शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

औरंगाबाद जिल्ह्यात अडीच लाख कुटुंबीय ‘आयुष्यमान भारत’चे लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 11:04 PM

औरंगाबाद : ‘आयुष्यमान भारत’ म्हणजे ‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ २३ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या योजनेचा जिल्ह्यातील अडीच लाख कुटुंबियांना लाभ मिळणार आहे.

ठळक मुद्दे पाच लाखांपर्यंत उपचार : पहिल्या टप्प्यात शासकीय, तर दुसऱ्या टप्प्यात खाजगी रुग्णालयांत योजना

औरंगाबाद : ‘आयुष्यमान भारत’ म्हणजे ‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ २३ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या योजनेचा जिल्ह्यातील अडीच लाख कुटुंबियांना लाभ मिळणार आहे.‘आयुष्यमान भारत’ म्हणजे राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेंतर्गत एका कुटुंबाला पाच लाख रुपये विमा संरक्षण, कोणत्याही आजारावर देशभरातील रुग्णालयात लाभार्थी कुटुंबातील व्यक्तींना उपचार घेता येणार आहे. आरोग्य विभागाकडून शहरी व ग्रामीण भागातील पात्र कुटुंबातील व्यक्तींचे आधार कार्ड, मोबाईल नंबर, कुटुंबाची माहिती संकलित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. २०११ मध्ये झालेले सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणानुसार (एसईसीसी) लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली. यात ज्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाखाच्या आत आहे, अशाच कुटुंबाचा समावेश करण्यात आला आहे.राज्यात २०११ मध्ये झालेले सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणानुसार (एसईसीसी) केवळ सुमारे ८३ लाख लाभार्थी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात सुमारे १ लाख ४७ हजार कुटुंबीय, तर शहरात सुमारे ९५ हजार कुटुंबीय या योजनेचे लाभार्थी आहेत. किमान १२ लाखांवर लोकांना या योजनेतून उपचार मिळणार आहेत. या योजनेबरोबरच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनाही सुरू राहणार आहे.घाटीत उपचारपहिल्या टप्प्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा, महिला रुग्णालयांत या योजनेचा लाभ मिळणार आहे. दुसºया टप्प्यात खाजगी रुग्णालयांचा समावेश होणार आहे. औरंगाबादेत जिल्हा सामान्य रुग्णालय कार्यान्वित नसल्याने केवळ घाटी रुग्णालयात या योजनेतून उपचार होणार आहेत. योजनेतून होणारे उपचार होणार, योजनेची अंमलबजावणी आदींसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे देण्यात येणार आहे.योजनेचा पहिला टप्पाआगामी काही दिवसांत लाभार्थीच्या संख्येत आणखी वाढ होईल. पहिल्या टप्प्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालय, जिल्हा रुग्णालयांत, महिला रुग्णालयांत ही योजना राबविण्यात येणार आहे. दुसºया टप्प्यात खाजगी रुग्णालयांचा समावेश होईल. त्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू आहे.- डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटल