शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
6
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
7
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
8
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
9
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
10
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
11
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
12
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
13
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
14
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
15
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
16
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
17
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
18
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
19
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
20
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या गरिबीचा फायदा; प्रशासनात संवेदनांचा अभाव - हायकोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 02:30 IST

फसवणुकीच्या घटना वाढत आहेत

- खुशालचंद बाहेतीऔरंगाबाद : शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांना कोर्टकचेऱ्या करणे परवडत नाही. याचा गैरफायदा व्यापारी घेतात. दुर्दैवाने प्रशासकीय यंत्रणाही शेतकऱ्यांसाठी संवेदनशील नाहीत, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. दिल्लीत चालू शेतकरी आंदोलनात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक हाही एक मुद्दा असल्याने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. केळीचा व्यापार करणाऱ्या सानिया काद्री यांना मयूर खंडेलवाल यांनी स्थानिक बाजारपेठेपेक्षा जास्त भावाने केळी विक्री करण्याचे आश्वासन दिले. ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय असल्याने अनेक राज्यांत त्यांचे संबंध आहेत. बाहेरराज्यात विक्री करून जास्त पैसे मिळतील, असे त्यांनी सांगितले. तसा १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारही केला. सानिया काद्री यांनी शेतकऱ्यांकडून केळी विकत घेऊन मयूर खंडेलवाल यांना दिली. खंडेलवाल यांनी परराज्यात विक्री करून जास्त दर मिळवून दिला. सुरुवातीला दररोज पैसेही दिले. नंतर मात्र पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. पुढे सानिया काद्रींना टाळू लागले. तेव्हा मात्र फसवणूक झाल्याचे काद्रींच्या लक्षात आले. त्यांनी सावदा पोलीस ठाणे, जिल्हा जळगाव येथे मयूर खंडेलवाल, त्यांचे वडील कैलाश व इतरांविरुद्ध २ कोटी ७४ लक्ष रुपये फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. खंडेलवाल व इतरांना या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळाला. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला रद्द व्हावा यासाठी खंडेलवाल यांनी ॲड. के.सी. संत यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेत त्यांनी व्यवहार केल्याचे, करार केल्याचे सर्व अमान्य केले. ही याचिका फेटाळताना उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे निरीक्षण नोंदवले. शेतकऱ्यांच्या हतबलतेचा व्यापारी गैरफायदा घेतात. त्यांची कोर्ट-कचेरी करण्याची क्षमता नसते. याचा फायदा घेऊन शेतकऱ्याने मेहनतीने उत्पादन केलेल्या मालाचे पैसे व्यापारी बनवतात, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. पोलिसांनी फसवणुकीची पूर्ण रक्कम हस्तगत झाली नसतानाही अटकपूर्व जामिनाविरुद्ध अपील दाखल केले नसल्याबद्दल उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले.सुरुवातीला शेतकऱ्यांना आकर्षित केले गेले. पुढे शेतकऱ्यांचा विश्वास बसला की, योजनाबद्ध पद्धतीने पैसे देण्यात आले नाहीत आणि त्यांची फसवणूक झाली.दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी आहेत. त्यात फसवणुकीची भरच पडत आहे.-न्या. टी.व्ही. नलावडे आणि एम.जी. सेवलीकर, मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्ट