शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगार बेजार! जिल्हा उद्योग केंद्र, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांना बँकांचा खोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 14:48 IST

जिल्हा उद्योग केंद्राची ४०, तर अण्णासाहेब महामंडळाची २५ टक्के उद्दिष्टपूर्ती

छत्रपती संभाजीनगर : सुशिक्षित बेरोजगारांना जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने २५ टक्के आणि ३५ टक्के अनुदानात उद्योग व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करण्यात येते. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून बिनव्याजी कर्ज देण्यात येते. या सर्व योजनांना पतपुरवठा बँकांमार्फत केला जातो. मात्र, बँकांकडून बेरोजगारांना कर्ज देण्यास टाळाटाळ केली जाते. परिणामी, डीआयसीची उद्दिष्टपूर्ती होत नाही.

जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने सुशिक्षित बेरोजगार तरुण, तरुणींना स्वत:चा उद्योग-व्यवसाय करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत (सीएमईजीपी) बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करण्यात येते. बँकेचे कर्ज घेऊन सलग तीन वर्षे उत्कृष्ट व्यवसाय केल्यानंतर कर्जदाराच्या बँक खात्यात त्यांच्या एकूण कर्जाच्या ३५ टक्के रक्कम अनुदान स्वरूपात शासनाकडून देण्यात येते. सीएमईजीपी योजनेतून कर्ज घेऊन स्वत:चा उद्योग, व्यवसाय करण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार जिल्हा उद्योग केंद्राकडे अर्ज करतात.

या प्रकल्प अहवालाची तपासणी केल्यानंतर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक कर्जाची फाईल विविध राष्ट्रीयीकृत बँकांकडे पाठवितात. या फाईलच्या आधारे संबंधित अर्जदाराला व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करण्याची जबाबदारी बँकेची असते. १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत १२०० बेरोजगारांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज देण्याचे उद्दिष्ट शासनाने उद्योग केंद्राला दिले आहे. मात्र, मागील नऊ महिन्यांच्या कालावधीत केवळ ५२० बेरोजगारांनाच बँकांनी कर्ज दिले आहेत. आता दोन महिन्यांत बँकांकडून उद्दिष्टपूर्ती होईल, असे चित्र नाही.

अण्णासाहेब महामंडळाच्या अर्जदारांनाही बँकांचा ‘खो’अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाकडून मराठा समाजातील बेरोजगारांना १५ लाखांपर्यंत व्याज परतावा योजनेंतर्गत कर्ज देण्यात येते. यासोबत गट समूहांनाही मोठ्या कर्जाला व्याज परतावा दिला जातो. महामंडळाच्या या योजनांना बँकांकडून पतपुरवठा होतो. महामंडळाकडून अर्जदाराचे पात्रता पत्र बँकांना पाठविण्यात येते. यावर्षी महामंडळाला पाच हजार बेरोजगारांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, आजपर्यंत केवळ १ हजार ४०० जणांनाच बँकांनी कर्ज दिल्याची माहिती मिळाली. उर्वरित अडीच महिन्यांत ३६०० कर्जदारांना बँका कर्ज देण्याची शक्यताही नाही. परिणामी, महामंडळाचे उद्दिष्ट यंदाही पूर्ण होताना दिसत नाही.

टॅग्स :bankबँकchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAnnasaheb Patil Mahamandalअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ