शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

कर्जमाफी योजनेतून शेतकऱ्यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:15 IST

जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी आदी योजनेतून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकºयांना लाभ देण्यात आला. या योजना लाभार्थ्यांसाठी लाभकारी ठरल्या आहेत, असे प्रतिपादन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी प्रजासत्ताक दिनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार सदैव शेतकºयांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

ठळक मुद्देदिवाकर रावते : फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकार शेतकºयांच्या पाठीशी

औरंगाबाद : जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी आदी योजनेतून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकºयांना लाभ देण्यात आला. या योजना लाभार्थ्यांसाठी लाभकारी ठरल्या आहेत, असे प्रतिपादन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी प्रजासत्ताक दिनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार सदैव शेतकºयांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली.येथील पोलीस आयुक्त कार्यालयाच्या देवगिरी मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण रावते यांच्या हस्ते झाले. यावेळी रावते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त निपुण विनायक, जि. प.च्या सीईओ पवनीत कौर, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह आदींची उपस्थिती होती. रावते म्हणाले, जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने शासनाने दुष्काळ घोषित केला. उपाययोजनांची अंमलबजावणीही तात्काळ करण्यास सुरुवात केली.जनावरांच्या चाºयासाठी ज्या क्षेत्रात थोडेफार पाणी उपलब्ध आहे, त्याठिकाणी शासनामार्फत शेतकºयांना मोफत बियाणे, पाणी उपलब्ध करून देण्यात आले. गाळपेºयासाठी आकारणी करीत असलेले शुल्कदेखील चारा पिकांसाठी माफ केले. यामध्ये २१ हजारांपेक्षा अधिक शेतकºयांनी प्रतिसाद दिला असून, अडीच लाख मेट्रिक टन चाºयाची निर्मिती होणे अपेक्षित आहे.रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामांवर आजपर्यंत ५२ कोटी रुपये खर्च झाले आहेत. ५८ हजार ९०० मजुरांना रोजगार उपलब्ध झाला. जलयुक्त शिवार अभियानात ३०४ गावांमध्ये १ हजार ४०६ कामे सुरू आहेत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत औरंगाबादमधील पहिल्या टप्प्यात ७७ आणि दुसºया टप्प्यात १९४ गावांमध्ये कामे सुरू आहेत.जिल्ह्यात ९८६ कोटी २८ लाखांची कर्जमाफीछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यात ९८६ कोटी २८ लाख रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे. नागपूर-मुंबई द्रुतगती महामार्ग म्हणजेच समृद्धी महामार्गासाठी ज्या शेतकºयांनी सहकार्य करून आपली शेती दिली त्यांनासुद्धा बाजारभावापेक्षा पाचपट रक्कम देऊन समृद्धी महामार्गाने समृद्ध करण्याचे काम केले आहे. समृद्धीसाठी जमीन देणाºया शेतकºयांना सुमारे १ हजार ३०० कोटी रुपयांच्या मोबदल्यांचे वाटप करण्यात आल्याचे रावते म्हणाले.-------------

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनAurangabadऔरंगाबाद