शहरं
Join us  
Trending Stories
1
११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
2
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
3
काल हिडमाचा खात्मा, आज ‘टेक शंकर’सह 7 नक्षलवादी ठार; आंध्र-ओडिशा सीमेजवळ भीषण चकमक
4
संरक्षण, विमा आणि धातू क्षेत्रातील 'या' ५ कंपन्यांचे शेअर्स येणार तेजीत! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज
5
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
6
‘ही मुलगी आमच्या मुलाची नाही’, सासू-सासरे सारखा घ्यायचे संशय, संतप्त सुनेने केलं भयंकर कृत्य
7
Rinku Singh Century In Ranji Trophy : टी-२० स्टार रिंकू सिंहचा रेड बॉल क्रिकेटमध्ये शतकी धमाका!
8
आता काळ बदलतोय! घर सांभाळण्यासाठी कपलने ठेवला 'होम मॅनेजर'; महिन्याला १ लाख पगार
9
हृदयद्रावक! डीजेवर नाचताना हवेत गोळीबार; नवरदेवाच्या मित्राच्या मुलीने गमावला जीव
10
५४ तास विपरीत महालक्ष्मी राजयोग: ५ राशींना ४ पट लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अकल्पनीय फायदा!
11
'इंग्लिश विंग्लिश'मधली छोटी मुलगी आता दिसते सुंदर; अभिनेत्रीचं अरेंज मॅरेज ठरलं; म्हणाली...
12
रशियाने भारताला दिली एक खतरनाक ऑफर, पाकिस्तानचं टेन्शन वाढलं, आली डोळे पांढरे होण्याची वेळ
13
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
14
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
15
Numerology 2026: अंकशास्त्रानुसार २०२६ हे इच्छापूर्तीचे वर्ष? कोणते बदल केले पाहिजेत?
16
एक गावात अन् दुसरी शहरात, एका कॉलनं पतीचं गुपित उघडलं; २ बायकांचा धनी जेलमध्ये गेला, काय घडलं?
17
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
18
Nashik: नाशकात कडाक्याच्या थंडीत भल्या पहाटे सैन्यभरतीसाठी तरुणाई मैदानात!
19
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
20
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
Daily Top 2Weekly Top 5

आहारात मीठ अन् मिठात आयोडीनचे प्रमाण जपावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 23:31 IST

दररोजच्या आहारात मिठाचे योग्य प्रमाण जपण्याची गरज आहे. कारण मिठातूनच शरीराला विशेषत: थायरॉईड ग्रंथीला आयोडीन मिळते. या ग्रंथीला पुरेसे आयोडीन मिळाले नाही, तर गलगंड, थकवा, उदासीनता, विसरभोळेपणा, केस गळणे, त्वचा कोरडी पडणे आदींना सामोरे जावे लागते.

ठळक मुद्देप्रीती फटाले : जागतिक थायरॉईड दिनानिमित्त संवाद

औरंगाबाद : दररोजच्या आहारात मिठाचे योग्य प्रमाण जपण्याची गरज आहे. कारण मिठातूनच शरीराला विशेषत: थायरॉईड ग्रंथीला आयोडीन मिळते. या ग्रंथीला पुरेसे आयोडीन मिळाले नाही, तर गलगंड, थकवा, उदासीनता, विसरभोळेपणा, केस गळणे, त्वचा कोरडी पडणे आदींना सामोरे जावे लागते. त्यामुळे मिठातील आयोडीनचे प्रमाण जपण्याची गरज असल्याचे बालस्थूलतातज्ज्ञ डॉ. प्रीती फटाले म्हणाल्या. जागतिक थायरॉईड दिनानिमित्त त्यांच्याशी साधलेला हा संवाद.थायरॉईड ग्रंथी म्हणजे काय आहे?प्रत्येकाच्या गळ्यात थायरॉईड ही फुलपाखरासारखी ग्रंथी असते. त्यातून प्रामुख्याने थायरॉक्सिन आणि ट्रायआय डोथारोनीन ही दोन संप्रेरके स्रवत असतात. ही संप्रेरके मेंदूतील पिट्युटरी ग्रंथीद्वारे स्रवली जातात. थायरॉईड संप्रेरक शरीराची वाढ, विकास, शरीराचे तापमान, चयापचय, ऊर्जेचे नियोजन, मासिक पाळी आणि स्नायूंची शक्ती नियंत्रित करतात. थायरॉईड ग्रंथीच्या कार्यासाठी आयोडीन हा आवश्यक घटक आहे.प्रश्न : थायरॉईड ग्रंथीचा विकार कोणाला होतो?उत्तर : डिसेंबर २०१८ मध्ये फार्मास्युटिकल एज्युकेशन आणि रिसर्च इंडियाद्वारे प्रसिद्ध केलेल्या लेखानुसार भारतीय लोकसंख्येच्या सरासरी ३२ टक्के लोक थायरॉईड ग्रंथीच्या वेगवेगळ्या विकारांनी म्हणजे गलगंड, हायपोथायरॉयडिजम््, हायपरथायरॉयडिजम्, थायरोडायटिस आणि थायरॉईड कर्करोगाने ग्रस्त आहेत. थायरॉईड ग्रंथीचा आजार मुली, स्त्रियांनाच नव्हे, तर पुरुष आणि मुलांनाही होऊ शकतो. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार याप्रमाणेच थायरॉईड ग्रंथीचे विकार घराघरांत पोहोचले आहेत. आहारात आयोडीनच्या अपुऱ्या प्रमाणामुळे विकार उद््भवतात.प्रश्न : आयोडीन कमी पडल्याने कोणता धोका संभवतो?गर्भधारणेदरम्यान मातेला आयोडीनचा पुरवठा कमी पडल्यास नवजात अर्भकात जन्मजात हायईपोथायरॉडिजम् हा विकार उद्भवू शकतो. बाळ दूध व्यवस्थितपणे न पिणे, जास्त झोपणे, कावीळ जास्त काळ राहणे आदी लक्षणे आहेत. नवजात अर्भकाची वाढ आणि विकास खुंटून मूल मतिमंद होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे गर्भावस्थेत मातेला पुरेसे आयोडीन मिळण्याची खात्री करणे गरजेचे असते.प्रश्न : मिठातील आयोडीनचे प्रमाण कसे जपावे?उत्तर : अन्न शिजविताना मिठाचा वापर न करता ताटात मीठ वाढले पाहिजे. मिठाचा पुडा फोडल्यानंतर एक महिन्यानंतर त्यातील मिठ वापरता कामा नये. ते इतर गोष्टींसाठी वापरावे. मीठ स्वयंपाकघरात, शेगडीजवळ, उन्हात ठेवू नये. ते कायम हवाबंद डब्यात ठेवावे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य