शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

वसुलीच्या चिंतेने बँकांचा पीककर्ज वाटपात आखडता हात, केवळ ६५ टक्के वाटप

By बापू सोळुंके | Updated: September 1, 2023 20:51 IST

दुष्काळी परिस्थितीचा फटका ; मराठवाड्यात केवळ ६५ टक्केच वाटप 

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पावसाने पाठ फिरविल्याचे दिसताच बँकांनीही शेतकऱ्यांना कर्ज वाटपात हात आखडता घेतला आहे. आठही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, व्यापारी बँक आणि ग्रामीण बँकांनी फक्त ६५ टक्के कर्जाचे वाटप केले आहे.

कर्ज कशासाठी लागते ?बी-बियाणे, कीटकनाशके, उपकरणे खरेदी, पिकांचे नियोजन, विक्री

सन २०२३-२४ साठी बँकांना उद्दिष्ट किती ?११ हजार ७७८ कोटी ७१ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, आतापर्यंत बँकांनी ७ हजार ६६५ कोटी ९५ लाख ४८ हजार रुपये कर्ज वाटप केल्याची माहिती प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे. वाटप करण्यात आलेल्या कर्जाची टक्केवारी केवळ ६५.०८ टक्के आहे. ३ लाख ५१ हजार ७०३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांसाठी हे पीककर्ज शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे.

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज मिळते परतपीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकार ४ टक्के व्याजाची रक्कम परत करते. तर राज्य सरकारच्या वतीने पंजाबराव देशमुख शेतकरी पीककर्ज व्याज सवलत योजनेंतर्गत ३ टक्के व्याज असे एकूण ७ टक्के व्याजाची रक्कम शेतकऱ्यांना देते. यामुळे शेतकऱ्यांना बिनव्याजी पीककर्ज मिळते.

जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ १०.४१ टक्के पीककर्जजालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांकडून पीककर्ज वाटप करण्याबाबत नकारघंटाच असते. जालना जिल्ह्याला शासनाने पीककर्ज वाटपाचे दिलेल्या उद्दिष्टापैकी केवळ १०.४१ टक्केच पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.

जिल्हा---पीक कर्जाची एकूण रक्कम--- टक्केवारीऔरंगाबाद--१०६४ कोटी ४ लाख ९६ हजार- ७३.९५ टक्केजालना- १२९ कोटी ९६ लाख २६ हजार- १०.४१ टक्केपरभणी-६८४ कोटी ५९ लाख १५ हजार- ४९.३० टक्के--लातूर-- १ हजार ८०६ कोटी ९३ हजार ---- ९३.०५ टक्केधाराशिव-९२३ कोटी ९७ लाख ६४ हजार- ६४.१९ टक्केबीड-१ हजार २३८ कोटी ८३ लाख २२ हजार--७५.५४ टक्केनांदेड-१ हजार ३३४ कोटी ६५ लाख ९६ हजार-- ७३.६२ टक्के--लातूर-- ५ हजार ३०३ कोटी ४७ लाख ७५ हजार- ७७.६२ टक्के

टॅग्स :Crop Loanपीक कर्जMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी