेल, तर यावर कुणी आक्षेप घेतल्यानंतर अडचण निर्माण होईल.

चुकीची घोषणा असल्याचे वाटतेमराठवाडा विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य शंकर नागरे यांनी सांगितले, ही घोषणाच चुकीची असल्याचे वाटते. वास्तविकता न तपासता निर्णय जाहीर करून टाकल्याचे दिसत आहे. लवादाला गृहीत धरून निर्णय झाल्याचे दिसते. नवीन पाणी कुठून आणणार हे समजण्यास मार्ग नाही.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा