शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

आहारात मीठ अन् मिठात आयोडीनचे प्रमाण जपावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 23:31 IST

दररोजच्या आहारात मिठाचे योग्य प्रमाण जपण्याची गरज आहे. कारण मिठातूनच शरीराला विशेषत: थायरॉईड ग्रंथीला आयोडीन मिळते. या ग्रंथीला पुरेसे आयोडीन मिळाले नाही, तर गलगंड, थकवा, उदासीनता, विसरभोळेपणा, केस गळणे, त्वचा कोरडी पडणे आदींना सामोरे जावे लागते.

ठळक मुद्देप्रीती फटाले : जागतिक थायरॉईड दिनानिमित्त संवाद

औरंगाबाद : दररोजच्या आहारात मिठाचे योग्य प्रमाण जपण्याची गरज आहे. कारण मिठातूनच शरीराला विशेषत: थायरॉईड ग्रंथीला आयोडीन मिळते. या ग्रंथीला पुरेसे आयोडीन मिळाले नाही, तर गलगंड, थकवा, उदासीनता, विसरभोळेपणा, केस गळणे, त्वचा कोरडी पडणे आदींना सामोरे जावे लागते. त्यामुळे मिठातील आयोडीनचे प्रमाण जपण्याची गरज असल्याचे बालस्थूलतातज्ज्ञ डॉ. प्रीती फटाले म्हणाल्या. जागतिक थायरॉईड दिनानिमित्त त्यांच्याशी साधलेला हा संवाद.थायरॉईड ग्रंथी म्हणजे काय आहे?प्रत्येकाच्या गळ्यात थायरॉईड ही फुलपाखरासारखी ग्रंथी असते. त्यातून प्रामुख्याने थायरॉक्सिन आणि ट्रायआय डोथारोनीन ही दोन संप्रेरके स्रवत असतात. ही संप्रेरके मेंदूतील पिट्युटरी ग्रंथीद्वारे स्रवली जातात. थायरॉईड संप्रेरक शरीराची वाढ, विकास, शरीराचे तापमान, चयापचय, ऊर्जेचे नियोजन, मासिक पाळी आणि स्नायूंची शक्ती नियंत्रित करतात. थायरॉईड ग्रंथीच्या कार्यासाठी आयोडीन हा आवश्यक घटक आहे.प्रश्न : थायरॉईड ग्रंथीचा विकार कोणाला होतो?उत्तर : डिसेंबर २०१८ मध्ये फार्मास्युटिकल एज्युकेशन आणि रिसर्च इंडियाद्वारे प्रसिद्ध केलेल्या लेखानुसार भारतीय लोकसंख्येच्या सरासरी ३२ टक्के लोक थायरॉईड ग्रंथीच्या वेगवेगळ्या विकारांनी म्हणजे गलगंड, हायपोथायरॉयडिजम््, हायपरथायरॉयडिजम्, थायरोडायटिस आणि थायरॉईड कर्करोगाने ग्रस्त आहेत. थायरॉईड ग्रंथीचा आजार मुली, स्त्रियांनाच नव्हे, तर पुरुष आणि मुलांनाही होऊ शकतो. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार याप्रमाणेच थायरॉईड ग्रंथीचे विकार घराघरांत पोहोचले आहेत. आहारात आयोडीनच्या अपुऱ्या प्रमाणामुळे विकार उद््भवतात.प्रश्न : आयोडीन कमी पडल्याने कोणता धोका संभवतो?गर्भधारणेदरम्यान मातेला आयोडीनचा पुरवठा कमी पडल्यास नवजात अर्भकात जन्मजात हायईपोथायरॉडिजम् हा विकार उद्भवू शकतो. बाळ दूध व्यवस्थितपणे न पिणे, जास्त झोपणे, कावीळ जास्त काळ राहणे आदी लक्षणे आहेत. नवजात अर्भकाची वाढ आणि विकास खुंटून मूल मतिमंद होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे गर्भावस्थेत मातेला पुरेसे आयोडीन मिळण्याची खात्री करणे गरजेचे असते.प्रश्न : मिठातील आयोडीनचे प्रमाण कसे जपावे?उत्तर : अन्न शिजविताना मिठाचा वापर न करता ताटात मीठ वाढले पाहिजे. मिठाचा पुडा फोडल्यानंतर एक महिन्यानंतर त्यातील मिठ वापरता कामा नये. ते इतर गोष्टींसाठी वापरावे. मीठ स्वयंपाकघरात, शेगडीजवळ, उन्हात ठेवू नये. ते कायम हवाबंद डब्यात ठेवावे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य