शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

मूलभूत सुविधांसाठी ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीसमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 23:43 IST

विविध नागरी सुविधा पुरविण्यास ग्रामपंचायत प्रशासन टाळाटाळ करीत असल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी वाळूज ग्रामपंचायत कार्यालयासमोर दोन तास ठिय्या दिला.

वाळूज महानगर : विविध नागरी सुविधा पुरविण्यास ग्रामपंचायत प्रशासन टाळाटाळ करीत असल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी वाळूज ग्रामपंचायत कार्यालयासमोर दोन तास ठिय्या दिला. या प्रसंगी आंदोलकांनी सरपंच पपीनकुमार माने यांना जाब विचारल्यानंतर सुविधा पुरविण्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.

वाळूज येथील भारतनगरात विविध नागरी सुविधांचा अभाव असल्यामुळे रहिवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या वसाहतीला दहा ते पंधरा दिवसांआड पाणी पुरवठा केला जात आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीकडे तक्रारी करुनही याची दखल घेतली जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यातच ड्रेनेजलाईन नसल्याने सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कचरा संकलनासाठी घंडागाडी येत नसल्याने नागरिक उघड्यावरच कचरा टाकत आहेत. अंतर्गत रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, पाऊस पडल्यानंतर रस्त्यावरच पाणी साचते. त्यामुळे नागरिकांना चिखल व पाण्यातून वाट तुडत जावे लागत आहे.

भारतनगरमध्ये नागरी सुविधा पुरविण्यास ग्रामपंचायत प्रशासन टाळाटाळ करीत असल्याने सोमवारी नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर दोन तास ठिय्या दिला. या भागातील समस्या निकाली काढण्याचे आश्वासन सरपंच माने यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात रतन अंबीलवादे, शेख हारुण, जावेद शेख, रियाज शेख, शोभा मोरे, नजमा शेख, सलमा शेख, संगिता पंडीत, ताहेरा शेख, संगिता मोरे, कमल लोखंडे,सईदा शेख, फरजाना शेख,सागर पठारे, सुशि निकम आदीसह अनेकांनी सहभाग नोंदविला होता.

टॅग्स :Walujवाळूज