शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या गरिबीचा फायदा; प्रशासनात संवेदनांचा अभाव - हायकोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 02:30 IST

फसवणुकीच्या घटना वाढत आहेत

- खुशालचंद बाहेतीऔरंगाबाद : शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांना कोर्टकचेऱ्या करणे परवडत नाही. याचा गैरफायदा व्यापारी घेतात. दुर्दैवाने प्रशासकीय यंत्रणाही शेतकऱ्यांसाठी संवेदनशील नाहीत, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. दिल्लीत चालू शेतकरी आंदोलनात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक हाही एक मुद्दा असल्याने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. केळीचा व्यापार करणाऱ्या सानिया काद्री यांना मयूर खंडेलवाल यांनी स्थानिक बाजारपेठेपेक्षा जास्त भावाने केळी विक्री करण्याचे आश्वासन दिले. ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय असल्याने अनेक राज्यांत त्यांचे संबंध आहेत. बाहेरराज्यात विक्री करून जास्त पैसे मिळतील, असे त्यांनी सांगितले. तसा १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारही केला. सानिया काद्री यांनी शेतकऱ्यांकडून केळी विकत घेऊन मयूर खंडेलवाल यांना दिली. खंडेलवाल यांनी परराज्यात विक्री करून जास्त दर मिळवून दिला. सुरुवातीला दररोज पैसेही दिले. नंतर मात्र पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. पुढे सानिया काद्रींना टाळू लागले. तेव्हा मात्र फसवणूक झाल्याचे काद्रींच्या लक्षात आले. त्यांनी सावदा पोलीस ठाणे, जिल्हा जळगाव येथे मयूर खंडेलवाल, त्यांचे वडील कैलाश व इतरांविरुद्ध २ कोटी ७४ लक्ष रुपये फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. खंडेलवाल व इतरांना या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळाला. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला रद्द व्हावा यासाठी खंडेलवाल यांनी ॲड. के.सी. संत यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेत त्यांनी व्यवहार केल्याचे, करार केल्याचे सर्व अमान्य केले. ही याचिका फेटाळताना उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे निरीक्षण नोंदवले. शेतकऱ्यांच्या हतबलतेचा व्यापारी गैरफायदा घेतात. त्यांची कोर्ट-कचेरी करण्याची क्षमता नसते. याचा फायदा घेऊन शेतकऱ्याने मेहनतीने उत्पादन केलेल्या मालाचे पैसे व्यापारी बनवतात, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. पोलिसांनी फसवणुकीची पूर्ण रक्कम हस्तगत झाली नसतानाही अटकपूर्व जामिनाविरुद्ध अपील दाखल केले नसल्याबद्दल उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले.सुरुवातीला शेतकऱ्यांना आकर्षित केले गेले. पुढे शेतकऱ्यांचा विश्वास बसला की, योजनाबद्ध पद्धतीने पैसे देण्यात आले नाहीत आणि त्यांची फसवणूक झाली.दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी आहेत. त्यात फसवणुकीची भरच पडत आहे.-न्या. टी.व्ही. नलावडे आणि एम.जी. सेवलीकर, मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्ट