शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

कर्जमाफी योजनेतून शेतकऱ्यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:15 IST

जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी आदी योजनेतून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकºयांना लाभ देण्यात आला. या योजना लाभार्थ्यांसाठी लाभकारी ठरल्या आहेत, असे प्रतिपादन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी प्रजासत्ताक दिनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार सदैव शेतकºयांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

ठळक मुद्देदिवाकर रावते : फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकार शेतकºयांच्या पाठीशी

औरंगाबाद : जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी आदी योजनेतून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकºयांना लाभ देण्यात आला. या योजना लाभार्थ्यांसाठी लाभकारी ठरल्या आहेत, असे प्रतिपादन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी प्रजासत्ताक दिनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार सदैव शेतकºयांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली.येथील पोलीस आयुक्त कार्यालयाच्या देवगिरी मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण रावते यांच्या हस्ते झाले. यावेळी रावते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त निपुण विनायक, जि. प.च्या सीईओ पवनीत कौर, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह आदींची उपस्थिती होती. रावते म्हणाले, जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने शासनाने दुष्काळ घोषित केला. उपाययोजनांची अंमलबजावणीही तात्काळ करण्यास सुरुवात केली.जनावरांच्या चाºयासाठी ज्या क्षेत्रात थोडेफार पाणी उपलब्ध आहे, त्याठिकाणी शासनामार्फत शेतकºयांना मोफत बियाणे, पाणी उपलब्ध करून देण्यात आले. गाळपेºयासाठी आकारणी करीत असलेले शुल्कदेखील चारा पिकांसाठी माफ केले. यामध्ये २१ हजारांपेक्षा अधिक शेतकºयांनी प्रतिसाद दिला असून, अडीच लाख मेट्रिक टन चाºयाची निर्मिती होणे अपेक्षित आहे.रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामांवर आजपर्यंत ५२ कोटी रुपये खर्च झाले आहेत. ५८ हजार ९०० मजुरांना रोजगार उपलब्ध झाला. जलयुक्त शिवार अभियानात ३०४ गावांमध्ये १ हजार ४०६ कामे सुरू आहेत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत औरंगाबादमधील पहिल्या टप्प्यात ७७ आणि दुसºया टप्प्यात १९४ गावांमध्ये कामे सुरू आहेत.जिल्ह्यात ९८६ कोटी २८ लाखांची कर्जमाफीछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यात ९८६ कोटी २८ लाख रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे. नागपूर-मुंबई द्रुतगती महामार्ग म्हणजेच समृद्धी महामार्गासाठी ज्या शेतकºयांनी सहकार्य करून आपली शेती दिली त्यांनासुद्धा बाजारभावापेक्षा पाचपट रक्कम देऊन समृद्धी महामार्गाने समृद्ध करण्याचे काम केले आहे. समृद्धीसाठी जमीन देणाºया शेतकºयांना सुमारे १ हजार ३०० कोटी रुपयांच्या मोबदल्यांचे वाटप करण्यात आल्याचे रावते म्हणाले.-------------

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनAurangabadऔरंगाबाद