शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
4
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
5
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
6
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
7
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
8
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
9
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
10
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
11
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
12
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
13
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
14
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
15
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
16
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
17
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
18
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
19
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
20
“विधान परिषदेतील नियम, परंपरा आणि चर्चांमुळे लोकशाही बळकट”: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याशिवाय बीडची दहशत संपणार नाही: अंबादास दानवे

By बापू सोळुंके | Updated: February 14, 2025 13:45 IST

मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घेतला होता. नंतर ते त्यातून निर्देाष सुटला हा भाग वेगळा.

छत्रपती संभाजीनगर: संतोष देशमुख यांच्याशी संबंधित बातम्या पाहतो म्हणून एका जणाला बीड जिल्ह्यात मारहाण करण्यात आली. या घटनेतील आरोपी पाेलिसांना सापडत नाही, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडे हे एकमेकांच्या सावलीसारखे काम करतात. मंत्र्यांचा सहभाग असल्याशिवाय अशा घटना घडूच शकत नाही, जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत बीडमधील दहशत संपणार नाही, अशी सडेतोड भूमिका विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत मांडली.

आ. दानवे म्हणाले की, मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घेतला होता. नंतर ते त्यातून निर्देाष सुटला हा भाग वेगळा. येथे मात्र आरोपी वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे घनिष्ठ संबंध जगजाहिर आहे. शिवाय कृषी साहित्य खरेदी घोटाळाही समोर आला. अशा परिस्थितीत त्यांनी नैतिक जबाबदारीने राजीनामा देणे आवश्यक होते. आगामी अधिवेशनात मात्र आम्ही त्यांना सोडणार नसल्याचे आ.दानवे म्हणाले.  

आता मिन्नतवारी नाही... ज्याला जायचे त्याने जावेछत्रपती संभाजीनगरमध्ये मेळावा आणि घरोघरी जाऊन बैठका घेऊनही उद्धवसेनेचे माजी नगरसेवक शिंदेगटात का गेले असा प्रश्न विचारला असता आ. दानवे म्हणाले की, लोक मोहापोटी पक्ष सोडतात. नगरसेवक गेले असले तरी पक्षसंघटन आमच्यासोबत आहे. पक्षाचा एकही शाखाप्रमुख, विभागप्रमुख,बूथ कार्यकर्ता अथवा अन्य पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला नाही. यापुढे पक्ष आता कोणाचीही मिन्नतवारी करणार नाही. ज्याला जायचे त्याने खुशाल जावे अशा शब्दात त्यांनी पक्षाची भूमिका मांडली.  

आ.दानवेंची सामंजस्याची भूमिकाखासदार मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे जेवायला गेल्याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारावर टीका केल्यानंतर खासदारांना आता जेवण्यासाठीही ठाकरेंकडून परवानगी घ्यावी लागेल,अशी टीप्पणी सत्ताधाऱ्यांनी केली आहे. याकडे लक्ष वेधले असता, आ.दानवे म्हणाले की, वर्षानुवर्ष एकाच पक्षात काम केले असल्यामुळे अनेकांचे व्यक्तिगत संबंध असतात. यामुळे जेवायला जाण्यासाठी परवानगी घेण्याची गरज नाही. आम्हीही शिंदेगटाच्या लोकांना भेटल्यानंतर बोलतोच म्हणजे फोडाफोडीचा विषय असतोच असे नाही, अशी सामंजस्याची भूमिका आ. दानवे यांनी घेतली.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेShiv SenaशिवसेनाDhananjay Mundeधनंजय मुंडेbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणwalmik karadवाल्मीक कराड