शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

औरंगाबाद,उस्मानाबादच्या नामांतरापूर्वी आक्षेप मागविले होते काय? उच्च न्यायालयाची विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 12:28 IST

उच्च न्यायालयाची राज्य शासनास विचारणा; निर्णय अंतिम झाला नसताना अंमलबजावणी कशी ?

औरंगाबाद :औरंगाबाद आणि उस्मानाबादची नावे बदलण्याचा निर्णय कुठल्या परिस्थितीत घेतला? या शहरांची नावे बदलण्यापूर्वी आक्षेप मागविले होते काय? तसेच नावे बदलण्याचा निर्णय अंतिम झाला नसताना, त्याची अंमलबजावणी कशी करीत आहात, असे प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस. व्ही. मारणे यांनी मंगळवारी (दि.३१) विचारून राज्य शासनाकडून स्पष्टीकरण मागविले आहे.

या शहरांच्या नामांतराबाबतच्या राज्य शासनाच्या प्रस्तावाची माहिती आणि त्याची सद्यस्थिती काय आहे, याची माहिती केंद्र शासनाकडून मागविली आहे. मंत्रिमंडळाची योग्यप्रकारे स्थापना न करता, केवळ १२ मंत्री निवडून विद्यमान शिंदे सरकारने शपथविधी होताच औरंगाबाद आणि उस्मानाबादचे अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे नामांतर केले. या निर्णयास आव्हान देणाऱ्या याचिकेच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने राज्य आणि केंद्र शासनाकडून वरीलप्रमाणे स्पष्टीकरण मागविले आहे. या जनहित याचिकेवर १५ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी आहे.

सुनावणीदरम्यान ॲड. प्रज्ञा तळेकर यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शहरांच्या नामांतरापूर्वी आक्षेप मागविणे बंधनकारक असताना, राज्य शासनाने आक्षेप न मागविता किंवा कुठलेही संयुक्तिक कारण न दर्शविता थेट निर्णय घेतला. त्यांनी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या अवर सचिवांच्या पत्रव्यवहारात उस्मानाबादचा धाराशिव असा उल्लेख केला जात असल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने शहरांच्या नामांतराबाबत ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिला असतानाही राज्य शासनाने वरील शहरांचे नामांतर केले, याकडेही लक्ष वेधले.

ही जनहित याचिका दाखल करून घेता येणार नसल्याबाबत प्राथमिक आक्षेप घेण्यात आला होता. मात्र राज्य घटनेच्या कलम २२६ नुसार ही याचिका दाखल करून घेता येईल, याबाबत न्यायालयाचे समाधान झाल्यानंतर याचिकेवर सुनावणी घेण्यात आली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादOsmanabadउस्मानाबादState Governmentराज्य सरकार