शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
3
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
4
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
5
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
6
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
7
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
8
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
9
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
10
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
11
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
12
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
13
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
14
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
15
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
16
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
17
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
18
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
19
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
20
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या गरिबीचा फायदा; प्रशासनात संवेदनांचा अभाव - हायकोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 02:30 IST

फसवणुकीच्या घटना वाढत आहेत

- खुशालचंद बाहेतीऔरंगाबाद : शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांना कोर्टकचेऱ्या करणे परवडत नाही. याचा गैरफायदा व्यापारी घेतात. दुर्दैवाने प्रशासकीय यंत्रणाही शेतकऱ्यांसाठी संवेदनशील नाहीत, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. दिल्लीत चालू शेतकरी आंदोलनात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक हाही एक मुद्दा असल्याने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. केळीचा व्यापार करणाऱ्या सानिया काद्री यांना मयूर खंडेलवाल यांनी स्थानिक बाजारपेठेपेक्षा जास्त भावाने केळी विक्री करण्याचे आश्वासन दिले. ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय असल्याने अनेक राज्यांत त्यांचे संबंध आहेत. बाहेरराज्यात विक्री करून जास्त पैसे मिळतील, असे त्यांनी सांगितले. तसा १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारही केला. सानिया काद्री यांनी शेतकऱ्यांकडून केळी विकत घेऊन मयूर खंडेलवाल यांना दिली. खंडेलवाल यांनी परराज्यात विक्री करून जास्त दर मिळवून दिला. सुरुवातीला दररोज पैसेही दिले. नंतर मात्र पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. पुढे सानिया काद्रींना टाळू लागले. तेव्हा मात्र फसवणूक झाल्याचे काद्रींच्या लक्षात आले. त्यांनी सावदा पोलीस ठाणे, जिल्हा जळगाव येथे मयूर खंडेलवाल, त्यांचे वडील कैलाश व इतरांविरुद्ध २ कोटी ७४ लक्ष रुपये फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. खंडेलवाल व इतरांना या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळाला. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला रद्द व्हावा यासाठी खंडेलवाल यांनी ॲड. के.सी. संत यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेत त्यांनी व्यवहार केल्याचे, करार केल्याचे सर्व अमान्य केले. ही याचिका फेटाळताना उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे निरीक्षण नोंदवले. शेतकऱ्यांच्या हतबलतेचा व्यापारी गैरफायदा घेतात. त्यांची कोर्ट-कचेरी करण्याची क्षमता नसते. याचा फायदा घेऊन शेतकऱ्याने मेहनतीने उत्पादन केलेल्या मालाचे पैसे व्यापारी बनवतात, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. पोलिसांनी फसवणुकीची पूर्ण रक्कम हस्तगत झाली नसतानाही अटकपूर्व जामिनाविरुद्ध अपील दाखल केले नसल्याबद्दल उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले.सुरुवातीला शेतकऱ्यांना आकर्षित केले गेले. पुढे शेतकऱ्यांचा विश्वास बसला की, योजनाबद्ध पद्धतीने पैसे देण्यात आले नाहीत आणि त्यांची फसवणूक झाली.दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी आहेत. त्यात फसवणुकीची भरच पडत आहे.-न्या. टी.व्ही. नलावडे आणि एम.जी. सेवलीकर, मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्ट