शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद,उस्मानाबादच्या नामांतरापूर्वी आक्षेप मागविले होते काय? उच्च न्यायालयाची विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 12:28 IST

उच्च न्यायालयाची राज्य शासनास विचारणा; निर्णय अंतिम झाला नसताना अंमलबजावणी कशी ?

औरंगाबाद :औरंगाबाद आणि उस्मानाबादची नावे बदलण्याचा निर्णय कुठल्या परिस्थितीत घेतला? या शहरांची नावे बदलण्यापूर्वी आक्षेप मागविले होते काय? तसेच नावे बदलण्याचा निर्णय अंतिम झाला नसताना, त्याची अंमलबजावणी कशी करीत आहात, असे प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस. व्ही. मारणे यांनी मंगळवारी (दि.३१) विचारून राज्य शासनाकडून स्पष्टीकरण मागविले आहे.

या शहरांच्या नामांतराबाबतच्या राज्य शासनाच्या प्रस्तावाची माहिती आणि त्याची सद्यस्थिती काय आहे, याची माहिती केंद्र शासनाकडून मागविली आहे. मंत्रिमंडळाची योग्यप्रकारे स्थापना न करता, केवळ १२ मंत्री निवडून विद्यमान शिंदे सरकारने शपथविधी होताच औरंगाबाद आणि उस्मानाबादचे अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे नामांतर केले. या निर्णयास आव्हान देणाऱ्या याचिकेच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने राज्य आणि केंद्र शासनाकडून वरीलप्रमाणे स्पष्टीकरण मागविले आहे. या जनहित याचिकेवर १५ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी आहे.

सुनावणीदरम्यान ॲड. प्रज्ञा तळेकर यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शहरांच्या नामांतरापूर्वी आक्षेप मागविणे बंधनकारक असताना, राज्य शासनाने आक्षेप न मागविता किंवा कुठलेही संयुक्तिक कारण न दर्शविता थेट निर्णय घेतला. त्यांनी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या अवर सचिवांच्या पत्रव्यवहारात उस्मानाबादचा धाराशिव असा उल्लेख केला जात असल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने शहरांच्या नामांतराबाबत ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिला असतानाही राज्य शासनाने वरील शहरांचे नामांतर केले, याकडेही लक्ष वेधले.

ही जनहित याचिका दाखल करून घेता येणार नसल्याबाबत प्राथमिक आक्षेप घेण्यात आला होता. मात्र राज्य घटनेच्या कलम २२६ नुसार ही याचिका दाखल करून घेता येईल, याबाबत न्यायालयाचे समाधान झाल्यानंतर याचिकेवर सुनावणी घेण्यात आली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादOsmanabadउस्मानाबादState Governmentराज्य सरकार