शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

आग्या मोहळाचा अजिंठा लेणीत ५० पर्यटकांना डंख; उपाययोजनात पुरातत्व विभाग अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 19:56 IST

या घटनांमुळे पर्यटक भयभीत झाले आहेत.

- श्यामकुमार पुरेसिल्लोड : पुण्याहून अजिंठा लेणी बघण्यास आलेल्या ५० पर्यटकांवर मंगळवारी दुपारी ४ वाजता मधमाशांनी हल्ला केला. रविवारीही दुपारी ३ वाजता २७ पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनांमुळे पर्यटक भयभीत झाले आहेत.

अजिंठा लेणी क्रमांक २, ४ व २६ या लेणीच्या माथ्यावर प्रत्येकी १, तर लेणी क्रमांक १०च्या माथ्यावर ६ असे एकूण १० मधमाशांचे पोळे बसले आहेत. गेल्या ४ महिन्यांपासून अजिंठा लेणी पाहण्यास येणाऱ्या पर्यटकांवर या मधमाश्या हल्ला करीत आहेत. खराब असलेल्या जळगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यामुळे अजिंठा लेणीला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाली असताना पुरातत्व विभाग याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करीत नसल्याने अशा घटना वाढत आहेत.

या पार्श्वभूमीवर पुण्याहून आलेल्या ५० पर्यटकांवर मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास दिनेश सोपान गायकवाड (वय ४० वर्षे), दिव्या ताठे (वय २१ वर्षे), अर्चना दिनेश गायकवाड (वय ३५ वर्षे), हिंदवी दिनेश गायकवाड (वय ७ वर्षे), स्वराज दिनेश गायकवाड (वय १४ वर्षे) यांच्यासह ५० पर्यटकांवर मधमाशांची अचानक हल्ला केला. रविवारीही २७ पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला होता. दोन्ही घटनेत जखमी झालेल्या पर्यटकांवर फर्दापूर, अजिंठा, सिल्लोड, पहूर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर येथील विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी झालेल्या हल्ल्यात जोधपूर येथील एक पर्यटक गंभीर जखमी झाला आहे. या व्यक्तीच्या शरीरातून चक्क ७० ते ८० विषारी काटे फर्दापूर येथील एका खासगी डॉक्टरने काढले आहेत. मधमाशांनी चावा घेतल्यानंतर पर्यटकांनी जीव वाचविण्यासाठी इकडे तिकडे पळापळ केली. त्यात खाली पडून एका पर्यटकाचा हात मोडला.

चार महिन्यांत एकूण ८०० पर्यटकांना चावादि. ५ एप्रिल रोजीही दुपारी कर्नाटकातील २५ ते ३० शाळकरी मुलांवर मधमाशांनी हल्ला केला होता. २२ एप्रिल रोजी लेणी क्रमांक २६ जवळ थायलंडमधील आठ पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला केला होता. थायलंडमधील एक महिला या हल्ल्यामुळे बेशुद्ध पडली होती. तिला उपचारासाठी अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. गेल्या चार महिन्यांत एकूण ८०० पर्यटकांना मधमाशांनी चावा घेतला आहे.

उपाययोजना करण्यात पुरातत्व विभाग अपयशीपुरातत्व विभागाच्या वतीने गतवर्षी दर सोमवारी सुटीच्या दिवशी मधमाशा हुलवणारे बोलाऊन किंवा तैनात कर्मचाऱ्यांमार्फत धूर दाखवून त्यांना पळवून लावले जात होते; मात्र या धुरामुळे लेणीच्या चित्राकृतींना धोका निर्माण होतो, अशी तक्रार काही लोकांनी केल्याने पुरातत्व विभाग आता काहीच हालचाल करत नाही. त्यांच्या डोळ्या देखत पर्यटक मधमाशांच्या चाव्याने विव्हळत असताना पुरातत्व विभागाचे अधिकारी काहीही उपाययोजना करीत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAjantha - Elloraअजंठा वेरूळ