शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

मूलभूत सुविधांसाठी ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीसमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 23:43 IST

विविध नागरी सुविधा पुरविण्यास ग्रामपंचायत प्रशासन टाळाटाळ करीत असल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी वाळूज ग्रामपंचायत कार्यालयासमोर दोन तास ठिय्या दिला.

वाळूज महानगर : विविध नागरी सुविधा पुरविण्यास ग्रामपंचायत प्रशासन टाळाटाळ करीत असल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी वाळूज ग्रामपंचायत कार्यालयासमोर दोन तास ठिय्या दिला. या प्रसंगी आंदोलकांनी सरपंच पपीनकुमार माने यांना जाब विचारल्यानंतर सुविधा पुरविण्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.

वाळूज येथील भारतनगरात विविध नागरी सुविधांचा अभाव असल्यामुळे रहिवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या वसाहतीला दहा ते पंधरा दिवसांआड पाणी पुरवठा केला जात आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीकडे तक्रारी करुनही याची दखल घेतली जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यातच ड्रेनेजलाईन नसल्याने सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कचरा संकलनासाठी घंडागाडी येत नसल्याने नागरिक उघड्यावरच कचरा टाकत आहेत. अंतर्गत रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, पाऊस पडल्यानंतर रस्त्यावरच पाणी साचते. त्यामुळे नागरिकांना चिखल व पाण्यातून वाट तुडत जावे लागत आहे.

भारतनगरमध्ये नागरी सुविधा पुरविण्यास ग्रामपंचायत प्रशासन टाळाटाळ करीत असल्याने सोमवारी नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर दोन तास ठिय्या दिला. या भागातील समस्या निकाली काढण्याचे आश्वासन सरपंच माने यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात रतन अंबीलवादे, शेख हारुण, जावेद शेख, रियाज शेख, शोभा मोरे, नजमा शेख, सलमा शेख, संगिता पंडीत, ताहेरा शेख, संगिता मोरे, कमल लोखंडे,सईदा शेख, फरजाना शेख,सागर पठारे, सुशि निकम आदीसह अनेकांनी सहभाग नोंदविला होता.

टॅग्स :Walujवाळूज