शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

औरंगाबाद,उस्मानाबादच्या नामांतरापूर्वी आक्षेप मागविले होते काय? उच्च न्यायालयाची विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 12:28 IST

उच्च न्यायालयाची राज्य शासनास विचारणा; निर्णय अंतिम झाला नसताना अंमलबजावणी कशी ?

औरंगाबाद :औरंगाबाद आणि उस्मानाबादची नावे बदलण्याचा निर्णय कुठल्या परिस्थितीत घेतला? या शहरांची नावे बदलण्यापूर्वी आक्षेप मागविले होते काय? तसेच नावे बदलण्याचा निर्णय अंतिम झाला नसताना, त्याची अंमलबजावणी कशी करीत आहात, असे प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस. व्ही. मारणे यांनी मंगळवारी (दि.३१) विचारून राज्य शासनाकडून स्पष्टीकरण मागविले आहे.

या शहरांच्या नामांतराबाबतच्या राज्य शासनाच्या प्रस्तावाची माहिती आणि त्याची सद्यस्थिती काय आहे, याची माहिती केंद्र शासनाकडून मागविली आहे. मंत्रिमंडळाची योग्यप्रकारे स्थापना न करता, केवळ १२ मंत्री निवडून विद्यमान शिंदे सरकारने शपथविधी होताच औरंगाबाद आणि उस्मानाबादचे अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे नामांतर केले. या निर्णयास आव्हान देणाऱ्या याचिकेच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने राज्य आणि केंद्र शासनाकडून वरीलप्रमाणे स्पष्टीकरण मागविले आहे. या जनहित याचिकेवर १५ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी आहे.

सुनावणीदरम्यान ॲड. प्रज्ञा तळेकर यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शहरांच्या नामांतरापूर्वी आक्षेप मागविणे बंधनकारक असताना, राज्य शासनाने आक्षेप न मागविता किंवा कुठलेही संयुक्तिक कारण न दर्शविता थेट निर्णय घेतला. त्यांनी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या अवर सचिवांच्या पत्रव्यवहारात उस्मानाबादचा धाराशिव असा उल्लेख केला जात असल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने शहरांच्या नामांतराबाबत ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिला असतानाही राज्य शासनाने वरील शहरांचे नामांतर केले, याकडेही लक्ष वेधले.

ही जनहित याचिका दाखल करून घेता येणार नसल्याबाबत प्राथमिक आक्षेप घेण्यात आला होता. मात्र राज्य घटनेच्या कलम २२६ नुसार ही याचिका दाखल करून घेता येईल, याबाबत न्यायालयाचे समाधान झाल्यानंतर याचिकेवर सुनावणी घेण्यात आली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादOsmanabadउस्मानाबादState Governmentराज्य सरकार