शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

मूलभूत सुविधांसाठी ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीसमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 23:43 IST

विविध नागरी सुविधा पुरविण्यास ग्रामपंचायत प्रशासन टाळाटाळ करीत असल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी वाळूज ग्रामपंचायत कार्यालयासमोर दोन तास ठिय्या दिला.

वाळूज महानगर : विविध नागरी सुविधा पुरविण्यास ग्रामपंचायत प्रशासन टाळाटाळ करीत असल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी वाळूज ग्रामपंचायत कार्यालयासमोर दोन तास ठिय्या दिला. या प्रसंगी आंदोलकांनी सरपंच पपीनकुमार माने यांना जाब विचारल्यानंतर सुविधा पुरविण्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.

वाळूज येथील भारतनगरात विविध नागरी सुविधांचा अभाव असल्यामुळे रहिवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या वसाहतीला दहा ते पंधरा दिवसांआड पाणी पुरवठा केला जात आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीकडे तक्रारी करुनही याची दखल घेतली जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यातच ड्रेनेजलाईन नसल्याने सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कचरा संकलनासाठी घंडागाडी येत नसल्याने नागरिक उघड्यावरच कचरा टाकत आहेत. अंतर्गत रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, पाऊस पडल्यानंतर रस्त्यावरच पाणी साचते. त्यामुळे नागरिकांना चिखल व पाण्यातून वाट तुडत जावे लागत आहे.

भारतनगरमध्ये नागरी सुविधा पुरविण्यास ग्रामपंचायत प्रशासन टाळाटाळ करीत असल्याने सोमवारी नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर दोन तास ठिय्या दिला. या भागातील समस्या निकाली काढण्याचे आश्वासन सरपंच माने यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात रतन अंबीलवादे, शेख हारुण, जावेद शेख, रियाज शेख, शोभा मोरे, नजमा शेख, सलमा शेख, संगिता पंडीत, ताहेरा शेख, संगिता मोरे, कमल लोखंडे,सईदा शेख, फरजाना शेख,सागर पठारे, सुशि निकम आदीसह अनेकांनी सहभाग नोंदविला होता.

टॅग्स :Walujवाळूज